शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

'मिस्टर खरगे, तुम्हाला पंतप्रधान व्हायचंय? काँग्रेस हे सहन करू शकेल? देवेगौडांची बोचरी टीका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 18:11 IST

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी गुरुवारी राज्यसभेतून काँग्रेस हायकमांडवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान आणि जेडी(एस) प्रमुख एचडी देवेगौडा यांनी गुरुवारी राज्यसभेतून काँग्रेस हायकमांडवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना थेट विचारले की, तुम्हाला या देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे का? पण, काँग्रेस हे सहन करू शकेल? असा थेट सवालही त्यांनी यावेळी केला.

राज्यसभेतील निवृत्त सदस्यांच्या निरोपात सहभागी होताना JD(S) प्रमुखांनी खरगे यांच्या विधानावर आक्षेप घेतला. खरगे म्हणाले होते की, देवेगौडा यांनी नेहमी भाजपची साथ दिली. यावर देवेगौडा म्हणाले, आमचा भाजपला पाठिंबा, हा आमचा पक्ष उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या काही काँग्रेसवाल्यांपासून वाचण्यासाठी आहे. यावेळी त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंचा उल्लेख एक स्वच्छ प्रतिमेचा नेता असे केले. 

काँग्रेसवर टीकादेवेगौडा यांनी 2019 मध्ये काँग्रेस-जेडी(एस) सरकार पडल्याबद्दल काही काँग्रेस नेत्यांना जबाबदार धरले. 2019 मधील एक घटना सांगताना देवेगौडा यांनी दावा केला की, कुमारस्वामी मुख्यमंत्री व्हावेत असा काँग्रेस हायकमांडचा आग्रह होता. पण, मी कुमारस्वामींना नव्हे तर खरगे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा सल्ला दिला होता. पुढे कुमारस्वामींचे सरकार अवघ्या 13 महिन्यांत कोणी पाडले? यात काँग्रेस नेत्यांचाच हात होता.

देवेगौडा पुढे म्हणाले की, मी आयुष्यात वैयक्तिक फायदा मिळवण्यासाठी कधीही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही. काही काँग्रेसवाल्यांना पक्ष उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे मला माझा पक्ष वाचवण्यासाटी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घ्यावा लागला, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRajya Sabhaराज्यसभाJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस