शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

नऊ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांची लांबी 59 टक्क्यांनी वाढली : नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 09:49 IST

एनएचआयने देशभरातील राष्ट्रीय महामार्गांलगत 1500 हून अधिक अमृत सरोवर विकसित केले आहेत, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : गेल्या नऊ वर्षांत देशातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी सुमारे 59 टक्क्यांनी वाढली आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद सांगितले. यासोबतच रस्त्यांच्या जाळ्याच्या बाबतीत भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2013-14 मध्ये राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी 91,287 किमी होती, जी 2022-23 मध्ये 1,45,240 किमी झाली आहे. या कालावधीत 59 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

2013-14 मध्ये राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी 91,287 किमी होती. ती 2022-23 मध्ये 1,45,240 किमीपर्यंत वाढलल्याचे गडकरी म्हणाले. या कालावधीत ही लांबी 59 टक्क्यांपेक्षा अधिक  वाढली आहे. गेल्या नऊ वर्षांत चौपदरी राष्ट्रीय महामार्गांमध्ये सुमारे दुप्पट वाढ झाली आहे. 2013-14 मध्ये चौपदरी राष्ट्रीय महामार्गांची  लांबी 18,371 किमी होती. जी गेल्या नऊ वर्षात 44,654 किमी झाली असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. याचबरोबर, फास्टॅग  (FASTag) लागू झाल्यामुळे टोल कलेक्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. टोल कलेक्शनमधून  मिळणारा महसूल 2013-14 मधील  4,770 कोटी रुपयांवरून 2022-23 मध्ये 41,342 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे नितीन गडकरी म्हणाले. तसेच, 2030 पर्यंत टोल महसूल 1,30,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. 

याशिवाय, फास्टॅगमुळे टोलवरील प्रतीक्षा वेळही कमी झाला आहे. 2014 मध्ये टोल प्लाझावर प्रतीक्षा वेळ 734 सेकंद होता. तर 2023 मध्ये ते 47 सेकंदांपर्यंत कमी झाले आहे. आम्ही लवकरच ते 30 सेकंदांपर्यंत कमी करू अशी आशा आहे, असे नितीन म्हणाले. तसेच, ईशान्येकडील प्रदेशात महामार्गाच्या जाळ्याच्या विस्तारावर विशेष भर दिला जात आहे. या भागात 2 लाख कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प राबवले जात आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर प्रवासाचा सुखद अनुभव देण्याच्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला 670 सुविधा विकसित केल्या जात आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले.

याचबरोबर, दिल्ली रिंगरोड प्रकल्पासाठी रस्ते बांधणीत 30 लाख टन कचरा वापरला आहे. हे कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत पायाभूत सुविधांच्या विकासाविषयीच्या सक्रिय दृष्टीकोनाचे द्योतक आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. अमेरिकेत 68 लाख 3 हजार 479 किलोमीटरचे रस्ते करण्यात आले आहेत. भारतात 63 लाख 72 हजार 613 किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. तर चीनमध्ये केवळ 51 लाख 98 हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे आहे, असे ते म्हणाले. तसेच, गेल्या 9 वर्षात 68,000 पेक्षा जास्त झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. तर 3.86 कोटी नवीन झाडे लावण्यात आली. एनएचआयने देशभरातील राष्ट्रीय महामार्गांलगत 1500 हून अधिक अमृत सरोवर विकसित केले आहेत, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्ग