शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कल्याण मतदारसंघ : मनसे उतरल्यास लढत चुरशीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 05:38 IST

पुनर्रचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कल्याण हा नवा मतदारसंघ तयार झाला.

- प्रशांत मानेपुनर्रचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कल्याण हा नवा मतदारसंघ तयार झाला. तेथील पहिल्या निवडणुकीत दिवंगत माजी खासदार प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले. शिवसेनेतील वागणुकीला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरल्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पराभवाची धूळ चारली.सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार हा हा मतदारसंघ त्या पक्षाने मनसेला दिला, तर सध्या शिवसेनेसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक कमालीची चुरशीची होऊ शकते. शिवसेना-भाजपा युती होईल, हे गृहीत धरून भाजपाने तेथे उमेदवार ठरवलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार नाही. राष्ट्रवादीतर्फे आनंद परांजपे लढण्यास तयार दिसत नाहीत. त्या पक्षाकडेही दुसरा उमेदवार नाही. त्यामुळे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले राजू पाटील यांना आघाडीच्या पाठिंब्याचे उमेदवार म्हणून पुढे केले जाऊ शकते.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र मते, त्याला मनसेची जोड आणि भाजपा, शिवसेनेतील नाराजांची मोट बांधत शिवसेनेविरूद्ध लढण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेत डावलले जाणारे ‘आगरी कार्ड’ खेळवण्याचे विरोधकांचे प्रयत्न आहेत. येथील कल्याण पूर्व भागात दीर्घकाळानंतरही नागरी सुविधा मिळत नसल्याने शिवसेनेविषयी नाराजी आहे. २७ गावे वगळण्यावरील शिवसेनेच्या भूमिकेमुळे नाराजीचा फटका कल्याण ग्रामीणमध्ये बसण्याची भीती आहे. डोंबिवलीत संघाची नाराजी हा कळीचा मुद्दा आहे.मुंब्रा-कळव्यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेने ठाणे महापालिकेत जुळवून घेतले. काही आंदोलने मिळून केली. पण तेथे राष्ट्रवादीतील नेतेच परस्परांना आव्हान देऊ लागल्याने व नवे मुस्लीम नेतृत्व उभे राहत असल्याने तेथेही शिवसेनेला पूर्वीसारखी एकहाती मदत न मिळता बरेच प्रयत्न करावे लागतील. उल्हासनगरमध्ये शिवसेनेला साथ न देणाऱ्या सिंधी मतदारांत भाजपाने चांगलेच पाय रोवले आहेत.या साºयाचा विचार करूनच गेली दोन वर्षे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलासाठी सातत्याने फिल्डिंग लावली. पक्षातील वेगवेगळे गट सांभाळून घेतले. भाजपाशीही जुळवून घेतले. मुख्यमंत्र्यांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांचा वापर करत अनेक प्रकल्पांच्या घोषणा केल्या. त्याचा व आजवर केलेल्या कामाचा श्रीकांत शिंदे यांना फायदा होईल, हे नक्की. आता राज ठाकरे यांच्याशी संबंधांचा वापर करीत मनसेच्या लढतीचीतीव्रता कमी करण्यात शिंदे यांना यश आले, तर मात्र वेगळे चित्र दिसूशकते.सध्याची परिस्थितीअंबरनाथमध्ये शिवसेनेतील वेगवेगळे गट अस्वस्थ आहेत. रक्तरंजित संघर्ष आणि व्हिडिओ क्लिपने त्याचे प्रत्यंतर दिले आहे. तशीच खदखद कल्याण ग्रामीण मतदारसंघात आहे.डोंबिवलीत भाजपाच्या नाराजांनी हात आखडता घेतला आणि ब्राह्मण- दाक्षिणात्य, बंगाली मतदारांनी वेगळी भूमिका घेतली, तर तेही उमेदवारांसमोर आव्हान असेल.मराठा समाजाला कुणबी ठरवून आरक्षण दिल्याने मराठा आणि मराठेतर नेते-कार्यकर्ते यांच्यातील सुप्त संघर्ष या निवडणुकीत थेट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा समावेश झाल्यास मागास-मुस्लिमांच्या मतांवर परिणाम होईल. कल्याणमधील आंबेडकर-ओवेसींच्या सभेने त्याची चुणूक दाखवली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणElectionनिवडणूक