शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

लयभारी! शेतात काम करण्यासाठी मजुरांची गरज; शेतकऱ्याने पाठवली थेट विमानाची तिकिटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 09:42 IST

गावी गेलेल्या कामगारांना परत कामावर बोलावणं हे व्यावसायिकांसाठी आव्हान आहे. मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी नानाविध शक्कल लढवली जात आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 30 लाखांवर पोहोचली आहे. तर 50 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला अन् आपलं गाव गाठलं. गावी गेलेल्या कामगारांना परत कामावर बोलावणं हे व्यावसायिकांसाठी आव्हान आहे. मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी नानाविध शक्कल लढवली जात आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.

लॉकडाऊनमध्ये घरी गेलेल्या प्रवासी मजुरांची आता कमतरता भासू लागली आहे. दिल्लीच्या शेतकऱ्यांना देखील आता शेतात काम करण्यासाठी मजुरांची आवश्यकता आहे. शेतात काम करायला मजूर नाहीत म्हणून एका शेतकऱ्याने मजुरांना थेट विमानाचं तिकीट पाठवल्याची घटना समोर आली आहे. पप्‍पन सिंह असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी मजुरांसाठी विमानाचं तिकीट बूक केलं आहे. पप्‍पन सिंह यांची मशरुमची शेती आहे. शेतात काम करण्यासाठी मजुरांची गरज आहे. 

पप्पन यांनी 20 प्रवासी मजुरांसाठी विमानाचं तिकीट बूक केलं आहे. हे प्रवासी मजूर बिहारमधील पाटणा विमानतळावरून लवकरच दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी रवाना होतील. मिळालेल्या माहितीनुसार, पप्पन सिंह दिल्लीतील तिगिपूर गावचे रहिवासी आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून मशरुमची शेती करतात. कित्येक वर्षांपासून अनेक मजूर त्यांच्या शेतात काम करत आहेत. मात्र लॉकडाऊनमध्ये मजूर बिहारला आपल्या गावी निघून गेले. पप्‍पन सिंह यांनी या सर्व मजुरांसाठी पहिल्यांदा ट्रेनचं तिकीट बूक करण्याचा विचार केला. 

पुढील दीड महिन्यांपर्यंत कोणतीही ट्रेन उपलब्ध नाही. त्यामुळे पप्पन यांनी 20 प्रवासी मजुरांसाठी विमानाचं तिकीट बूक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधीही काही व्यावसायिकांनी मजुरांना परत बोलवण्यासाठी विमानाची तिकिटे पाठवली आहेत. काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या मजुरांना परत कामावर बोलावण्यासाठी त्यांच्या मालकाने थेट विमानाची तिकिटे बुक केली होती. तिकिटे मजुरांना पाठवण्यात आली. बिल्डरने उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये राहणाऱ्या मजुरांना परत कामावर हजर होण्यासाठी ही सोय केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

फ्लायओव्हरचा भाग कोसळल्याचा व्हायरल फोटो ना मुंबईचा, ना पुण्याचा, ना बंगळुरूचा... जाणून घ्या सत्य 

"...असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही", शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल

"काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार"

"मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय", Video शेअर करत मोदी झाले भावूक

कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचं मंगल करावं, शरद पवारांचं गणरायाला साकडं

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याairplaneविमानFarmerशेतकरीdelhiदिल्लीBiharबिहारagricultureशेती