शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

'थोडं शांत रहा, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका'; शशी थरुर यांचा एस. जयशंकर यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 20:07 IST

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांवर टीका केली होती.

नवी दिल्ली :भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. ते सातत्याने भारत-पाकिस्तान (India-Pakistan), भारत-चीन (India-China) आणि पाश्चात्य देशांवर (Westerns Countries) टीका करतात. त्यांचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. आता याच टीकेवरुन काँग्रेस नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी त्यांना थोडं शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.

मीडियाशी संवाद साधताना शशी थरुर म्हणाले की, 'जयशंकर माझे जुने मित्र आहेत. त्यांना एक सल्ला देऊ इच्छितो. त्यांनी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं टाळावं. पाश्चिमात्य देशांकडून येणाऱ्या कमेंट्स त्यांनी सामान्य पद्धतीने घ्याव्यात, प्रत्येक वेळेस त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. यामुळे आपलेच नुकसान होत आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी थोडं शांत राहावं,' असा सल्ला थरुर यांनी दिला.

परराष्ट्र मंत्र्यांची पाश्चिमात्य देशांवर टीकापरराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी पाश्चिमात्य देशांना टोला लगावला होता. 'पाश्चात्य देशांना इतर देशांवर भाष्य करण्याची वाईट सवय आहे.' असे ते म्हणाले होते. परराष्ट्र मंत्री रविवारी बंगळुरू येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत भाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते. त्यावेळी राहुल गांधींना टोमणे मारताना त्यांनी त्यांच्या अनुभवातून शिकावे, अन्यथा इतर लोकही त्यांच्यावर भाष्य करू लागतील, असेही ते म्हणाले. 

अमेरिका आणि जर्मनीची प्रतिक्रियाकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकीच्या अपात्रतेवर जर्मनी आणि अमेरिकेने वक्तव्य केले. आम्ही या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया जर्मनीकडून आली होती. तसेच, अमेरिकेनेही या प्ररणावर भाष्य केले होते. त्यांच्या या कमेंट्सवरच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरShashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाcongressकाँग्रेसIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीनAmericaअमेरिका