शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यावर ७ लाखांचं कर्ज अन् ४६ लाखांनी झाला शेत जमिनीचा लिलाव, कुटुंबावर आत्महत्येची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 22:56 IST

जमीन जप्त करण्याचे आदेश दिल्यानंतरही शेतकरी कुटुंबाकडे बँकेत जमा करण्यासाठी पैसे नाहीत.

दौसा – शेतकऱ्यांसाठी प्रत्येक पक्ष मोठमोठी आश्वासनं देते. सरकार आश्वासन पूर्ण करण्याची घोषणाही करते परंतु प्रत्यक्षात वस्तूस्थिती खूप वेगळी असते. ही बातमी रामगढच्या दौसा येथील आहे. याठिकाणी कर्जबाजारी शेतकऱ्याची जमीन जप्त करून मंगळवारी त्या जमिनीचा लिलावही करण्यात आला. त्यामुळे शेतकरी कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, राजस्थानमधील काँग्रेस सरकार कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्तेवर आले, मात्र ३ वर्षानंतरही ते पूर्ण केले नाही असा आरोप भाजपाने केला आहे. आजही मोठ्या प्रमाणात राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत.

जमीन गमावलेले शेतकरी कुटुंब दौसा जिल्ह्यातील रामगढ पचवाडा येथील आहेत. या शेतकऱ्याने रामगढ पचवाडा येथील राजस्थान मरुधारा ग्रामीण बँकेतून केसीसीचे कर्ज घेतले होते. सन २०१७ नंतर शेतकऱ्याने ७ लाखांहून जास्त कर्जाची परतफेड केली नाही. KCC कर्ज घेतलेल्या कर्जदार शेतकऱ्याचाही मृत्यू झाला. यानंतर बँकेने मृत शेतकऱ्याची मुले राजू लाल आणि पप्पू लाल यांना पैसे जमा करण्यासाठी अनेक नोटिसा दिल्या. परंतु शेतकरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व शासनाकडून कर्जमाफीची प्रतिक्षा असल्याने पैसे जमा करु शकले नाहीत. सरतेशेवटी, रामगढ पचवाडा एसडीएम कार्यालयाने जमीन जप्त करण्याचे आदेश दिले.

७ लाखांचे कर्ज, ४६ लाख ५१ हजारांनी जमिनीचा लिलाव

जमीन जप्त करण्याचे आदेश दिल्यानंतरही शेतकरी कुटुंबाकडे बँकेत जमा करण्यासाठी पैसे नाहीत. अशा स्थितीत जमीन जप्तीनंतर मंगळवारी लिलावाची प्रक्रियाही पूर्ण झाली. अशा परिस्थितीत शेतकरी कजोड मीना यांच्या जमिनीचा लिलाव करण्यात आला. शेतकऱ्याची जमीन लिलाव ४६ लाख ५१ हजारांना झाला. ही जमीन किरण शर्मा रा.मंदावरी यांनी लिलावात खरेदी केली.

शेतकरी आपल्या जमिनीला आई मानतो. अशा स्थितीत जमिनीचा लिलाव झाला तेव्हा या शेतकरी कुटुंबाची काय अवस्था झाली असेल, याचा सहज अंदाज येतो. शेतकरी कुटुंबाची अवस्था बिकट होती. आता जायचे तर कुठे जायचे असा सवाल शेतकऱ्याचं कुटुंब विचारत होतं. आता कुटुंब कसं सांभाळावं? या प्रश्नानं शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्येसारखा निर्णय घेण्यास मजबूर झाले.

टॅग्स :Farmerशेतकरी