शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

'शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना १0 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 05:49 IST

केरळ सरकारचा मनोदय; कुटुंबाला १0 हजार रुपये भरपाई

तिरूअनंतपूरम : केरळमधील पावसाचे तडाखे आणि पूर यांमुळे छोटे व्यापारी, व्यावसायिक, दुग्ध उत्पादक शेतकरी यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना १0 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी दिली.

याशिवाय निर्वासित शिबिरांतून कुटुंबे आपल्या घरी परततील, तेव्हा त्यांना १0 हजार रुपयांची भरपाई देणार आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल. लोकांच्या घरात पुरामुळे साचलेला चिखल काढण्याचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत १ लाख ३१ हजार ६८३ घरांमधून चिखल काढण्याचे काम सरकारी कर्मचारी व स्वयंसेवक यांनी मिळून केले आहे. याशिवाय पावसामुळे विजेचे पडलेले खांब दुरुस्त करण्यात आले आहेत वा त्या ठिकाणी नवे खांब उभारले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सुरू होण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. आतापर्यंत २५ लाख ६0 हजार घरे व दुकानांपैकी २३ लाख ३६ हजार ठिकाणी वीजपुरवठा सुरू झाला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आता अनेकांना घरी परतायचे आहे. शिबिरांमध्ये १0 लाख ४0 हजार ६६८ लोक होते. पण काही जण घरी परतल्याने आता ही संख्या ८ लाख ६९ हजार ७२४ वर आली आहे.

पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यावर राज्य सरकारचा भर दिसत आहे. मात्र पावसाने व पुराने वाहून गेलेले व खचलेले रस्ते दुरुस्त करण्यास काही काळ लागेल, असे दिसत आहे. राज्याच्या काही भागांत अद्याप किरकोळ पाऊ स सुरू आहे, तर काही भागांत आजही पाणी आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीत अडचणी येत आहेत. मात्र सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत ती कामेही पूर्ण करण्याचे सरकारने ठरविले असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. ज्या भागांत उन्ह आहे, तिथे रस्ते दुरुस्ती सुरू केली आहे, असे तो म्हणाला.३६ जण अद्याप बेपत्ताकेरळमध्ये ८ आॅगस्टपासून आतापर्यंत पावसाने घेतलेल्या बळींची संख्या २६५ असून, अद्याप ३६ जण बेपत्ता आहेत. तेही पुरामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)यंदा ओणमचा उत्साह नाहीचकेरळमध्ये ओणम हा मोठा उत्साहाचा सण म्हणून ओळखला जातो. केवळ हिंदूच नव्हेत, तर ख्रिश्चन व मुस्लीम घरांमध्येही तो साजरा केला जातो, पण पाऊ स व पुरामुळे प्रचंड मनुष्य व वित्तहानी झालेल्या या राज्यात आज हा सण साजराच केला नाही. मात्र, निर्वासित शिबिरांमध्ये काही गोड प्रकार बनविण्यात आले होते. केरळबाहेर राहणाºया मल्याळी लोकांमध्येही ओणमचा उत्साह आज दिसला नाही. ओणमला पाहुण्यांना घरी जेवायला बोलावले जाते. केळीच्या पानावर जेवण वाढले जाते आणि जेवणात किमान २४ खाद्यप्रकार असतात, पण यंदा ते चित्र दिसले नाही. देशा-परदेशांतील अनेक मल्याळी लोकांनी सण साजरा न करता, ती रक्कम मुख्यमंत्री निधीला दिली वा आपल्या कुटुंबाला ते पैसे पाठविले.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळ