शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

आश्चर्यकारक! क्वारंटाइन सेंटरमध्ये ५८० रुपयांना खरेदी केले एक किलो टोमॅटो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 17:01 IST

इमलीपारामधील क्वारंटाइन सेंटरमध्ये इतर राज्यातील कामगार आणि विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती.

ठळक मुद्देइमलीपारा क्वारंटाइन सेंटरमध्ये भाजीसाठी टोमॅटो 580 रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्याचे बिल देण्यात आले आहे.माहितीच्या अधिकार (आरटीआय) अंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांमध्ये ही बाब उघडकीस आली आहे.

कांकेर : छत्तीसगडमधील एका क्वारंटाइन सेंटरमध्ये टोमॅटो प्रति किलो 580 रुपये दराने खरेदी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. कांकेर जिल्ह्यातील इमलीपारा क्वारंटाइन सेंटरमध्ये महाग दराने टोमॅटो खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. तर या प्रकरणी अधिकाऱ्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

लॉकडाऊन दरम्यान इमलीपारामधील क्वारंटाइन सेंटरमध्ये इतर राज्यातील कामगार आणि विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. या लोकांच्या जेवणाच्या व्यवस्थेत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात आहे. माहितीच्या अधिकार (आरटीआय) अंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. दिलेल्या माहितीनुसार, इमलीपारा क्वारंटाइन सेंटरमध्ये भाजीसाठी टोमॅटो 580 रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्याचे बिल देण्यात आले आहे. पण, त्यावेळी टोमॅटोची कमाल किंमत प्रति किलो 20 रुपये सांगितली जात आहे. तसेच, अन्य भाजीपाल्यांच्या किंमतीही बाजारभावापेक्षा जास्त लिहिण्यात आल्या आहेत.

इमलीपारा क्वारंटाइन सेंटरमध्ये खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यासाठी आदिवासी कल्याण विभागाकडे जबाबदारी जिल्हा प्रशासनाने सोपविण्यात आली होती. विभागाने बाजारभावापेक्षा कित्येक पटीने जास्त किंमतीवर खरेदी करण्याचे बिल दिले आहे. तसेच, विभागानेही त्यासाठी पैसे दिले आहेत. इतकेच नाही तर क्वारंटाईन सेंटरमध्ये खरेदी केलेल्या साहित्याच्या बिलात जीएसटी (GST) आणि टिन नंबर (TIN) देण्यात आलेला नाही. कागदपत्रांनुसार लॉकडाऊन दरम्यान या क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्था करण्यासाठी 1 कोटी 67 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

दरम्यान, इमलीपाराच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बाजारभावापेक्षा अधिक महागड्या दराने टोमॅटो व इतर भाज्यांची खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक आमदार आणि राज्य सरकारचे संसदीय सचिव शिशुपाल सोरी यांनी केली आहे. हा अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा खुला खेळ आहे. अधिकाऱ्यांनी आश्चर्यकारक काम केले. यामध्ये जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी सरकारकडे करणार आहे, असे शिशुपाल यांनी सांगितले. तर या प्रकरणी प्रशासनाची बाजू मांडण्यासाठी कांकेर जिल्हाधिकारी के.एल. चौहान यांना कॉल केला. पण, त्यांच्याकडून यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर मेसेज करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

आणखी बातम्या...

- 'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...  

काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...

-  धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं    

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या