शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

Karnataka Election: शब्द खर्गेंचे, पण विष गांधी घराण्याचे; भाजप नेत्यांची काँग्रेसवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 19:18 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विषारी साप म्हटले. यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपकडून यावर तीव्र प्रतिक्रियाही उमटत आहेत. केंद्रीय मंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या इतर नेत्यांनी खर्गेंवर टीका केली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच भाजप नेते काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

काय म्हणाले खर्गे ?मल्लिकार्जुन खर्गे कलबुर्गी येथे एका निवडणूक सभेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्हाला प्रश्न पडेल की, ते विष आहे की नाही. पण, तुम्ही त्याचा स्वाद घेतला तर तुम्ही मराल, असे खर्गे म्हणाले. यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर खुलासाही केला. ते म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी आणि आरएसएसच्या विचारधारेबद्दल काही बोलत होतो. 

खर्गेंच्या विधानानंतर भाजप नेत्यांची टीका 

  • केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हुबळी येथे बोलताना म्हटले की, आज काँग्रेस कोणत्या प्रकारचे विष ओकत आहे, हे देश पाहत आहे. काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींवर अपमानास्पद टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा शेरेबाजीने त्यांनी कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित केला आहे. हे शब्द खर्गे यांचे असतील, पण हे विष गांधी घराण्याचे आहे.
  • केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, निवडणुकीत वारंवार होणारा पराभव आणि कुठेतरी काँग्रेसचा रोष यामुळे मोदींचा अपमान करणे आणि त्यांना शिवीगाळ करणे ही काँग्रेसची मजबुरी बनते. सोनिया गांधींपासून ते त्यांच्या अध्यक्षांपर्यंत कधी मोदीजींना मृत्यूचे व्यापारी म्हणतात, कधी विंचू म्हणतात, कधी साप म्हणतात. काँग्रेसला देशाची माफी मागावी लागेल, अन्यथा कर्नाटकची जनता त्यांचा जामीन जप्त करून त्यांना चोख प्रत्युत्तर देईल.
  • केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बंगळुरूमध्ये म्हटले की, खर्गे यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीने हा शब्द उच्चारने दुर्दैवी आहे. ज्या पक्षातील ते आआहेत, त्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी पंतप्रधानांना मृत्यूचे व्यापारी म्हणाल्या होत्या. असे शब्द लोकशाहीत मान्य नाहीत. खर्गे जी यांची काही तरी मजबुरी असावी, असे आम्हाला वाटते. त्यांनी आपल्या साहेबांना संतुष्ट करण्यासाठी असे शब्द वापरले आहेत.
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, मल्लिकार्जुन खर्गे यांचे असे वक्तव्य काँग्रेसची मानसिकता दर्शवते. एकीकडे राहुल गांधी प्रेमाचे दुकान उघडण्यासाठी भारत जोडो यात्रा करतात आणि त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष देशाच्या पंतप्रधानांसाठी असे शब्द वापरत आहेत.
  • केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, जनता त्यांना धडा शिकवेल. मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिनशर्त माफी मागावी. पंतप्रधानपद हा गांधी घराण्याचा अधिकार आहे, असे त्यांना वाटते. ते (मल्लिकार्जुन खर्गे) गांधी घराण्याशी निष्ठा दाखवण्यासाठी अशा गोष्टी बोलतात. 
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हावेरी येथे खर्गे यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, खर्गे यांच्या मनात विष आहे. ते पंतप्रधान मोदी आणि भाजपबद्दल पूर्वग्रहदूषित आहेत. या प्रकारचा विचार निराशेतून बाहेर पडतो, कारण ते त्यांच्याशी राजकीयदृष्ट्या लढू शकत नाहीत आणि त्यांना त्यांचे जहाज बुडताना दिसत आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाcongressकाँग्रेस