शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या 'मन की बात'वर डिसलाईक्सचा पाऊस का पडला?... जाणून घ्या ठळक कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 19:36 IST

पंतप्रधान मोदींनी रविवारी 'मन की बात'मधून त्यांचे विचार मांडले.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल मन की बातमधून देशवासीयांशी संवाद साधला. लोकलसाठी व्होकल व्हा, याचा पुनरुच्चार मोदींनी केला. खेळण्यांच्या निर्मितीत देशाला अग्रेसर होण्याची संधी आहे. त्यामुळे यासाठी स्टार्टअप्स कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही मोदींनी केलं. मात्र मोदींची 'मन की बात' अनेकांना पटलेली दिसत नाही. भाजपाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरील आकडेवारीतून ही बाब अधोरेखित झाली आहे. 

पंतप्रधान मोदींनी रविवारी 'मन की बात'मधून त्यांचे विचार मांडले. भाजपानं त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनवरून 'मन की बात'चा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून २४ तास झाले आहेत. सध्याच्या घडीला (३१ ऑगस्ट संध्याकाळी ७ वाजेपर्यंत) जवळपास २७ लाख जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. आतापर्यंत १ लाख ९ हजार लोकांनी व्हिडीओ लाईक केला. तर डिसलाईक करणाऱ्यांची संख्या ६ लाख ९४ हजार इतकी आहे. म्हणजेच डिसलाईक करणाऱ्यांचं जास्त आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी मोदींच्या 'मन की बात'बद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडीओवर १ लाख १७ हजार कमेंट्स आल्या आहेत. यातल्या बहुतांश कमेंट्स नकारात्मक आहेत. मात्र मोदींच्या 'मन की बात'वर डिसलाईक्सचा पाऊस का पडला, याच ठळक कारणं 'लोकमत'च्या संपादकीय मंडळातील अनुभवी मंडळींनी मांडलेली आहे.

'लोकमत'च्या संपादकीय मंडळातील अनुभवी मंडळींनी मांडलेली मतं अशीः

कोरोनामुळे देशात अनेक प्रकारची संकटे उभी असताना केवळ कोरडी भाषणे ऐकण्याचा देशाचा मूड नाही,  हेच मोदींच्या व्हिडीओला मिळालेल्या 'डिसलाइक'मधून सिद्ध होतं. ढासळलेली अर्थव्यवस्था, भडकलेली महागाई, वाढती बेरोजगारी यामुळे जनता होरपळून निघाली आहे. त्यांना आता भाषणाची नव्हे कृतिशील नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे या डिसलाईक्समधून योग्य तो संदेशपंतप्रधान कार्यालय घेईल, अशी आशा बाळगूया.- विनायक पात्रुडकर, संपादक

कोरोनाची लस, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या परीक्षा, रोजगारनिर्मितीचे सरकारचे प्लॅन या अत्यंत महत्त्वपूर्ण, गंभीर आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अवाक्षरही बोलले नाहीत. वास्तविक, लहान मुलांची खेळणी आणि आत्मनिर्भर भारत या विषयांना प्राधान्य देण्याच्या मनःस्थितीत नागरिक आज आहेत का?, याचा विचार त्यांनी करायला हवा. त्याचप्रमाणे, देशवासीय कोरोना संकटाने, बेरोजगारीने, आर्थिक समस्यांनी त्रस्त असताना, मोरासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करणंही काहीसं चमत्कारिकच होतं. तेही अनेकांना रुचलेलं नाही. त्यामुळे 'मन की बात'वर एवढे 'डिसलाईक्स'चा  आले असावेत, असं वाटतं.- संजीव साबडे

कोरोनाच्या संकटाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. अनलॉक झाले असले तरी सारेच काही सुरळीत झालेले नाही. दुकाने, बाजारपेठा उघडल्या आहेत खऱ्या; पण ग्राहकांच्या मनातील भीती गेलेली नाही. अशा स्थितीत भविष्याची चिंता दूर करणारे विचार किंवा भूमिका पंतप्रधान मोदी यांच्याकडून मांडली जाणे अपेक्षित होते. परंतु नेहमीप्रमाणे केवळ गोडीगुलाबीची 'मन की बात' त्यांनी केली, तेव्हा आता जनतेच्याही लक्षात यातील उसनेपणा आल्यानेच त्याला डिसलाइक्स अधिक मिळाले. रोजगाराचे, महागाईचे व  जगण्याचेच प्रश्न समोर असताना पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेचा डोस पाजला व मुलांच्या खेळण्याचा खुळखुळा वाजवला, परंतु जनता आता दूधखुळी राहिलेली नाही. ही भाषणबाजी आता सुज्ञांना कळू लागली आहे, हाच बोध यातून घ्यायचा!- किरण अग्रवाल, संपादक

'मन की बात'वरील डिसलाईक्स पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी 'आय ओपनर' ठरू शकतात आणि त्या अर्थाने हे चित्र स्वागतार्हच म्हणता येईल. मात्र, यावरून मोदींची लोकप्रियता उतरणीस लागली असा निष्कर्ष इतक्यात काढता येणार नाही. डिसलाईक या विशिष्ट 'मन की बात' बाबत असू शकतो. याशिवाय सोशल मिडियावरील ट्रेंड बनविण्याचे वा फिरविण्याची तंत्रे आता भाजपाप्रमाणे विरोधी पक्षांनाही ठाऊक झाली आहेत. लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर, विशेषत: रोजगार, बॅंकाचे व्याज व कोरोनाचे नियंत्रण यावर मोदी बोलले असते तर अधिक चांगले झाले असते. पण यावरील ठोस उत्तरे मोदी वा त्यांच्या सल्लागारांना मिळालेली नाहीत, हेही मोदींनी 'मन की बात' साठी निवडलेल्या विषयावरून लक्षात येते. - प्रशांत दीक्षित, संपादक

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारणSocial Mediaसोशल मीडियाIndiaभारत