शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

Pinarayi Vijayan : "काँग्रेस भाजपाची 'बी-टीम'..."; केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन राहुल गांधींवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 10:32 IST

Pinarayi Vijayan And Rahul Gandhi : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी काँग्रेसवरभाजपाची 'बी-टीम' असल्याचा गंभीर आरोपही केला. राहुल गांधी यांनी "केंद्राच्या सर्व तपास यंत्रणांनी देशातील सर्व विरोधी नेत्यांविरुद्ध कारवाई केली आणि त्यांना अटकही केली, मात्र केरळच्या मुख्यमंत्र्यांवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही" असं म्हटलं होतं.

राहुल गांधींच्या या विधानाला उत्तर देताना मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, "राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष प्रत्यक्षात भाजपाची बी-टीम आहेत. काही लोक स्वतःच्या अनुभवातूनही काही शिकत नाहीत. असे लोक सामान्य नसतात, तर ते एक दुर्मिळ उदाहरण असतात. हे अशा लोकांच्या बाबतीत घडतं ज्यांना सहसा गोष्टी समजून घेण्याची क्षमता नसते आणि राहुल गांधी याच श्रेणीत येतात."

"केजरीवालांना मिळालेली क्लीन चिट राहुल गांधींसाठी मोठा धक्का"

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, "राहुल गांधींनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते, परंतु न्यायालयाने त्यांना सर्व आरोपातून मुक्त करत क्लीन चिट दिली. न्यायालयाचा हा निकाल राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का होता. असं असूनही ते पुन्हा तीच चूक करत आहेत. म्हणूनच मी म्हणालो की, ते आपल्या अनुभवातून धडा घेत नाहीत."

"भाजपा-काँग्रेस युती यापूर्वी अनेकदा झाली"

मुख्यमंत्र्यांनी असा दावा केला की, राज्यात यापूर्वी अनेकवेळा काँग्रेस आणि भाजपाची  युती पाहायला मिळाली आहे. मात्र आगामी निवडणुकीत काय निकाल लागेल, हे सध्या पूर्णपणे स्पष्ट नाही. हे दोन्ही पक्ष एकाच पद्धतीने एलडीएफ (LDF) ला विरोध करतात आणि त्यांच्यात ताळमेळ असल्याचं दिसून येतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Kerala CM Vijayan Slams Rahul Gandhi, Calls Congress BJP's 'B-Team'

Web Summary : Kerala CM Pinarayi Vijayan accused Congress and Rahul Gandhi of being BJP's 'B-Team'. He criticized Rahul's remarks about lack of action against him, citing Kejriwal's clean chit as a blow to Congress. Vijayan also claimed past Congress-BJP alliances in the state.
टॅग्स :KeralaकेरळRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण