शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 08:00 IST

Kangana Ranaut Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. यावर खासदार कंगना रणौत यांनी भाष्य केलं.

Kangana Ranaut on Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ २० जागाच जिंकता आल्या. कोकण, मराठवाड्यासह इतर भागात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले. या निकालाबद्दल बोलताना भाजपच्या खासदार कंगना रणौत यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. ठाकरेंना दैत्य म्हणत त्यांनी उत्तर दिले.

दिल्लीत माध्यमांशी बोलताना खासदार कंगना रणौत म्हणाल्या की, "आमच्या पक्षासाठी हा एक ऐतिहासिक विजय आहे. आम्ही सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. यासाठी महाराष्ट्र, भारतातील जनतेचे आभारी आहोत."

कोण मुख्यमंत्री झालेलं पाहायला आवडेल? या प्रश्नावर कंगना रणौत म्हणाल्या की, "आमचा पक्ष निर्णय घेईल. आमचा पक्षाची जी विचारधारा आहे, त्यामुळे आमच्याकडे नेतृत्व करण्यास एकापेक्षा एक सरस लोक आहेत."

कंगना रणौत यांनी उद्धव ठाकरेंवर काय केली टीका?

उद्धव ठाकरेंचा इतक्या वाईट पद्धतीने पराभव झाला. तुम्हाला हे अपेक्षित होतं का? असा प्रश्न कंगना रणौत यांना विचारण्यात आला होता.

कंगना रणौत म्हणाल्या की, "याची मला अपेक्षा होती, कारण मला वाटतं की, इतिहास साक्षी आहे. माझे खूप रील्सही व्हायरल होत आहेत. आम्ही दैत्य आणि देवांना कसे ओळखतो. जे महिलांची अवमान करतात, ते दैत्यच असतात आणि जे महिलांचा सन्मान करतात... महिलांना ३३ टक्के आरक्षण, शौचालये, धान्य, गॅस सिलिंडर दिले. त्यावरून कळते की, देव कोण आणि दैत्य कोण? त्यामुळे दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं. त्यांचा पराभव झाला."

"माझं घर तोडलं, मला शिव्या दिल्या"

"महाभारतात एकच कुटुंब होतं, पण फरक इतकाच होता की, जे महिलांचा अवमान करतात... माझं घर तोडलं गेलं. मला शिव्या दिल्या गेल्या. मला वाटतं की कुठे न कुठे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती, ते दिसत होतं", अशी टीका कंगना रणौत यांनी उद्धव ठाकरेंवर केली. 

"काही मूर्ख एकत्र आल्याने देशाचे तुकडे होऊ शकत नाही"

काँग्रेसवर टीका करताना कंगना रणौत म्हणाल्या, "त्यांनाही जनतेने जबरदस्त उत्तर दिले आहे. हा देश जो आहे, तो खूप बलिदानांनंतर बनला आहे. काही मूर्ख एकत्र आल्याने देशाचे तुकडे होऊ शकत नाही. आणि आम्ही होऊ पण देणार नाही", असा हल्ला कंगना रणौत यांनी केला.    

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेKangana Ranautकंगना राणौतShiv Senaशिवसेना