शहरं
Join us  
Trending Stories
1
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
2
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
3
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
4
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
5
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
6
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
7
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
8
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
9
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
10
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
11
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
12
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
13
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
14
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
15
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
16
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
17
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
18
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
19
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
20
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार

"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:54 IST

मालवीय म्हणाले, काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने 'मतचोरी' करत आला आहे, हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे. हेच लोक आज मताधिकार रॅली काढत आहेत. हे केवढे विडंबन आहे. एवढेच नाही तर, सिद्धरामय्या त्यावेळी मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) झालेल्या मतचोरीमुळे हरले होते. राहुल गांधी हीच मतपत्रिकेची व्यवस्था पुन्हा आणण्यासंदर्भात बोलत आहेत, असेही त्यांनी म्हटले.

एकीकडे, भाजप आणि निवडणूक आयोगावर 'मतचोरी'चा आरोप करत, काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. तर दुसरीकडे, कर्नाटकचेमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या एका विधानाने काँग्रेसवरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सिद्धरामय्या शुक्रवारी म्हणाले, '१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत फसवणुकीमुळेच पराभवाचा सामना करावा लागला होता.' आता त्यांच्या या विधानावरू वाद निर्माण झाला आहे. कारण त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते आणि सिद्धरामय्या जनता दल सेक्युलरचे उमेदवार होते. त्यांनी कोप्पल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील यांच्याविरुद्ध ११,२०० मतांनी पराभव पत्करावा लागला होता.

तेव्हा बसवराज पाटील यांना एकूण २.४१ लाख मते मिळाली होती, तर सिद्धरामय्या यांना २ लाख ३० हजार मते मिळाली होती. त्या निवडणुकीच्या निकालानंतर सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयातही खटला दाखल केला होता आणि निवडणूक आयोगाने २२,२४३ मते नाकारल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

ते म्हणाले होते, जर ही मते बेकायदेशीर घोषित केली नसती तर आपण स्वतः मोठ्या फरकाने विजयी झालो असतो. त्यांचे म्हणणे होते की, बसवराज पाटील यांची उमेदवारीच अवैध होती, कारण त्यांना लोकसभा अध्यक्षांनी पक्षांतर केल्याबद्दल अपात्र घोषित केले होते. बसवराज पाटील यांना कायमचे अपात्र घोषित करण्यात आले होते, अशा परिस्थितीत ते पुन्हा निवडणूक कशी लढवू शकतात?

कर्नाटकचे माजी महाधिवक्ता रवी वर्मा कुमार यांच्या सत्कार समारंभात बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, 'मला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागले, तेव्हा मी रवी वर्मा यांचा कायदेशीर सल्ला घेतला होता. मी १९९१ ची निवडणूक लढवली आणि फसवणूक करून मला हरवण्यात आले. त्यावेळी रवी वर्मा कुमार यांनी मला मदत केली होती.' 

आता भारतीय जनता पक्षाने अर्थात भाजपने त्यांच्या या विधानाचा धागा पकडत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात बोलताना भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने 'मतचोरी' करत आला आहे, हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे. हेच लोक आज मताधिकार रॅली काढत आहेत. हे केवढे विडंबन आहे. एवढेच नाही तर, सिद्धरामय्या त्यावेळी मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) झालेल्या मतचोरीमुळे हरले होते. राहुल गांधी हीच मतपत्रिकेची व्यवस्था पुन्हा आणण्यासंदर्भात बोलत आहेत, असेही त्यांनी लिहिले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकChief Ministerमुख्यमंत्रीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण