शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गेल्या 13 वर्षात दर तीन दिवसाआड एक जवान झाला शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 9:57 AM

अकरा लाख एवढी मजबूत जवानांची संख्या असणाऱ्या भारतीय लष्कराने गेल्या १३ वर्षात दर तीन दिवसाआड एक जवान गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आग्रा- अकरा लाख एवढी मजबूत जवानांची संख्या असणाऱ्या भारतीय लष्कराने गेल्या १३ वर्षात दर तीन दिवसाआड एक जवान गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी 2005 पासून ते डिसेंबर 2017 पर्यंत एकूण 1 हजार 684 जवान शहीद झाले आहेत. सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आणि दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत, शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला दिलेल्या प्रत्युत्तरात आणि शांती मिशनमध्ये या जवानांनी प्राणाचं बलिदान दिलं आहे. 

सोमवार 15 जानेवारी रोजी ७० वा लष्कर दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार 2017 या एका वर्षात भारताच्या 87 जवानांना वीरमरण आलं आहे. 23 डिसेंबर 2017 रोजी एका मेजरसहित ४ जवान शहीद झाले होते. त्यामुळे हा आकडा ९१ वर पोहचला आहे. 

भारतीय लष्कराच्या आकडेवारीनुसार, 2016 मध्ये 11 अधिकाऱ्यांसह 86 जवान शहीद झाले. त्यानंतर 2015 मध्ये 4 अधिकाऱ्यांसहीत 85 जवान शहीद झाले. 2014 मध्ये 65, 2013 मध्ये 64, 2012 मध्ये 75, 2011 मध्ये 71, 2010 मध्ये 187, 2009 मध्ये 107, 2008 मध्ये 71, 2007 मध्ये 221 आणि 2006 मध्ये 223 जवान शहीद झाले. 2015 या वर्षात शहीद झालेल्या जवानांची संख्या जास्त असून केवळ 2015 या वर्षात 342 जवान शहीद झाले आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करSoldierसैनिक