शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

दिल्लीची 'किल्ली' कुणाकडे?; अरविंद केजरीवाल यांना SCचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 12:35 PM

दिल्लीमधील अधिकारांच्या विभागणीवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आज सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला जोरदार धक्का दिला आहे.

ठळक मुद्देदिल्लीमधील अधिकारांच्या विभागणीवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आज सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला जोरदार धक्का दिलासर्वोच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग केंद्र सरकारच्या अधीन ठेवला ष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील प्रशासकीय सेवांवर कुणाचे नियंत्रण असावे, याबाबत दोन्ही न्यायमूर्तींमध्ये मतमतांतर झाल्याने पेच फसला

नवी दिल्ली - दिल्लीमधील अधिकारांच्या विभागणीवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आज सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला जोरदार धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग केंद्र सरकारच्या अधीन ठेवला आहे. तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील प्रशासकीय सेवांवर कुणाचे नियंत्रण असावे, याबाबत दोन्ही न्यायमूर्तींमध्ये मतमतांतर झाल्याने पेच फसला असून, याबाबतचा खंडित निर्णय वरिष्ठ पीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र एसीबी, महसूल, तपास आयोग याबाबत दोन्ही न्यायमूर्तींमध्ये एकमत झाले. 

अधिकारांच्या विभागणीवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत आज न्यायमूर्ती सिकरी आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या द्विसदस्यीय पीठाने निकाल दिला. या निकालात  दिल्ली सरकारचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करू शकत नाही, याबाबत केंद्र सरकारने काढलेला अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

तपास आयोग स्थापन करण्याचा अधिकारही केंद्र सरकारला देण्यात आला आहे. तसेच पोलीस केंद्राच्या अखत्यारीत असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणा  केंद्रकडेच राहील. मात्र स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नियुक्त करण्याचा अधिकार दिल्ली सरकारला देण्यात आला आहे. महसुली निर्णय घेताना दिल्ली सरकारला नायब राज्यपालांची सहमती घ्यावी लागेल. तर ऊर्जा खात्यातील संचालकांची नियुक्ती करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

 प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि बदलीबाबत सर्वोच्च न्यायालयाने संमिश्र निकाल दिला आहे. या निकालानुसार प्रथम आणि द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि बदली करण्याचा अधिकार केंद्राकडे असेल. तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार दिल्ली सरकारच्या अखत्यारित असेल. तसेच मतभेद झाल्यास प्रकरण राष्ट्रपतींकडे जाईल. निकाल वाचून दाखवताना प्रशासकीय सेवा केंद्राच्या अधीन राहतील असे न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी सांगितल्याने दोन्ही न्यायमूर्तींमध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे सदर विषय वरिष्ठ पीठाकडे वर्ग करण्यात आला. 

महसुली विषयांमध्ये जमिनीसंदर्भातील काही विषय दिल्ली सरकारच्या अखत्यारीत राहतील. त्यानुसार दिल्ली सरकार जमिनीचे दर आणि नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करू शकेल. तसेच जमिनीचा सर्कल मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिन असेल, असा निर्यय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र महसुली निर्णय घेताना दिल्ली सरकारला नायब राज्यपालांची सहमती घ्यावी लागेल. 

 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNew Delhiनवी दिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालCentral Governmentकेंद्र सरकार