शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

चहावाल्याने जनतेचा विश्वासघात केला; अखिलेश यादव यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 15:56 IST

अखिलेश यादव म्हणाले की, पंतप्रधान मोदींची आता पूर्णपणे पोलखोल झाली आहे. गेल्या वेळचा चहावाला आता चौकीदार झाला आहे. जो काहीच कामाचा नाही. राज्यातील नेतृत्व देखील चौकीदारचा समर्थक आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात ठोकोनिती सुरू झाल्याचा आरोप अखिलेश यांनी केला.

नवी दिल्ली - देशातील जनतेचा चहावाल्याने विश्वासघात केल्याची घणाघाती टीका समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता केली. कौशाम्बी मतदार संघातील उमदेवार इंद्रजीत सरोज आणि प्रतापगडचे उमेदवार अशोक त्रिपाठी यांच्यासाठी आयोजित संयुक्त प्रचार सभेत अखिलेश बोलत होते.

अखिलेश यादव म्हणाले की, पंतप्रधान मोदींची आता पूर्णपणे पोलखोल झाली आहे. गेल्या वेळचा चहावाला आता चौकीदार झाला आहे. जो काहीच कामाचा नाही. राज्यातील नेतृत्व देखील चौकीदारचा समर्थक आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात ठोकोनिती सुरू झाल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. पोलिसांना अपमानित व्हावं लागत आहे. मात्र आगामी निवडणुकीत चौकीदार आणि ठोकीदार यांना घरी बसावे लागले, असंही अखिलेश यांनी सांगितले.

भाजपने जनतेला धोका दिला आहे. दोन कोटी नोकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांना दिलेले आश्वासने पाळले नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची वाताहत झाली. भारत सरकारवर सध्या ८२ लाख कोटींचे कर्ज असल्याचं अखिलेश यांनी सांगितले. परंतु, लोकशाहीत कुणीही राजा नसतो, तर जनता राजा असते. सध्या राज्यात सपा-बसपा युतीची लाट आहे. त्यामुळे जनता ज्याला वाटेल त्याला राजा बनवणार आहे. ज्याच्या विरुद्ध असेल त्याला खुर्ची सोडावी लागेल, असं सांगताना अखिलेश यांनी भाजप कपटीपणाने निवडणुकीला सामोरे जात असल्याचा आरोप केला.

मतदानाच्या वेळी सायकलसमोरील बटन दाबल्याने चौकीदारी, ठोकीदार आणि धमकीदार या सगळ्यांची सुट्टी होणार आहे. जनतेत असलेला उत्साह पाहता देशात परिवर्तन होणार असं दिसत आहे. कुणालाही वाटत नव्हतं, सपा आणि बसपाची युती होईल. सपा-बसपाची युती म्हणजे शेतकऱ्यांची युती आहे. तरुण, बेरोजगार, दलित, मागास आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी ही युती झाल्याचे अखिलेश पुढे म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा