शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

औरंगाबाद तालुक्यातील जमिनीची एप्रिलपासून होणार पुनर्मोजणी

By admin | Updated: February 15, 2015 00:56 IST

औरंगाबाद : भूमी अभिलेख खात्याने राज्यातील संपूर्ण जमिनीच्या पुनर्मोजणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात औरंगाबाद तालुक्यासह राज्यातील ठराविक ...

औरंगाबाद : भूमी अभिलेख खात्याने राज्यातील संपूर्ण जमिनीच्या पुनर्मोजणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात औरंगाबाद तालुक्यासह राज्यातील ठराविक तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. औरंगाबाद तालुक्यात येत्या १ एप्रिलपासून या मोजणीला सुरुवात होणार असल्याचे भूमी खात्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले.राज्यात याआधी ब्रिटिश काळात म्हणजे शंभर वर्षांपूर्वी जमिनीची मोजणी झालेली आहे. त्यानंतर एकदाही संपूर्ण जमिनीची मोजणी झालेली नाही. शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे मूळ धारण जमिनीचे मोठ्या प्रमाणात हस्तांतरण होऊन त्याचे पोटविभाजन झाले आहे. परिणामी प्रत्यक्ष वहिवाट, भूमी अभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात ताळमेळ राहिलेला नाही. तसेच जुने बांध, वरळ्या नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हद्दीचे वाद वाढले असून हे वाद सोडविणे कठीण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर दीड वर्षांपूर्वीच राज्य सरकारने राज्यभर जमिनीच्या पुनर्मोजणीचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली होती. मध्यंतरी या कार्यक्रमासाठी कर्मचार्‍यांची भरतीही करण्यात आली. आता सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर भूमी अभिलेख खात्याने पहिल्या टप्प्यात ठराविक तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम सुरू करण्याची तयारी चालविली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व सहा महसूल आयुक्तालयांची ठिकाणे निवडण्यात आली आहे. प्रत्येक आयुक्तालयाच्या ठिकाणच्या तालुक्यामध्ये ही योजना राबविली जाणार आहे. त्यानुसार औरंगाबाद तालुक्यात १ एप्रिलपासून संपूर्ण जमिनीच्या पुनर्मोजणीला सुरुवात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जमिनीच्या पुनर्मोजणीचे काम हाय रिजोल्यूशन सॅटेलाईट इमेजरी आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात इतर तालुकेपहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यातील जमिनीची पुनर्मोजणी होणार आहे. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात इतर तालुके घेतले जातील. मात्र, दुसरा टप्पा कधी सुरू होईल हे मात्र अद्याप स्पष्ट नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.