शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 19:34 IST

मणिपूर सरकारने सोमवारी आढावा घेतल्यानंतर राज्यातील सात जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा २० नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आली आहे.

मणिपूरमधील हिंसाचार आणि निदर्शने अजूनही थांबलेली नाहीत. जिरीबाममध्ये तीन महिला आणि तीन मुलांची हत्या झाल्यानंतर इंफाळ खोऱ्यात मोठा गोंधळ उडाला आहे. सोमवारी, मणिपूर इंटिग्रिटीवरील समन्वय समितीने कर्फ्यूचे उल्लंघन करत इंफाळ पश्चिम जिल्ह्यात निषेध केला. या काळात शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले. तर मणिपूर सरकारने राज्यातील सात जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बुधवारपर्यंत स्थगित केली आहे.

मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार

अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, आंदोलकांनी लामफेलपत येथील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हल्ला केला. यानंतर कार्यालयाच्या मुख्य गेटला साखळीने कुलूप लावले. याशिवाय आंदोलकांनी टाकील येथील इन्स्टिट्यूट ऑफ बायोरिसोर्सेस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या मुख्य कार्यालयाचे दरवाजे आणि अर्थशास्त्र व सांख्यिकी संचालनालयाच्या गेटलाही टाळे ठोकले. संशयितांवर जिरीबाम जिल्ह्यात तीन महिला आणि तीन मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे.

कोकोमी संघटना 'कुकी जो हमर' उग्रवाद्यांवर लष्करी कारवाईची मागणी करत आहे. इंफाळच्या खवैरामबंद बाजारात गेल्या तीन दिवसांपासून संघटनेचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सामील झालेले लायमयम सुरजकांता म्हणाले, "जिरीबाममध्ये कुकी जो हमर उग्रवाद्यांनी तीन महिला आणि तीन मुलांची केलेली क्रूर हत्या आम्ही सहन करणार नाही. केंद्र सरकारने कारवाई करावी. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी."

मणिपूर इंटिग्रिटीवरील समन्वय समिती ही मेईतेई समुदायाची संघटना आहे. इम्फाळ खोऱ्यात या वांशिक गटाचे प्राबल्य आहे. इंफाळ खोऱ्यात एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.

११ नोव्हेंबर रोजी रोझी साहा मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यातील एका कॅम्पमधून बेपत्ता झाल्या होत्या. यानंतर शुक्रवारी जिरी नदीजवळ तीन जणांचे मृतदेह आढळून आले. आसाममधील कछार जिल्ह्यातील बराक नदीत रविवारी आणखी दोन मृतदेह सापडले. हे मृतदेह बेपत्ता लोकांचे मानले जातात. आसामच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत एकूण पाच मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, सुरक्षा दल आणि शस्त्रधारी यांच्यातील चकमकीत १० कुकी तरुणांनाही आपला जीव गमवावा लागत आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार