शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

लाखो शेतकरी व कामगारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; राजधानीत वाहतुकीची प्रचंड कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 03:56 IST

जनतेला मोदी सरकारने धोका दिला असून, केवळ 0.१ टक्का लोकांसाठी काम करणारे सरकार देशात चालू देणार नाही. मोदी सरकार जाईल, तेव्हाच लोकांना अच्छे दिन तेव्हाच येतील.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : जनतेला मोदी सरकारने धोका दिला असून, केवळ 0.१ टक्का लोकांसाठी काम करणारे सरकार देशात चालू देणार नाही. मोदी सरकार जाईल, तेव्हाच लोकांना अच्छे दिन तेव्हाच येतील. आयुष्य वाचविण्यासाठी मोदी सरकार हटविणे हाच उपाय आहे, असे उद्गार माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी बुधवारी दिल्लीत लाखो शेतकरी व कामगारांच्या मोर्चासमोर काढले.अ. भा. किसान महासभा, सिटू, अ.भा. शेतमजूर संघटना या डाव्या संघटनांच्या नेतृत्वाखाली लाखो शेतकरी व कामगारांनी दिल्लीत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. रामलीला मैदानापासून सुरू झालेल्या विशाल मोर्चात तीन लाखांहून अधिक शेतकरी व कामगार घोषणा देत होते. विविध राज्यांतील शेतकरी व कामगारांबरोबर पूरग्रस्त केरळचे शेतकरीही त्यात होते. लाल सलाम, लाल झेंडे, लाल टोप्या, लाल शर्टस व लाल साड्यांनी सजलेल्या या मोर्च्यामुळे दिल्लीत लाल रंगाचे दर्शन सर्वांना घडले. मोर्च्यामुळे दिल्लीची वाहतूक पार विस्कळीत झाली होती.शेतकरी व कामगारांच्या हाती मागण्यांचे पत्रक होते. घोषणाही तशाच होत्या. महागाई रोखा, सर्वांना रेशनचे स्वस्त धान्य पुरवा, स्वामीनाथन शिफारशीनुसार शेतकऱ्यांना हमीभाव द्या, शेतकरी व शेतमजुरांचे कर्ज माफ करा, बेरोजगारांना रोजगार द्या. शहरांमधे रोजगार हमी लागू करा. दरमहा किमान १८ हजार वेतन द्या, बळजबरीने भू संपादन बंद करा अशा त्या मागण्या आहेत. सिटूच्या कॉम्रेड हेमलता, खा. तपन सेन, किसान सभेचे अशोक ढवळे, हन्नन मौला, शेतमजूर युनियनचे ए.विजय राघवन आदी नेत्यांचीही भाषणे झाली. मोदी सरकारने जाहिरातबाजीवर जितका खर्च केला, तितका शेतकºयांच्या कल्याणासाठी खर्च केला असता तर देशात अशी स्थिती निर्माण झाली नसती, अशी टीका त्यांनी केली.नोव्हेंबरात राजधानीला घेराव घालणारअन्य वक्ते म्हणाले की, आमच्या मागण्या सरकारने मान्य न केल्यास लवकरच राजधानीत याहून मोठे आंदोलन केले जाईल. सर्व कामगार संघटनांची दिल्लीत संयुक्त परिषद २८ सप्टेंबर रोजी होईल. त्यानंतर, २८, २९, ३0 नोव्हेंबरला प्रत्येक राज्यातील लाखो शेतकरी व कामगार रस्त्यांवर उतरून दिल्लीला घेराव घालतील.

टॅग्स :FarmerशेतकरीNew Delhiनवी दिल्ली