शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

'थोडं शांत रहा, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका'; शशी थरुर यांचा एस. जयशंकर यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 20:07 IST

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांवर टीका केली होती.

नवी दिल्ली :भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. ते सातत्याने भारत-पाकिस्तान (India-Pakistan), भारत-चीन (India-China) आणि पाश्चात्य देशांवर (Westerns Countries) टीका करतात. त्यांचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. आता याच टीकेवरुन काँग्रेस नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी त्यांना थोडं शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.

मीडियाशी संवाद साधताना शशी थरुर म्हणाले की, 'जयशंकर माझे जुने मित्र आहेत. त्यांना एक सल्ला देऊ इच्छितो. त्यांनी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं टाळावं. पाश्चिमात्य देशांकडून येणाऱ्या कमेंट्स त्यांनी सामान्य पद्धतीने घ्याव्यात, प्रत्येक वेळेस त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. यामुळे आपलेच नुकसान होत आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी थोडं शांत राहावं,' असा सल्ला थरुर यांनी दिला.

परराष्ट्र मंत्र्यांची पाश्चिमात्य देशांवर टीकापरराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी पाश्चिमात्य देशांना टोला लगावला होता. 'पाश्चात्य देशांना इतर देशांवर भाष्य करण्याची वाईट सवय आहे.' असे ते म्हणाले होते. परराष्ट्र मंत्री रविवारी बंगळुरू येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत भाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते. त्यावेळी राहुल गांधींना टोमणे मारताना त्यांनी त्यांच्या अनुभवातून शिकावे, अन्यथा इतर लोकही त्यांच्यावर भाष्य करू लागतील, असेही ते म्हणाले. 

अमेरिका आणि जर्मनीची प्रतिक्रियाकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकीच्या अपात्रतेवर जर्मनी आणि अमेरिकेने वक्तव्य केले. आम्ही या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया जर्मनीकडून आली होती. तसेच, अमेरिकेनेही या प्ररणावर भाष्य केले होते. त्यांच्या या कमेंट्सवरच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरShashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाcongressकाँग्रेसIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीनAmericaअमेरिका