शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:54 IST

मालवीय म्हणाले, काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने 'मतचोरी' करत आला आहे, हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे. हेच लोक आज मताधिकार रॅली काढत आहेत. हे केवढे विडंबन आहे. एवढेच नाही तर, सिद्धरामय्या त्यावेळी मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) झालेल्या मतचोरीमुळे हरले होते. राहुल गांधी हीच मतपत्रिकेची व्यवस्था पुन्हा आणण्यासंदर्भात बोलत आहेत, असेही त्यांनी म्हटले.

एकीकडे, भाजप आणि निवडणूक आयोगावर 'मतचोरी'चा आरोप करत, काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. तर दुसरीकडे, कर्नाटकचेमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या एका विधानाने काँग्रेसवरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सिद्धरामय्या शुक्रवारी म्हणाले, '१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत फसवणुकीमुळेच पराभवाचा सामना करावा लागला होता.' आता त्यांच्या या विधानावरू वाद निर्माण झाला आहे. कारण त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते आणि सिद्धरामय्या जनता दल सेक्युलरचे उमेदवार होते. त्यांनी कोप्पल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील यांच्याविरुद्ध ११,२०० मतांनी पराभव पत्करावा लागला होता.

तेव्हा बसवराज पाटील यांना एकूण २.४१ लाख मते मिळाली होती, तर सिद्धरामय्या यांना २ लाख ३० हजार मते मिळाली होती. त्या निवडणुकीच्या निकालानंतर सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयातही खटला दाखल केला होता आणि निवडणूक आयोगाने २२,२४३ मते नाकारल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

ते म्हणाले होते, जर ही मते बेकायदेशीर घोषित केली नसती तर आपण स्वतः मोठ्या फरकाने विजयी झालो असतो. त्यांचे म्हणणे होते की, बसवराज पाटील यांची उमेदवारीच अवैध होती, कारण त्यांना लोकसभा अध्यक्षांनी पक्षांतर केल्याबद्दल अपात्र घोषित केले होते. बसवराज पाटील यांना कायमचे अपात्र घोषित करण्यात आले होते, अशा परिस्थितीत ते पुन्हा निवडणूक कशी लढवू शकतात?

कर्नाटकचे माजी महाधिवक्ता रवी वर्मा कुमार यांच्या सत्कार समारंभात बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, 'मला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागले, तेव्हा मी रवी वर्मा यांचा कायदेशीर सल्ला घेतला होता. मी १९९१ ची निवडणूक लढवली आणि फसवणूक करून मला हरवण्यात आले. त्यावेळी रवी वर्मा कुमार यांनी मला मदत केली होती.' 

आता भारतीय जनता पक्षाने अर्थात भाजपने त्यांच्या या विधानाचा धागा पकडत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात बोलताना भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने 'मतचोरी' करत आला आहे, हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे. हेच लोक आज मताधिकार रॅली काढत आहेत. हे केवढे विडंबन आहे. एवढेच नाही तर, सिद्धरामय्या त्यावेळी मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) झालेल्या मतचोरीमुळे हरले होते. राहुल गांधी हीच मतपत्रिकेची व्यवस्था पुन्हा आणण्यासंदर्भात बोलत आहेत, असेही त्यांनी लिहिले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकChief Ministerमुख्यमंत्रीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण