शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

औरंगाबाद तालुक्यातील जमिनीची एप्रिलपासून होणार पुनर्मोजणी

By admin | Updated: February 15, 2015 00:56 IST

औरंगाबाद : भूमी अभिलेख खात्याने राज्यातील संपूर्ण जमिनीच्या पुनर्मोजणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात औरंगाबाद तालुक्यासह राज्यातील ठराविक ...

औरंगाबाद : भूमी अभिलेख खात्याने राज्यातील संपूर्ण जमिनीच्या पुनर्मोजणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात औरंगाबाद तालुक्यासह राज्यातील ठराविक तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. औरंगाबाद तालुक्यात येत्या १ एप्रिलपासून या मोजणीला सुरुवात होणार असल्याचे भूमी खात्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले.राज्यात याआधी ब्रिटिश काळात म्हणजे शंभर वर्षांपूर्वी जमिनीची मोजणी झालेली आहे. त्यानंतर एकदाही संपूर्ण जमिनीची मोजणी झालेली नाही. शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे मूळ धारण जमिनीचे मोठ्या प्रमाणात हस्तांतरण होऊन त्याचे पोटविभाजन झाले आहे. परिणामी प्रत्यक्ष वहिवाट, भूमी अभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात ताळमेळ राहिलेला नाही. तसेच जुने बांध, वरळ्या नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हद्दीचे वाद वाढले असून हे वाद सोडविणे कठीण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर दीड वर्षांपूर्वीच राज्य सरकारने राज्यभर जमिनीच्या पुनर्मोजणीचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली होती. मध्यंतरी या कार्यक्रमासाठी कर्मचार्‍यांची भरतीही करण्यात आली. आता सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर भूमी अभिलेख खात्याने पहिल्या टप्प्यात ठराविक तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम सुरू करण्याची तयारी चालविली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व सहा महसूल आयुक्तालयांची ठिकाणे निवडण्यात आली आहे. प्रत्येक आयुक्तालयाच्या ठिकाणच्या तालुक्यामध्ये ही योजना राबविली जाणार आहे. त्यानुसार औरंगाबाद तालुक्यात १ एप्रिलपासून संपूर्ण जमिनीच्या पुनर्मोजणीला सुरुवात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जमिनीच्या पुनर्मोजणीचे काम हाय रिजोल्यूशन सॅटेलाईट इमेजरी आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात इतर तालुकेपहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यातील जमिनीची पुनर्मोजणी होणार आहे. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात इतर तालुके घेतले जातील. मात्र, दुसरा टप्पा कधी सुरू होईल हे मात्र अद्याप स्पष्ट नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.