शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

'शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना १0 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 05:49 IST

केरळ सरकारचा मनोदय; कुटुंबाला १0 हजार रुपये भरपाई

तिरूअनंतपूरम : केरळमधील पावसाचे तडाखे आणि पूर यांमुळे छोटे व्यापारी, व्यावसायिक, दुग्ध उत्पादक शेतकरी यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना १0 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी दिली.

याशिवाय निर्वासित शिबिरांतून कुटुंबे आपल्या घरी परततील, तेव्हा त्यांना १0 हजार रुपयांची भरपाई देणार आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल. लोकांच्या घरात पुरामुळे साचलेला चिखल काढण्याचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत १ लाख ३१ हजार ६८३ घरांमधून चिखल काढण्याचे काम सरकारी कर्मचारी व स्वयंसेवक यांनी मिळून केले आहे. याशिवाय पावसामुळे विजेचे पडलेले खांब दुरुस्त करण्यात आले आहेत वा त्या ठिकाणी नवे खांब उभारले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सुरू होण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. आतापर्यंत २५ लाख ६0 हजार घरे व दुकानांपैकी २३ लाख ३६ हजार ठिकाणी वीजपुरवठा सुरू झाला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आता अनेकांना घरी परतायचे आहे. शिबिरांमध्ये १0 लाख ४0 हजार ६६८ लोक होते. पण काही जण घरी परतल्याने आता ही संख्या ८ लाख ६९ हजार ७२४ वर आली आहे.

पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यावर राज्य सरकारचा भर दिसत आहे. मात्र पावसाने व पुराने वाहून गेलेले व खचलेले रस्ते दुरुस्त करण्यास काही काळ लागेल, असे दिसत आहे. राज्याच्या काही भागांत अद्याप किरकोळ पाऊ स सुरू आहे, तर काही भागांत आजही पाणी आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीत अडचणी येत आहेत. मात्र सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत ती कामेही पूर्ण करण्याचे सरकारने ठरविले असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. ज्या भागांत उन्ह आहे, तिथे रस्ते दुरुस्ती सुरू केली आहे, असे तो म्हणाला.३६ जण अद्याप बेपत्ताकेरळमध्ये ८ आॅगस्टपासून आतापर्यंत पावसाने घेतलेल्या बळींची संख्या २६५ असून, अद्याप ३६ जण बेपत्ता आहेत. तेही पुरामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)यंदा ओणमचा उत्साह नाहीचकेरळमध्ये ओणम हा मोठा उत्साहाचा सण म्हणून ओळखला जातो. केवळ हिंदूच नव्हेत, तर ख्रिश्चन व मुस्लीम घरांमध्येही तो साजरा केला जातो, पण पाऊ स व पुरामुळे प्रचंड मनुष्य व वित्तहानी झालेल्या या राज्यात आज हा सण साजराच केला नाही. मात्र, निर्वासित शिबिरांमध्ये काही गोड प्रकार बनविण्यात आले होते. केरळबाहेर राहणाºया मल्याळी लोकांमध्येही ओणमचा उत्साह आज दिसला नाही. ओणमला पाहुण्यांना घरी जेवायला बोलावले जाते. केळीच्या पानावर जेवण वाढले जाते आणि जेवणात किमान २४ खाद्यप्रकार असतात, पण यंदा ते चित्र दिसले नाही. देशा-परदेशांतील अनेक मल्याळी लोकांनी सण साजरा न करता, ती रक्कम मुख्यमंत्री निधीला दिली वा आपल्या कुटुंबाला ते पैसे पाठविले.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळ