शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:54 IST

मालवीय म्हणाले, काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने 'मतचोरी' करत आला आहे, हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे. हेच लोक आज मताधिकार रॅली काढत आहेत. हे केवढे विडंबन आहे. एवढेच नाही तर, सिद्धरामय्या त्यावेळी मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) झालेल्या मतचोरीमुळे हरले होते. राहुल गांधी हीच मतपत्रिकेची व्यवस्था पुन्हा आणण्यासंदर्भात बोलत आहेत, असेही त्यांनी म्हटले.

एकीकडे, भाजप आणि निवडणूक आयोगावर 'मतचोरी'चा आरोप करत, काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. तर दुसरीकडे, कर्नाटकचेमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या एका विधानाने काँग्रेसवरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सिद्धरामय्या शुक्रवारी म्हणाले, '१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत फसवणुकीमुळेच पराभवाचा सामना करावा लागला होता.' आता त्यांच्या या विधानावरू वाद निर्माण झाला आहे. कारण त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते आणि सिद्धरामय्या जनता दल सेक्युलरचे उमेदवार होते. त्यांनी कोप्पल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील यांच्याविरुद्ध ११,२०० मतांनी पराभव पत्करावा लागला होता.

तेव्हा बसवराज पाटील यांना एकूण २.४१ लाख मते मिळाली होती, तर सिद्धरामय्या यांना २ लाख ३० हजार मते मिळाली होती. त्या निवडणुकीच्या निकालानंतर सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयातही खटला दाखल केला होता आणि निवडणूक आयोगाने २२,२४३ मते नाकारल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 

ते म्हणाले होते, जर ही मते बेकायदेशीर घोषित केली नसती तर आपण स्वतः मोठ्या फरकाने विजयी झालो असतो. त्यांचे म्हणणे होते की, बसवराज पाटील यांची उमेदवारीच अवैध होती, कारण त्यांना लोकसभा अध्यक्षांनी पक्षांतर केल्याबद्दल अपात्र घोषित केले होते. बसवराज पाटील यांना कायमचे अपात्र घोषित करण्यात आले होते, अशा परिस्थितीत ते पुन्हा निवडणूक कशी लढवू शकतात?

कर्नाटकचे माजी महाधिवक्ता रवी वर्मा कुमार यांच्या सत्कार समारंभात बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, 'मला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागले, तेव्हा मी रवी वर्मा यांचा कायदेशीर सल्ला घेतला होता. मी १९९१ ची निवडणूक लढवली आणि फसवणूक करून मला हरवण्यात आले. त्यावेळी रवी वर्मा कुमार यांनी मला मदत केली होती.' 

आता भारतीय जनता पक्षाने अर्थात भाजपने त्यांच्या या विधानाचा धागा पकडत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात बोलताना भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने 'मतचोरी' करत आला आहे, हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे. हेच लोक आज मताधिकार रॅली काढत आहेत. हे केवढे विडंबन आहे. एवढेच नाही तर, सिद्धरामय्या त्यावेळी मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) झालेल्या मतचोरीमुळे हरले होते. राहुल गांधी हीच मतपत्रिकेची व्यवस्था पुन्हा आणण्यासंदर्भात बोलत आहेत, असेही त्यांनी लिहिले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकChief Ministerमुख्यमंत्रीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण