शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

जागा २०, पण भाजपानं ताकद लावली 'या' ६ ठिकाणी; ‘इंडिया’ आघाडीचे पक्ष आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 10:55 IST

भाजप राहिला बाजूला आणि या दोन घटक पक्षांतच विविध मतदारसंघांत जुंपल्याचे चित्र सध्या दिसते आहे. तर, या वर्षात तीनदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळचा दौरा केला.

तिरुअनंतपुरम : यापूर्वीच्या निवडणुकांत कर्नाटक वगळता दक्षिण भारतात भाजप अस्तित्वहीन पक्ष होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून भाजपने पद्धतशीरपणे दक्षिणी राज्यांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूप्रमाणेच केरळ या राज्याचाही त्यात समावेश आहे. सध्या भाजपने या राज्यात सहा मतदारसंघांकडे लक्ष केंद्रित केले असले तरी पक्षाचा मुख्य उद्देश राज्यात चंचूप्रवेश करण्याचाच आहे. मात्र, इंडिया आघाडीतील दोन घटक पक्ष काँग्रेस आणि सीपीआय या राज्यातील सर्व २० लोकसभा मतदारसंघांत एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. त्यात राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघाचाही समावेश आहे.

राहुल हे मोठे नेते आहेत त्यांनी मित्र पक्षाविरुद्ध निवडणूक लढविण्याऐवजी देशात इतरत्र थेट भाजपाशी दोन हात करावे, असे आवाहन सीपीआयने केले होते. भाजप राहिला बाजूला आणि या दोन घटक पक्षांतच विविध मतदारसंघांत जुंपल्याचे चित्र सध्या दिसते आहे. तर, या वर्षात तीनदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळचा दौरा केला. त्याचे मतांत किती रूपांतर होते, हे पाहावे लागेल. केरळमध्ये दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी राज्यातील सर्व मतदारसंघांत मतदान होणार आहे.

या जागांवर भाजपचे लक्ष्य पलक्कड, कासारगोड, थ्रिसूर, पथनमथीहत्ता व थिरुअनंतपुरम. दोन नगरपालिका आणि २० पंचायतींवर सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपने केरळमध्ये २०१६ साली थिरुअनंतपुरम विधानसभेची जागा जिंकली होती; पण २०२१ साली झालेल्या निवडणुकीत ती टिकवता आली नाही.

या मतदारसंघांवर फाेकसभाजपने सहा असे मतदारसंघ निश्चित केले आहेत, जिथे भाजपने मागच्या निवडणुकीत किमान २५ टक्के मते मिळवली होती. थिरुअनंतपुरम आणि थ्रिसूरसह हे मतदारसंघ भाजपने ए कॅटेगरीत टाकलेले आहेत. थिरुअनंतपुरममध्ये काँग्रेसच्या शशी थरूर यांच्या विरोधात भाजपने आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांना रिंगणात उतरवले आहे. सीपीआयतर्फे पन्नीयन रवींद्रन लढत आहेत. या मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने ३० टक्के एवढी लक्षणीय मते मिळवली होती.

या ठिकाणी आलटून पालटून संधीथ्रिसूर मतदारसंघही भाजपने प्रतिष्ठेचा बनवला असून, येथून सिने अभिनेते सुरेश गोपी भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. सीपीआयचे व्ही. एस. सुनील कुमार आणि काँग्रेसचे के. मुरलीधरन हेही शर्यतीत आहेत. गेल्या ७२ वर्षांत या मतदारसंघात सीपीआय आणि काँग्रेसचे उमेदवार आलटून पालटून निवडून आले आहेत. यंदा मात्र भाजपला वाटतेय की, या मतदारसंघात आपल्याला संधी आहे.

टॅग्स :kerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024BJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४