शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बँक खाती आधार कार्ड सोबत लिंक करण्यामागे केंद्र सरकारचा हा आहे मोठा हेतू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 5:19 PM

देशातील  नागरिकांची बँक खाती आधार कार्डसोबत लिंक करवून घेण्यासाठी सरकारी स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यामागे सरकारचा मोठा हेतू लपलेला आहे.

नवी दिल्ली - देशातील  नागरिकांची बँक खाती आधार कार्डसोबत लिंक करवून घेण्यासाठी सरकारी स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे 75 कोटी बँक खाती आधार कार्डसोबत लिंक झाली आहेत. तसेच 48 कोटी खाती आणि आधार कार्डमधील माहिती यांचे प्रमाणीकरण झाले आहे. आता उर्वरित बँक खात्यांना आधार कार्डसोबत जोडण्याच्या कामाला वेग देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ज्यामुळे गरीबांपर्यंत अधिकाधिक मदत पोहोचवण्याचे कार्यक्रम आखता येईल. तसेच आधार कार्डसोबत लिंक करण्यात आलेल्या बँक खात्यांचा आकडा 100 कोटींच्या वर नेण्याचे उद्दीष्ट सरकारने समोर ठेवले आहे.  आधार कार्डशी लिंक करण्यात आलेल्या खात्यांचा वापर व्यापक सामाजिक सुरक्षा अर्थात युनिव्हर्सल बेसिक स्कीम (यूबीआय) पेमेंटसाठी करण्यात येऊ शकतो. या बाबत सरकारच्या धोरणाबाबत माहिती असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, " जर युनिव्हर्सल बेसिक स्कीम लागू करण्याचा निर्णय झाला तर ही बँक खाती त्याचा कणा बनू शकतील." केंद्र सरकारने यावर्षी बँक खात्यांना आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले होते. तसेच जी खाती आधार कार्डशी लिंक होणार नाहीत त्यांची खाती गोठवण्यात येतील. रिझर्व्ह बँकेनेसुद्धा गेल्या आठवड्यात या बाबीचा पुनरुच्चार केला होता.  दरम्यान, विविध सरकारी योजनांचे लाभ व अनुदान मिळविण्यासाठी लाभार्थींनी ‘आधार कार्ड’ काढून त्याची जोडणी करून घेण्यासाठीची मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयास सांगितले होते.‘आधारसक्ती’च्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणारी प्रलंबित याचिका सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे आली, तेव्हा अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आधी ही मुदत डिसेंबरअखेर संपणार होती, परंतु ती पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत वाढविण्याची सरकारची तयारी आहे.मात्र, ज्यांनी अद्याप ‘आधार’ क्रमांकासाठी नोंदणी केलेली नाही व ज्यांची तसे करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ लागू असेल, असे ते म्हणाले. म्हणजेच या वाढीव मुदतीनंतरही ज्यांच्याकडे ‘आधार’ नसेल, त्यांना सरकारी योजनांचे लाभ बंद करणार का, याचा खुलासा त्यांनी केला नाही.मोबाइल-आधार जोडणी सुलभ करण्याचे निर्देशग्राहकांना त्यांच्या मोबाइल क्रमांकाची ‘आधार’शी जोडणी करून घेणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सरकारने टेलिकॉम कंपन्यांना अनेक निर्देश दिले असल्याचे दूरसंचार खात्यातील माहितगार सूत्रांनी सांगितले. ही जोडणी करताना ग्राहकाच्या ‘आधार’ माहितीची गोपनियता भंग होऊ नये यासाठी काय करावे, हेही कंपन्यांना सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डIndiaभारतGovernmentसरकारbankबँक