शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम, जेव्हा १८ हजार फूटावर भारतीय सेनेने अशी चारली पाकला धूळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 11:31 AM

१९ वर्षांआधी आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धात विजय मिळवला होता. हा दिवस दरवर्षी विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

मुंबई : १९ वर्षांआधी आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धात विजय मिळवला होता. हा दिवस दरवर्षी विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. साधारण दोन महिने चाललेलं कारगिल युद्ध हे साहस आणि शौर्याचं असं उदाहरण आहे ज्यावर प्रत्येक भारतीयाला अभिमान असायला हवा. जवळपास १८ हजार फूट उंचीवर कारगिलमध्ये झालेल्या या युद्धात देशाने ५२७ वीर गमावले होते तर १३०० पेक्षा जास्त जखमी झाले होते. 

तशी तर या युध्दाची सुरूवात पाकिस्तानने ३ मे १९९९ मध्येच केली होती. त्यावेळीच त्यांनी कारगिलच्या उंच डोंगरांवर ५ हजार सैनिकांच्या मदतीने ताबा मिळवला होता. या घटनेची माहिती जेव्हा भारत सरकारला मिळाली तेव्हा भारतीय सेनेने पाकिस्तानच्या सैनिकांना हाकलून लावण्यासाठी ऑपरेशन विजय सुरू केलं. यात भारतीय सेनेने पाकिस्तान विरोधात मिग-२७ आणि मिग-२९ यांचाही वापर केला. त्यासोबतच जिथेही पाकिस्तानने घुसखोरी करून ताबा मिळवला होता तिथे बॉम्ब हल्ले करण्यात आले.  

या युद्धात मोठ्या संख्येने रॉकेट आणि बॉम्बचा वापर करण्यात आला. यादरम्यान साधारण २ लाख ५० हजार बॉम्ब गोळे टाकण्यात आले होते. तेच ५ हजार बॉम्ब फायर करण्यासाठी ३०० पेक्षा जास्त मोर्टार, तोपों आणि रॉकेटचा वापर करण्यात आला होता. युद्धाच्या १७ दिवसात दररोज प्रति मिनिटे एक राऊंड फायर केला गेला. असे म्हटले जाते की, दुसऱ्या महायुध्दानंतर हेच एक दोन देशांमधील युद्ध होतं ज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले करण्यात आले. चला जाणून घेऊ या युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम.

कारगिल युद्धाचा घटनाक्रम

३ मे १९९९ - एका व्यक्तीने भारतीय सेनेला कारगिलमध्ये पाकिस्तान सेनेने घुसखोरी करून ताबा मिळवल्याची माहिती दिली होती. 

५ मे १९९९ - भारतीय सेनेची पेट्रोलिंग टीम याची माहिती घेण्यासाठी कारगिल पोहोचली. त्यावेळी पाकिस्तानी सेनेने त्यांना ताब्यात घेतले आणि त्यातील ५ जणांची निर्घुण हत्या केली. 

९ मे १९९९ - पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सेनेचं कारगिलमधील गोळाबारूद केंद्र नष्ट झालं. 

१० मे १९९९ - पहिल्यांदा पाकिस्तानी घुसखोरांना लदाखचं प्रवेश व्दार म्हणजेच दास, काकसार आणि मुश्कोह सेक्टरमध्ये पाहिलं गेलं.  

२६ मे - भारतीय सेनेने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

२७ मे - कार्यवाहीमध्ये भारतीय वायुसेनेने पाकिस्तान विरूद्ध मिग-२७ आणि मिग-२९ चा वापर केला. आणि फ्लाईट लेफ्टनंट नचिकेताला बंदी बनवलं.

२८ मे - एक मिग-२७ हेलिकॉप्टर पाकिस्तानकडून पाडण्यात आलं आणि यात चार भारतीय सैनिक शहीद झाले.

कारगिलचा घटनाक्रम

१ जून - एनएच-१ए वर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.

५ जून - पाकिस्तानी रेंजर्सकडून मिळालेल्या कागदपत्र भारतीय सेनेने मीडियासाठी जारी केले. ज्यात पाकिस्तामी रेंजर्सच्या असण्याचा उल्लेख आहे. 

६ जून - भारतीय सेनेने पूर्ण ताकदीनिशी पाकिस्तानला उत्तर देण्यास सुरुवात केली. 

९ जून - बाल्टिक क्षेत्राच्या २ मुख्य चौक्यांवरील पाकिस्तानी सैनिकांना ठार करत भारतीय सेनेने पुन्हा त्या चौकीवर ताबा मिळवला.

११ जून - भारताने जनरल परवेझ मुशर्रफ आणि आर्मी चीफ लेफ्टनंट जनरल अजीज खान यांच्यातील झालेल्या संवादाचं रेकॉर्डींग जारी केलं. यात उल्लेख आहे की, या घुसखोरीमध्ये पाक आर्मीचा हात आहे. 

१३ जून - भारतीय सेनेने द्रास सेक्टरमधील चौकीवर ताबा मिळवला.

१५ जून - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी परवेझ मुशर्रफ यांना फोन करून सांगितले की, आपलं सैन्य कारगिल सेक्टरमधून मागे बोलवा.

२९ जून - भारतीय सेनेने टायगर हिलजवळील दोन महत्वपूर्ण चौक्यांवर ५०६० आणि ५१०० वर ताबा मिळवला.

कारगिल युद्धाचा घटनाक्रम

२ जुलै - भारतीय सेनेने कारगिलवर तीन बाजूंनी हल्ला चढवला.

४ जुलै - भारतीय सेनेने टायगर हिलवर पुन्हा ताबा मिळवला.

५ जुलै - भारतीय सेनेने द्रास सेक्टरवर पुन्हा ताबा मिळवला. त्यानंतर लगेच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बिल क्लिंटन यांना सांगितले की, ते पाकिस्तानमधून त्यांची सेना माघारी बोलवत आहे. 

७ जुलै - भारतीये सेनेने बटालिकमध्ये असलेल्या जुबर हिलवर ताबा मिळवला.

११ जुलै - पाकिस्तानी रेंजर्सनी बटालिकमधून पळण्यास सुरुवात केली. 

१४ जुलै - पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केली. 

२६ जुलै - पंतप्रधानांनी हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा आदेश दिला. 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान