शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

Karnataka Election: शब्द खर्गेंचे, पण विष गांधी घराण्याचे; भाजप नेत्यांची काँग्रेसवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 19:18 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विषारी साप म्हटले. यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपकडून यावर तीव्र प्रतिक्रियाही उमटत आहेत. केंद्रीय मंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या इतर नेत्यांनी खर्गेंवर टीका केली आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच भाजप नेते काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

काय म्हणाले खर्गे ?मल्लिकार्जुन खर्गे कलबुर्गी येथे एका निवडणूक सभेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्हाला प्रश्न पडेल की, ते विष आहे की नाही. पण, तुम्ही त्याचा स्वाद घेतला तर तुम्ही मराल, असे खर्गे म्हणाले. यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर खुलासाही केला. ते म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी आणि आरएसएसच्या विचारधारेबद्दल काही बोलत होतो. 

खर्गेंच्या विधानानंतर भाजप नेत्यांची टीका 

  • केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हुबळी येथे बोलताना म्हटले की, आज काँग्रेस कोणत्या प्रकारचे विष ओकत आहे, हे देश पाहत आहे. काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींवर अपमानास्पद टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा शेरेबाजीने त्यांनी कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित केला आहे. हे शब्द खर्गे यांचे असतील, पण हे विष गांधी घराण्याचे आहे.
  • केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, निवडणुकीत वारंवार होणारा पराभव आणि कुठेतरी काँग्रेसचा रोष यामुळे मोदींचा अपमान करणे आणि त्यांना शिवीगाळ करणे ही काँग्रेसची मजबुरी बनते. सोनिया गांधींपासून ते त्यांच्या अध्यक्षांपर्यंत कधी मोदीजींना मृत्यूचे व्यापारी म्हणतात, कधी विंचू म्हणतात, कधी साप म्हणतात. काँग्रेसला देशाची माफी मागावी लागेल, अन्यथा कर्नाटकची जनता त्यांचा जामीन जप्त करून त्यांना चोख प्रत्युत्तर देईल.
  • केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बंगळुरूमध्ये म्हटले की, खर्गे यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीने हा शब्द उच्चारने दुर्दैवी आहे. ज्या पक्षातील ते आआहेत, त्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी पंतप्रधानांना मृत्यूचे व्यापारी म्हणाल्या होत्या. असे शब्द लोकशाहीत मान्य नाहीत. खर्गे जी यांची काही तरी मजबुरी असावी, असे आम्हाला वाटते. त्यांनी आपल्या साहेबांना संतुष्ट करण्यासाठी असे शब्द वापरले आहेत.
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, मल्लिकार्जुन खर्गे यांचे असे वक्तव्य काँग्रेसची मानसिकता दर्शवते. एकीकडे राहुल गांधी प्रेमाचे दुकान उघडण्यासाठी भारत जोडो यात्रा करतात आणि त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष देशाच्या पंतप्रधानांसाठी असे शब्द वापरत आहेत.
  • केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, जनता त्यांना धडा शिकवेल. मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिनशर्त माफी मागावी. पंतप्रधानपद हा गांधी घराण्याचा अधिकार आहे, असे त्यांना वाटते. ते (मल्लिकार्जुन खर्गे) गांधी घराण्याशी निष्ठा दाखवण्यासाठी अशा गोष्टी बोलतात. 
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हावेरी येथे खर्गे यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, खर्गे यांच्या मनात विष आहे. ते पंतप्रधान मोदी आणि भाजपबद्दल पूर्वग्रहदूषित आहेत. या प्रकारचा विचार निराशेतून बाहेर पडतो, कारण ते त्यांच्याशी राजकीयदृष्ट्या लढू शकत नाहीत आणि त्यांना त्यांचे जहाज बुडताना दिसत आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाcongressकाँग्रेस