शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

लाखो शेतकरी व कामगारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; राजधानीत वाहतुकीची प्रचंड कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 03:56 IST

जनतेला मोदी सरकारने धोका दिला असून, केवळ 0.१ टक्का लोकांसाठी काम करणारे सरकार देशात चालू देणार नाही. मोदी सरकार जाईल, तेव्हाच लोकांना अच्छे दिन तेव्हाच येतील.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : जनतेला मोदी सरकारने धोका दिला असून, केवळ 0.१ टक्का लोकांसाठी काम करणारे सरकार देशात चालू देणार नाही. मोदी सरकार जाईल, तेव्हाच लोकांना अच्छे दिन तेव्हाच येतील. आयुष्य वाचविण्यासाठी मोदी सरकार हटविणे हाच उपाय आहे, असे उद्गार माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी बुधवारी दिल्लीत लाखो शेतकरी व कामगारांच्या मोर्चासमोर काढले.अ. भा. किसान महासभा, सिटू, अ.भा. शेतमजूर संघटना या डाव्या संघटनांच्या नेतृत्वाखाली लाखो शेतकरी व कामगारांनी दिल्लीत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. रामलीला मैदानापासून सुरू झालेल्या विशाल मोर्चात तीन लाखांहून अधिक शेतकरी व कामगार घोषणा देत होते. विविध राज्यांतील शेतकरी व कामगारांबरोबर पूरग्रस्त केरळचे शेतकरीही त्यात होते. लाल सलाम, लाल झेंडे, लाल टोप्या, लाल शर्टस व लाल साड्यांनी सजलेल्या या मोर्च्यामुळे दिल्लीत लाल रंगाचे दर्शन सर्वांना घडले. मोर्च्यामुळे दिल्लीची वाहतूक पार विस्कळीत झाली होती.शेतकरी व कामगारांच्या हाती मागण्यांचे पत्रक होते. घोषणाही तशाच होत्या. महागाई रोखा, सर्वांना रेशनचे स्वस्त धान्य पुरवा, स्वामीनाथन शिफारशीनुसार शेतकऱ्यांना हमीभाव द्या, शेतकरी व शेतमजुरांचे कर्ज माफ करा, बेरोजगारांना रोजगार द्या. शहरांमधे रोजगार हमी लागू करा. दरमहा किमान १८ हजार वेतन द्या, बळजबरीने भू संपादन बंद करा अशा त्या मागण्या आहेत. सिटूच्या कॉम्रेड हेमलता, खा. तपन सेन, किसान सभेचे अशोक ढवळे, हन्नन मौला, शेतमजूर युनियनचे ए.विजय राघवन आदी नेत्यांचीही भाषणे झाली. मोदी सरकारने जाहिरातबाजीवर जितका खर्च केला, तितका शेतकºयांच्या कल्याणासाठी खर्च केला असता तर देशात अशी स्थिती निर्माण झाली नसती, अशी टीका त्यांनी केली.नोव्हेंबरात राजधानीला घेराव घालणारअन्य वक्ते म्हणाले की, आमच्या मागण्या सरकारने मान्य न केल्यास लवकरच राजधानीत याहून मोठे आंदोलन केले जाईल. सर्व कामगार संघटनांची दिल्लीत संयुक्त परिषद २८ सप्टेंबर रोजी होईल. त्यानंतर, २८, २९, ३0 नोव्हेंबरला प्रत्येक राज्यातील लाखो शेतकरी व कामगार रस्त्यांवर उतरून दिल्लीला घेराव घालतील.

टॅग्स :FarmerशेतकरीNew Delhiनवी दिल्ली