शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

Lakhimpur Kheri Incident: आतापर्यंत तुम्ही किती आरोपींना अटक केली?; सुप्रीम कोर्टाकडून योगी सरकारची कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 6:51 AM

Lakhimpur Kheri Violence hearing in supreme court: लखीमपूर प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या प्रकरणाचा तपास समाधानकारक वाटत नाही, अशा तक्रारी दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केल्या होत्या.

नवी दिल्ली : लखीमपूरमध्ये वाहनाखाली शेतकरी चिरडल्याच्या प्रकरणाचा तपास नीट होत नसल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत, असे सुनावत या प्रकरणात कोण आरोपी आहेत? किती आरोपींना अटक केली, ही माहिती उद्या शुक्रवारपर्यंत सादर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारला दिले. न्यायालयाच्या या आदेशामुळे केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याला अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे. 

लखीमपूर प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या प्रकरणाचा तपास समाधानकारक वाटत नाही, अशा तक्रारी दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केल्या होत्या. त्यांच्या तक्रारींचे न्यायालयाने जनहित याचिकेत रूपांतर केले आणि त्यावर सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्या. सूर्यकांत व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. 

घटनास्थळी गोळीबार झाला नाही, मृतदेहांतही गोळ्या आढळल्या नाहीत, असे पोलीस सांगत होते. मात्र गोळीबार झाला होता आणि आम्हाला तिथे बुलेट सापडल्या आहेत, असे पोलिसांनी प्रथमच मान्य केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा आणि गोळीबार करण्याचा कट होता का, हे तपासले जाईल. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घालताच आशिष मिश्राला लगेचच हजर व्हावे, असे समन्स पोलिसांनी जारी केले. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयyogi adityanathयोगी आदित्यनाथ