शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

शेतकऱ्यावर ७ लाखांचं कर्ज अन् ४६ लाखांनी झाला शेत जमिनीचा लिलाव, कुटुंबावर आत्महत्येची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 22:56 IST

जमीन जप्त करण्याचे आदेश दिल्यानंतरही शेतकरी कुटुंबाकडे बँकेत जमा करण्यासाठी पैसे नाहीत.

दौसा – शेतकऱ्यांसाठी प्रत्येक पक्ष मोठमोठी आश्वासनं देते. सरकार आश्वासन पूर्ण करण्याची घोषणाही करते परंतु प्रत्यक्षात वस्तूस्थिती खूप वेगळी असते. ही बातमी रामगढच्या दौसा येथील आहे. याठिकाणी कर्जबाजारी शेतकऱ्याची जमीन जप्त करून मंगळवारी त्या जमिनीचा लिलावही करण्यात आला. त्यामुळे शेतकरी कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, राजस्थानमधील काँग्रेस सरकार कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्तेवर आले, मात्र ३ वर्षानंतरही ते पूर्ण केले नाही असा आरोप भाजपाने केला आहे. आजही मोठ्या प्रमाणात राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत.

जमीन गमावलेले शेतकरी कुटुंब दौसा जिल्ह्यातील रामगढ पचवाडा येथील आहेत. या शेतकऱ्याने रामगढ पचवाडा येथील राजस्थान मरुधारा ग्रामीण बँकेतून केसीसीचे कर्ज घेतले होते. सन २०१७ नंतर शेतकऱ्याने ७ लाखांहून जास्त कर्जाची परतफेड केली नाही. KCC कर्ज घेतलेल्या कर्जदार शेतकऱ्याचाही मृत्यू झाला. यानंतर बँकेने मृत शेतकऱ्याची मुले राजू लाल आणि पप्पू लाल यांना पैसे जमा करण्यासाठी अनेक नोटिसा दिल्या. परंतु शेतकरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व शासनाकडून कर्जमाफीची प्रतिक्षा असल्याने पैसे जमा करु शकले नाहीत. सरतेशेवटी, रामगढ पचवाडा एसडीएम कार्यालयाने जमीन जप्त करण्याचे आदेश दिले.

७ लाखांचे कर्ज, ४६ लाख ५१ हजारांनी जमिनीचा लिलाव

जमीन जप्त करण्याचे आदेश दिल्यानंतरही शेतकरी कुटुंबाकडे बँकेत जमा करण्यासाठी पैसे नाहीत. अशा स्थितीत जमीन जप्तीनंतर मंगळवारी लिलावाची प्रक्रियाही पूर्ण झाली. अशा परिस्थितीत शेतकरी कजोड मीना यांच्या जमिनीचा लिलाव करण्यात आला. शेतकऱ्याची जमीन लिलाव ४६ लाख ५१ हजारांना झाला. ही जमीन किरण शर्मा रा.मंदावरी यांनी लिलावात खरेदी केली.

शेतकरी आपल्या जमिनीला आई मानतो. अशा स्थितीत जमिनीचा लिलाव झाला तेव्हा या शेतकरी कुटुंबाची काय अवस्था झाली असेल, याचा सहज अंदाज येतो. शेतकरी कुटुंबाची अवस्था बिकट होती. आता जायचे तर कुठे जायचे असा सवाल शेतकऱ्याचं कुटुंब विचारत होतं. आता कुटुंब कसं सांभाळावं? या प्रश्नानं शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्येसारखा निर्णय घेण्यास मजबूर झाले.

टॅग्स :Farmerशेतकरी