शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

एक वर्षासाठी तरी कृषी कायदे प्रायोगिक तत्वावर लागू करुन पाहुयात; राजनाथ सिंहांचे शेतकऱ्यांना आवाहन

By मोरेश्वर येरम | Published: December 25, 2020 2:58 PM

शेतकऱ्यांनी देशात नवे कृषी कायदे किमान एक किंवा दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू करण्याची तयारी दाखवावी.

ठळक मुद्देकृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरले नाहीत तर ते मागे घेण्याची तयारीएक किंवा दोन वर्षांसाठी कृषी कायदे लागू करण्याचं शेतकऱ्यांना आवाहनकृषी कायद्यावर चर्चेसाठी राजनाथ यांचं आंदोलक शेतकऱ्यांना निमंत्रण

नवी दिल्लीकृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना चर्चेचं आवाहन करत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरले नाहीत, तर ते मागे घेऊ, अशी ग्वाही दिली आहे.

"रस्त्यावर आंदोलनाला बसलेले शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांप्रती सरकारला पूर्ण आदर आहे. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं हिताचं नसेल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यासोबत खंबीरपणे उभे आहेत", असं राजनाथ सिंह म्हणाले. द्वारका येथील एका रॅलीला ते संबोधित करत होते. 

"शेतकऱ्यांनी देशात नवे कृषी कायदे किमान एक किंवा दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू करण्याची तयारी दाखवावी. जर या कायद्यांमधून शेतकऱ्यांना कोणताही फायदा झाला नाही, तर सरकार हे कायदे तात्काळ रद्द करेल", असं आश्वासन राजनाथ यांनी दिलं आहे. 

शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची सरकारला जाण असून कोणत्याही समस्येवर चर्चेनेच तोडगा निघतो. पंतप्रधान मोदींनाही शेतकऱ्यांसोबत चर्चा करायची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे, असंही राजनाथ यावेळी म्हणाले. आंदोलक शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे येऊन सरकारसोबत चर्चेची तयारी दाखवावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी