शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

"कामाख्या देवी मुंबईत अन् महाराष्ट्राचा 'जाणता राजा' गुवाहटीत"

By सचिन जवळकोटे | Published: November 04, 2023 12:58 PM

महाराष्ट्र व आसाम राज्यातील सलोख्याच्या संबंधांवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या चर्चेचा वृत्तांतही सांगितला. 

सचिन जवळकोटे

गुवाहटी - देशात गाजलेल्या महाराष्ट्रातील राजकीय बंडाचं केंद्रस्थान असलेल्या गुवाहटीतील कामाख्या देवीचं मंदिर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत होणार आहे. तर, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची उजळणी करणाऱ्या जाणता राजा ह्या लोकप्रिय महानाट्याचे प्रयोग संपूर्ण आसाम राज्यात होणार असल्याची माहिती आसामचेमुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी दिली. महाराष्ट्रातील पत्रकारांचे शिष्टमंडळ सध्या आसाम दौऱ्यावर असून त्यांनी मुख्यमंत्री शर्मा यांची भेट घेतली. यावेळी, शर्मा यांनी महाराष्ट्र व आसाम राज्यातील सलोख्याच्या संबंधांवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या चर्चेचा वृत्तांतही सांगितला. 

महाराष्ट्रातील राजकीय बंडात आसाममधील निसर्ग सौंदर्याचं कथन करणारा, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... हा डायलॉग महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला होता. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ह्या डायलॉगमुळे गुवाहटीचं सौंदर्य महाराष्ट्रात आणखीनच खुललं होतं. तर, राजकीय बंड यशस्वी झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी येथील प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शनही घेतलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दर्शनासाठी आले होते. त्यावेळी, मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यावेळी, दोन्ही राज्यातील अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली होती. त्याची, आठवण मुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितली.  

महाराष्ट्रसह देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कामाख्या देवीचं मंदिर आता मुंबईत होणार आहे. तर, छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग आसाममधील प्रत्येक जिल्ह्यात होणार असल्याचं हेमंत शर्मा यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांचा आदर्श घेत आसाममधील लोकांनी मुघल शाहीला आसाममध्ये पाऊल ठेऊ दिलं नाही. त्याच प्रेरणेतून येथील गावागावात जाणता राजा नाटकाचे प्रयोग होणार आहेत.

तसेच, महाराष्ट्रात आसाममधील हजारो नागरिक पोटा-पाण्यासाठी राहतात, ते महाराष्ट्रावर खूप प्रेम करतात. तसेच, आसाममध्येही मराठी माणूस राहत असून येथील महाराष्ट्र मंडळाने गुवाहटीत महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीसही दोन्ही राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचेही शर्मा यांनी म्हटले. त्यामुळे, लवकरच दोन्ही राज्याची संस्कृती, परंपरा आणि राजकीय सलोखा राखण्याची अनेक महत्त्वपूर्ण कामे पूर्णत्त्वास येतील, असे दिसून येत आहे.  

टॅग्स :AssamआसामEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीMumbaiमुंबई