शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फूटपाथचे नियम बनवायची शेवटची संधी, अपयश आले तर...; सुप्रीम कोर्टाने सरकारला स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 09:36 IST

न्यायालयाने नेमके काय आवश्यक म्हटले आहे?

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना पादचाऱ्यांचे हक्क संरक्षित करणारे नियम तयार करण्यासाठी “शेवटचा एक संधी” दिली आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना पादचारी मार्ग (फुटपाथ) सुलभरीत्या वापरता येईल, याची हमी देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

१४ मे २०२५ रोजी न्यायमूर्ती अभय एस. ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले होते की, “फुटपाथ व पदचाल मार्गांचा वापर हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत दिलेल्या जीवनाच्या हक्काचा अविभाज्य भाग आहे.” 

१ ऑगस्टला ही सुनावणी न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर झाली. वरिष्ठ वकील आणि न्यायालयाने नियुक्त केलेले अमिकस क्युरी (न्यायालयाचा मित्र) गौरव अग्रवाल यांनी सांगितले की, सरकार अद्याप मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहे आणि त्या प्रमाणात पुढील अंमलबजावणी होईल. 

अग्रवाल यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच माजी न्यायमूर्ती डी. के. सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ती रस्ते सुरक्षेसंबंधी विविध आदेशांच्या अंमलबजावणीवर देखरेख करेल. “मार्गदर्शक तत्त्वे तयार झाल्यानंतर समिती त्याची अंमलबजावणी सुरू करू शकते. विशेषतः पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण महामार्गांवर १०,००० हून अधिक पादचाऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. ही एक़ गंभीर बाब आहे”.  पादचाऱ्यांचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्र, दिल्ली, आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये होतात.

चार आठवड्यांत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करा

केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विक्रमजित बॅनर्जी यांनी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येत असल्याचे न्यायालयाला सांगितले. हे नोंदवत न्यायालयाने “केंद्र सरकारने पुढील चार आठवड्यांत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करून  न्यायालयात सादर करावीत अन्यथा न्यायालय अमिकसच्या मदतीने पुढील आवश्यक कारवाई करेल, असे सांगितले. राज्य सरकारांनी देखील आपले स्वतंत्र नियम बनवावे किंवा केंद्र जी मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल, त्याचा अवलंब करावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.  

न्यायालयाने नेमके काय आवश्यक म्हटले आहे? : नागरिकांसाठी योग्य व सुरक्षित फुटपाथ. फुटपाथ दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ असणे. फुटपाथवरील अतिक्रमण हटवणे. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय