शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

'मणिपूर जळाले, युरोपियन संसदेतही चर्चा झाली, पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलले नाहीत,' राहुल गांधींनी केला हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 14:35 IST

युरोपीय संसदेत मणिपूरच्या स्थितीबाबत ठराव आणल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू होता. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'मणिपूरच्या परिस्थितीवर युरोपियन संसदेत चर्चा झाली आणि निषेधार्थ ठराव आणण्यात आला, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर एक शब्दही उच्चारलेला नाहीच', अशी टीका राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर केली. 

पुरावरून राजकारण तापलं! "दिल्ली जाणूनबुजून बुडवली, भाजपाच जबाबदार"; आपचा गंभीर आरोप

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही केंद्र सरकारला घेरले आहे. राहुल गांधींनी ट्विट करून म्हटलं की, 'मणिपूर जळलं आहे. युरोपीय संसदेत भारताच्या अंतर्गत विषयावर चर्चा झाली. यावर पंतप्रधान एक शब्दही बोलले नाहीत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर गेले आहेत. शुक्रवारी त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाला पाहुणे म्हणून हजेरी लावली. फ्रान्स सरकारने पंतप्रधानांना निमंत्रित केले होते.

युरोपियन युनियनच्या संसदेने गुरुवारी एक ठराव मंजूर केला. यामध्ये त्यांनी मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात भारतातील मानवाधिकारांच्या स्थितीबद्दल बोलले आणि आरोप केला की, भारतातील अल्पसंख्याक समुदायांबद्दल असहिष्णुतेमुळे सध्याची परिस्थिती कायम आहे. या प्रस्तावात मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, जानेवारी १९७७ मध्ये येल विद्यापीठातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड नेल्सन यांनी द मून अँड द घेट्टो नावाचा एक अतिशय लोकप्रिय लेख प्रकाशित केला होता. ग्रॅज्युएट स्कूलमध्ये माझ्यासारख्या लोकांसाठी हे वाचन आवश्यक बनले. नेल्सन यांनी प्रश्न उपस्थित केला - असे का दिसते आहे की तांत्रिकदृष्ट्या गतिमान यूएस चंद्रावर मानवांना उतरविण्यास सक्षम आहे, पण घरातील, विशेषत: अंतर्गत शहरांमधील समस्या सोडविण्यास असमर्थ आहे.

'ही महत्त्वाची आणि विचार करण्याची बाब आहे, जी आमच्यासाठीही प्रासंगिक आहे. आपण चंद्रावर जाऊ शकतो, परंतु आपल्या लोकांच्या घरी ज्या मूलभूत समस्यांचा सामना करावा लागतो त्या हाताळण्यास आपण असमर्थ किंवा इच्छुक नाही, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी