शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या ४.५ वर्षांत तब्बल ८४७२ एन्काऊंटर; ३ हजार जण जखमी, १४६ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 08:58 IST

योगी सरकारच्या गेल्या साडे चार वर्षांच्या कार्यकाळात तब्बल ८ हजार ४७२ एन्काऊंटरच्या घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमध्ये गेल्या ४.५ वर्षांत तब्बल ८४७२ एन्काऊंटरया भागात सर्वाधिक चकमकीच्या घटनाभाजप आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक

लखनऊ: योगी सरकारचा कार्यकाळ जवळपास आता पूर्ण होत आहे. काही महिन्यांनंतर उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यातच आता योगी सरकारच्या गेल्या साडे चार वर्षांच्या कार्यकाळात तब्बल ८ हजार ४७२ एन्काऊंटरच्या घटना घडल्या असून, पोलीस आणि कुख्यात गुंडांमध्ये झालेल्या चकमकींदरम्यान ३ हजार गुंड जखमी झाले असून, १४६ जण ठार झाल्याचे सांगितले जात आहे. तर, याच चकमकींमध्ये १६ पोलीस शहीद झाले आहेत. (last four and half year 8472 encounters and 3000 criminals injured in up yogi govt)

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या आकडेवारीनंतर आता राजकारण तापताना दिसत आहे. यावरून विरोधकांकडून योगी सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. तर सत्ताधारी योगी सरकार सुशासनाचा दावा करताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातही चार चकमकी पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे. 

“५० वर्षांच्या कारकिर्दीत विरोधकांचे असे कृत्य पाहिलेय का?, शरद पवारांनीच आत्मपरीक्षण करावे!”

या भागात सर्वाधिक चकमकी

मार्च २०१७ नंतर या चकमकींमध्ये वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. मार्च २०१७ ते जुलै २०२१ या कालावधीत पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये ८ हजार ४७२ चकमकी झाल्या. यामध्ये १४६ जण ठार झाले. तर, ३ हजार ३०२ कुख्यात गुंड या चकमकीत जखमी झाले. तसेच यामध्ये ११५७ पोलीस कर्मचारी जखमी झाले. पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सर्वाधिक म्हणजे २ हजार २३९ चकमकी झाल्या. यामध्ये १ हजार ५४७ गुन्हेगार जखमी झाले, तर १६ जण ठार झाले. यानंतर आग्रा भागात १ हजार ८८४ चकमकी झाल्या. यामध्ये २१८ गुन्हेगार जखमी झाले. तर १८ जण ठार झाले. तिसऱ्या क्रमांकावर बरेली येत असून, या भागामध्ये १ हजार १७३ चकमकीत २९९ गुन्हेगार जखमी झाले, तर ७ जण ठार झाले आणि २ हजार ६४२ जणांना अटक करण्यात आली आहे. 

जो बायडन यांचा मोठा निर्णय! अफगाणिस्तानात पुन्हा अमेरिकेचे सैन्य पाठवणार

भाजप आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी

उत्तर प्रदेशमधील भाजप प्रवक्ते मनीष शुक्ला यांनी, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे योगी सरकार क्राइम आणि करप्शन फ्रीचे आश्वासन घेऊन सत्तारूढ झाले होते. या दिशेनेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कार्य करत असून, गुन्हेगार आणि माफियांविरोधात निर्णायक कारवाई केली जात आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशमधील योगी सरकार गुन्हेगारांसह निर्दोषांचेही एन्काऊंटर करत असून, यामुळे सामान्य जनतेमध्ये भयाचे वातावरण असल्याचा दावा समाजवादी पक्षाने केला आहे. इतकेच नव्हे, तर मानवाधिकार आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने फेक एन्काऊंटर प्रकरणी योगी सरकारला नोटीस बजावली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा