शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

भाजपाचे नाराज आमदार आमच्या संपर्कात, काँग्रेसच्या दाव्याने कर्नाटकमध्ये खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 11:48 IST

येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून शांत असलेल्या कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा  उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

बंगळुरू - येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून शांत असलेल्या कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा  उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपाचे काही नाराज आमदार काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस नेते आमदार सतीश जारकीहोळी यांनी केला आहे. जारकीहोळी यांच्या या दाव्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात खळबळ माजण्याची चिन्हे दिसू लागली आहे. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, ''भाजपाच्या काही असंतुष्ट आमदरांनी आमच्या हायकमांडशी संपर्क साधला आहे. आता पुढे काय होते हे पाहावे लागेल. काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आम्ही प्रत्येकाला पक्षात घेऊ शकत नाही किंवा सर्वांना सोडूही शकत नाही. हे विधानसभा मतदारसंघांच्या स्थितीवर अवलंबून असेल.''''होऊ घातलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवारी देऊ, अशी भाजपाच्या काही नेत्यांना अपेक्षा आहे. मात्र आपचा पक्ष निवडणुकीपूर्वी त्याबाबत विचार करेल. मी यासंदर्भात हायकमांडशी चर्चा केली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आता प्रचारात गुंतले आहेत.''असेही जारकीहोळी यांनी सांगितले.  दरम्यान, येडियुरप्पा सरकार स्थापन झाल्यापासून कर्नाटकमधील राजकीय स्थिती बऱ्यापैकी स्थिर आहे. मे 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते. मात्र त्यानंतर स्थापन झालेले कुमारस्वामी सरकार लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे 14 महिन्यांतच कोसळले. जुलै महिन्यात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या मिळून 15 आमदारांनी राजीनामा देत भाजपाची वाट धरली होती. खूप मनधरणी केल्यानंतरही या आमदारांनी पक्षाविरोधातील बंडखोरी मागे घेतली नव्हती. अखेर दोन ते तीन आठवडे चाललेल्या राजकीय नाट्यानंतर कुमारस्वामी सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, आता येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकार काहीसे स्थिर असल्याचे दिसत असतानाचा काँग्रेस आमदारांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकता अस्थिरतेचे ढग दाटू लागले आहेत. दरम्यान काही दिवसांत होणारी विधानसभेची पोटनिवडणूक भाजपासाठी महत्त्वपूर्ण ठररणा आहे. सरकार स्थिर करण्यासाठी भाजपाला या पोटनिवडणुकीत किमान 6 जागा जिंकाव्या लागतील. सध्या कर्नाटक विधानसभेत भाजपाकडे 106 आमदारांचे पाठबळ आहे.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस