शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

राजस्थानच्या विधानसभेमध्ये भूत-आत्म्यांचा वावर, आमदारांमध्ये भीतीचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 14:56 IST

एखादे पडके घर, निर्मनुष्य ठिकाण, आडवाट येथे भूताप्रेतांचा वावर असल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण राजस्थानमध्ये चक्क राज्याच्या विधानसभेलाच भूताने झपाटल्याची चर्चा असून...

जयपूर - एखादे पडके घर, निर्मनुष्य ठिकाण, आडवाट येथे भूताप्रेतांचा वावर असल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण राजस्थानमध्ये चक्क राज्याच्या विधानसभेलाच भूताने झपाटल्याची चर्चा असून, विधानसभेच्या इमारतीत भूत आत्म्यांचा वावर असल्याची शंका राज्यातील आमदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या भूतबाधेमुळेच राज्याच्या विधानसभेत दोनशे आमदारांची संख्या फार काळ टिकत नसल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. राजस्थानच्या विधानसभेची सदस्यसंख्या दोनशे आहे. मात्र सभागृहात पैकीच्या पैकी आमदार फार काळ टिकत नाहीत. कधी कुणी राजीनामा देतो, तर कुणाला तुरुंगवास होतो, कधी कुणाचा अकस्मित मृत्यू होतो. या सर्वासाठी विधानसभेतील प्रेतात्मा कारणीभूत असल्याचा दावा आमदारांनी केला आहे. आमदारांनी आपल्या मनातील भीतीबाबत मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच शांतीसाठी पुजाऱ्यांना बोलावून विशेष पूजा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान गुरुवारी राजस्थान विधानसभेच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी एक पुजारी पूजा विधी करताना दिसत होता. राजस्थानमधील भाजपा आमदार कल्याण सिंह चौहान यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला.  त्यानंतर राजस्थानमधील अन्य आमदारांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षी मांडलगड येथील भाजपा आमदार कीर्ती  कुमारी यांचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाला होता. त्याआधी बीएसपीचे आमदार बी.एल. कुशवाहा यांना हत्येच्या आरोपाखाली अटक झाली होती.  त्यापूर्वी गेल्या विधानसभेतील काँग्रेसचे आमदार महिपाल मणेरदा, मलखान सिंह बिश्नोई आणि बाबू लाल नागर यांना हत्येच्या आरोपाखाली तुरुंगवास झाला होता. राजस्थानच्या विधानसभेचे बांधकाम ज्या ठिकाणी करण्यात आले त्यातील काही भाग स्मशानाच्या जमिनीत झाले होते. विधानसभेच्या इमारतीपासून 200 मीटर अंतरावर लालकोठी मोक्षधाम नावाचे स्मशान आहे. राजस्थानच्या विधानसभेची इमारत एकूण 17 एकर परिसरात पसरलेली असून, 1994 ते 2001 या काळात या विधानसभेच्या इमारतीचे बांधकाम झाले होते. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानnewsबातम्याPoliticsराजकारण