शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

Lakhimpur Kheri Violence : 'लखीमपूर खेरी प्रकरणाला हिंदू विरुद्द शीख युद्धात बदलण्याचा डाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 12:55 IST

वरुण गांधी मागील काही काळापासून सरकारच्या धोरणांविरोधात आणि आता नुकत्याच झालेल्या लखीमपूरच्या घटनेवरुन केंद्र सरकारवर टीका करत आहेत.

ठळक मुद्देवरुण गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन लखीमपूर खेरी येथील घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'लखीमपूर खेरी प्रकरणातून हिंदू विरुद्ध शीख असा धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कानपूर - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याप्रकरणी केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, तसेच चौकशीला तो सहकार्य़ करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (Ashish Mishra arrested) आशिष मिश्राला अटक केल्यामुळे येथील आंदोलकांचा संताप काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, भाजपा नेते वरुण गांधी यांनी याप्रकरणावरुन गंभीर आरोप केला आहे. 

वरुण गांधी मागील काही काळापासून सरकारच्या धोरणांविरोधात आणि आता नुकत्याच झालेल्या लखीमपूरच्या घटनेवरुन केंद्र सरकारवर टीका करत आहेत. तसेच, काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या ट्विटर बायोमधून भाजपचे नावही हटवले आहे. त्यांच्या याच टीकेचा फटका त्यांना बसला आहे. खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर ठेवण्यात आलं आहे. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांसोबतची भूमिका कायम ठेवली आहे. लखीमपूर खेरी घटनेवरुन ते सातत्याने सरकारला लक्ष्य करत आहेत. 

वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन लखीमपूर खेरी येथील घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'लखीमपूर खेरी प्रकरणातून हिंदू विरुद्ध शीख असा धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे विधान अनैतिक किंवा खोटं आहे असे नाही. एका पिढीला बरं करण्यासाठी लागलेल्या जखमा पुन्हा ताज्या करणं, तसेच दोष-रेषा निर्माण करणं हे धोकादायक आहे,' असे वरुण गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच, आपल्या क्षुल्लक राजकीय लाभासाठी राष्ट्रीय एकतेला धोका पोहोचवू नये, असेही वरुण यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे. 

आशिष मिश्राची 12 तास चौकशी

पोलिसांकडून आशिष मिश्राची (Ashish Mishra) १२ तास चौकशी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पसार असलेला आशिष मिश्रा आज सकाळी 10 वाजता सहारनपूर पोलीस ठाण्यात हजर झाला. बाईकवरून त्याला एका आमदाराने पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याची 12 तास चौकशी सुरु होती. या काळात त्याला 40 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांवर गाडी चढविताना तो कुठे होता, हे देखील विचारण्यात आले. यावर तो तेव्हा कुठे होता हे पुराव्यानिशी सांगू शकला नाही.  

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारVarun Gandhiवरूण गांधीPoliceपोलिसHinduहिंदूBJPभाजपा