शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 10:26 IST

'राहुल गांधी यांना का निवडून दिलंत? त्यांना संसदेत का पाठवलं?'

ठळक मुद्दे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक असल्याचं मत गुहा यांनी व्यक्त केलं.राहुल गांधी यांना का निवडून दिलंत? त्यांना संसदेत का पाठवलं? असा सवालही त्यांनी केला आहे.

कोझिकोड - प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक असल्याचं मत रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. तसेच राहुल गांधी यांना का निवडून दिलंत? त्यांना संसदेत का पाठवलं? असा सवालही त्यांनी केला आहे. केरळच्या कोझिकोड येथे आयोजित करण्यात आलेल्या साहित्य महोत्सवात गुहा यांनी असं म्हटलं आहे. 

'व्यक्तिगतरित्या मी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात नाही. राहुल सभ्य आहेत. चांगले व्यक्ती आहेत. पण सध्या यंग इंडिया पाचव्या पिढीच्या वंशजाला स्वीकारत नाही. त्यामुळे तुम्ही राहुल गांधी यांना का निवडून दिलंत? त्यांना संसदेत का पाठवलं?, राहुल गांधी यांना निवडून देणं ही केरळच्या जनतेची भयंकर चूक आहे' असं रामचंद्र गुहा यांनी म्हटलं आहे. कठोर परिश्रम करणारे आणि सेल्फ मेड पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर पाचव्या पिढीतील राहुल गांधींचा निभाव लागूच शकत नसल्याचं देखील गुहा यांनी सांगितलं आहे. 

रामचंद्र गुहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिश्रमाने त्यांची प्रतिमा तयार केली आहे. मोदींनी 15 वर्षे राज्य चालवलं आहे. त्यांना प्रशासकीय अनुभव आहे. ते प्रचंड कष्टाळू आहेत. युरोपात जाऊनही ते कधीच सुट्टी घालवत नाही असा टोला देखील राहुल गांधींना लगावला आहे. 2024 मध्ये राहुल गांधींना निवडून देण्याची चूक करू नका. तसं केल्यास राहुल गांधी हे नरेंद्र मोदींना फायदाच पोहोचवतील. नरेंद्र मोदी हे राहुल गांधी नाहीत हाच त्यांचा फायदा आहे. केरळच्या जनतेने राहुल गांधी यांना निवडून देऊन मोठी चूक केली आहे असं रामचंद्र गुहा यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

'देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा असणं गरजेचं'

मुंबई-पुणे ‘हायपर लूप’ प्रकल्प ‘नको रे बाबा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका

‘मेगा’ भरती ही भाजपाची मेगा चूक; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कबुली

मुंबईत २६ जानेवारीपासून नाइटलाइफ सुरू; आदित्य ठाकरेंचा प्रयोग यशस्वी होणार?

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' विभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णत: बंद

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKeralaकेरळcongressकाँग्रेसElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी