शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुस्लिम बांधवांच्या रमजानसाठी हिंदू देतोय जागता पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2016 12:19 IST

उत्तरप्रदेशातील मुबारकपूरमध्ये आपल्या मुस्लिम बांधवाना वेळेत पहाटे उठता यावं यासाठी गुलाब यादव आपल्या 12 वर्षाच्या मुलासोबत पहाटेपासूनच जागे असतात

ऑनलाइन लोकमत - 
कानपूर, दि. 21 - रमजानमध्ये उपवास असल्याने मुस्लिमांना सकाळी लवकर उठावं लागतं. रमजानमध्ये दिवसभर पाणीही न पिता रोजे केले जातात. दिवस उगवण्याच्या आधी म्हणजे पहाटे पाचच्या आधीच नाष्टा, जेवण केले जाते. त्यामुळे साहजिकच पहाटे लवकर उठावे लागते. अनेकदा ही जबाबदारी घरातील महिलेवर असते. पण उत्तरप्रदेशातील मुबारकपूरमध्ये मुस्लिम बांधवाना वेळेत पहाटे उठता यावं यासाठी गुलाब यादव नामक इसमाने ही जबाबदारी स्वीकारली असून ते त्यांच्या 12 वर्षाच्या मुलासोबत पहाटेपासूनच जागे असतात. 
 
उत्तरप्रदेशातील मुबारकपूर बनारसी साडी कामगारांसाठी प्रसिद्द आहे. पहाटेचे 1 वाजले आहेत, आणि गावात फक्त दोनच व्यक्ती जाग्या आहेत. रमजानमध्ये गुलाब यादव यांचा दिवस मध्यरात्री एकपासूनच सुरू होतो आणि त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिषेकही जागा असतो. ना त्यांचा उपवास असतो, ना ते धर्माने मुस्लिम..! पण तरीही मुस्लिम बांधवांना पहाटे वेळेत उठता यावं या जबाबदारीच्या जाणीवेमुळे यादव  व त्यांचा मुलगा जागे राहून घरोघरी जाऊन सर्वांना लवकर उठवतात. 
 
गुलाब यादव आणि अभिषेक 1 ते 3 वाजेपर्यंत सर्वांना उठवण्याचं काम करत असतात. विशेष म्हणजे एका घरातील सर्व व्यक्ती जोपर्यत उठत नाही तोपर्यंत ते दुस-या घराकडे वळत नाहीत. गुलाब यादव यांच्या कुटुंबात 1975 पासून ही परंपरा सुरु आहे.
मात्र हे का आणि कसं सुरु झालं ? हे गुलाब यादव यांना आठवतही नाही. 'यामुळे मनाला शांतता मिळत असावी. माझ्या वडिलांनी हे सुरु केलं, त्यानंतर माझ्या मोठ्या भावाने काही वर्ष ही परंपरा सुरु ठेवली आणि त्यानंतर मी आता हे काम कायम ठेवलं आहे. प्रत्येक रमजानला मी येथे येतो आणि सर्वांना उठवतो', असं गुलाब यादव सांगतात.
 
गुलाब यादव रोजंदारीवर काम करतात. ते दिल्लीमध्ये असतात मात्र रमजानच्या महिन्यात ते गावी येतात. 'मी चार वर्षांचा होतो तेव्हा यादव कुटुंबाने ही परंपरा सुरु केली', असं त्यांचा शेजारी शफीक सांगतो. 'हे खुपच कौतुकास्पद आहे. ते संपुर्ण गावाला फेरी मारतात. त्यासाठी त्यांना सुमारे दीड तास लागतो. मात्र एक फेरी पूर्ण झाल्यावर ते दुसरी फेरीदेखील मारतात. कोणीही सेहरी केल्याशिवाय घराबाहेर पडू नये याची ते खात्री घेतात. याशिवाय दुसरं पुण्य काय', असंही शफीक यांनी म्हटलं आहे.