शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

मुस्लिम बांधवांच्या रमजानसाठी हिंदू देतोय जागता पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2016 12:19 IST

उत्तरप्रदेशातील मुबारकपूरमध्ये आपल्या मुस्लिम बांधवाना वेळेत पहाटे उठता यावं यासाठी गुलाब यादव आपल्या 12 वर्षाच्या मुलासोबत पहाटेपासूनच जागे असतात

ऑनलाइन लोकमत - 
कानपूर, दि. 21 - रमजानमध्ये उपवास असल्याने मुस्लिमांना सकाळी लवकर उठावं लागतं. रमजानमध्ये दिवसभर पाणीही न पिता रोजे केले जातात. दिवस उगवण्याच्या आधी म्हणजे पहाटे पाचच्या आधीच नाष्टा, जेवण केले जाते. त्यामुळे साहजिकच पहाटे लवकर उठावे लागते. अनेकदा ही जबाबदारी घरातील महिलेवर असते. पण उत्तरप्रदेशातील मुबारकपूरमध्ये मुस्लिम बांधवाना वेळेत पहाटे उठता यावं यासाठी गुलाब यादव नामक इसमाने ही जबाबदारी स्वीकारली असून ते त्यांच्या 12 वर्षाच्या मुलासोबत पहाटेपासूनच जागे असतात. 
 
उत्तरप्रदेशातील मुबारकपूर बनारसी साडी कामगारांसाठी प्रसिद्द आहे. पहाटेचे 1 वाजले आहेत, आणि गावात फक्त दोनच व्यक्ती जाग्या आहेत. रमजानमध्ये गुलाब यादव यांचा दिवस मध्यरात्री एकपासूनच सुरू होतो आणि त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिषेकही जागा असतो. ना त्यांचा उपवास असतो, ना ते धर्माने मुस्लिम..! पण तरीही मुस्लिम बांधवांना पहाटे वेळेत उठता यावं या जबाबदारीच्या जाणीवेमुळे यादव  व त्यांचा मुलगा जागे राहून घरोघरी जाऊन सर्वांना लवकर उठवतात. 
 
गुलाब यादव आणि अभिषेक 1 ते 3 वाजेपर्यंत सर्वांना उठवण्याचं काम करत असतात. विशेष म्हणजे एका घरातील सर्व व्यक्ती जोपर्यत उठत नाही तोपर्यंत ते दुस-या घराकडे वळत नाहीत. गुलाब यादव यांच्या कुटुंबात 1975 पासून ही परंपरा सुरु आहे.
मात्र हे का आणि कसं सुरु झालं ? हे गुलाब यादव यांना आठवतही नाही. 'यामुळे मनाला शांतता मिळत असावी. माझ्या वडिलांनी हे सुरु केलं, त्यानंतर माझ्या मोठ्या भावाने काही वर्ष ही परंपरा सुरु ठेवली आणि त्यानंतर मी आता हे काम कायम ठेवलं आहे. प्रत्येक रमजानला मी येथे येतो आणि सर्वांना उठवतो', असं गुलाब यादव सांगतात.
 
गुलाब यादव रोजंदारीवर काम करतात. ते दिल्लीमध्ये असतात मात्र रमजानच्या महिन्यात ते गावी येतात. 'मी चार वर्षांचा होतो तेव्हा यादव कुटुंबाने ही परंपरा सुरु केली', असं त्यांचा शेजारी शफीक सांगतो. 'हे खुपच कौतुकास्पद आहे. ते संपुर्ण गावाला फेरी मारतात. त्यासाठी त्यांना सुमारे दीड तास लागतो. मात्र एक फेरी पूर्ण झाल्यावर ते दुसरी फेरीदेखील मारतात. कोणीही सेहरी केल्याशिवाय घराबाहेर पडू नये याची ते खात्री घेतात. याशिवाय दुसरं पुण्य काय', असंही शफीक यांनी म्हटलं आहे.