शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यकारक! क्वारंटाइन सेंटरमध्ये ५८० रुपयांना खरेदी केले एक किलो टोमॅटो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 17:01 IST

इमलीपारामधील क्वारंटाइन सेंटरमध्ये इतर राज्यातील कामगार आणि विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती.

ठळक मुद्देइमलीपारा क्वारंटाइन सेंटरमध्ये भाजीसाठी टोमॅटो 580 रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्याचे बिल देण्यात आले आहे.माहितीच्या अधिकार (आरटीआय) अंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांमध्ये ही बाब उघडकीस आली आहे.

कांकेर : छत्तीसगडमधील एका क्वारंटाइन सेंटरमध्ये टोमॅटो प्रति किलो 580 रुपये दराने खरेदी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. कांकेर जिल्ह्यातील इमलीपारा क्वारंटाइन सेंटरमध्ये महाग दराने टोमॅटो खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. तर या प्रकरणी अधिकाऱ्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

लॉकडाऊन दरम्यान इमलीपारामधील क्वारंटाइन सेंटरमध्ये इतर राज्यातील कामगार आणि विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. या लोकांच्या जेवणाच्या व्यवस्थेत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात आहे. माहितीच्या अधिकार (आरटीआय) अंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. दिलेल्या माहितीनुसार, इमलीपारा क्वारंटाइन सेंटरमध्ये भाजीसाठी टोमॅटो 580 रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्याचे बिल देण्यात आले आहे. पण, त्यावेळी टोमॅटोची कमाल किंमत प्रति किलो 20 रुपये सांगितली जात आहे. तसेच, अन्य भाजीपाल्यांच्या किंमतीही बाजारभावापेक्षा जास्त लिहिण्यात आल्या आहेत.

इमलीपारा क्वारंटाइन सेंटरमध्ये खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यासाठी आदिवासी कल्याण विभागाकडे जबाबदारी जिल्हा प्रशासनाने सोपविण्यात आली होती. विभागाने बाजारभावापेक्षा कित्येक पटीने जास्त किंमतीवर खरेदी करण्याचे बिल दिले आहे. तसेच, विभागानेही त्यासाठी पैसे दिले आहेत. इतकेच नाही तर क्वारंटाईन सेंटरमध्ये खरेदी केलेल्या साहित्याच्या बिलात जीएसटी (GST) आणि टिन नंबर (TIN) देण्यात आलेला नाही. कागदपत्रांनुसार लॉकडाऊन दरम्यान या क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्था करण्यासाठी 1 कोटी 67 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

दरम्यान, इमलीपाराच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बाजारभावापेक्षा अधिक महागड्या दराने टोमॅटो व इतर भाज्यांची खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक आमदार आणि राज्य सरकारचे संसदीय सचिव शिशुपाल सोरी यांनी केली आहे. हा अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा खुला खेळ आहे. अधिकाऱ्यांनी आश्चर्यकारक काम केले. यामध्ये जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी सरकारकडे करणार आहे, असे शिशुपाल यांनी सांगितले. तर या प्रकरणी प्रशासनाची बाजू मांडण्यासाठी कांकेर जिल्हाधिकारी के.एल. चौहान यांना कॉल केला. पण, त्यांच्याकडून यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर मेसेज करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

आणखी बातम्या...

- 'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...  

काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...

-  धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं    

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या