शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

कल्याण मतदारसंघ : मनसे उतरल्यास लढत चुरशीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 05:38 IST

पुनर्रचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कल्याण हा नवा मतदारसंघ तयार झाला.

- प्रशांत मानेपुनर्रचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कल्याण हा नवा मतदारसंघ तयार झाला. तेथील पहिल्या निवडणुकीत दिवंगत माजी खासदार प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले. शिवसेनेतील वागणुकीला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरल्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पराभवाची धूळ चारली.सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार हा हा मतदारसंघ त्या पक्षाने मनसेला दिला, तर सध्या शिवसेनेसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक कमालीची चुरशीची होऊ शकते. शिवसेना-भाजपा युती होईल, हे गृहीत धरून भाजपाने तेथे उमेदवार ठरवलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार नाही. राष्ट्रवादीतर्फे आनंद परांजपे लढण्यास तयार दिसत नाहीत. त्या पक्षाकडेही दुसरा उमेदवार नाही. त्यामुळे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले राजू पाटील यांना आघाडीच्या पाठिंब्याचे उमेदवार म्हणून पुढे केले जाऊ शकते.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र मते, त्याला मनसेची जोड आणि भाजपा, शिवसेनेतील नाराजांची मोट बांधत शिवसेनेविरूद्ध लढण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेत डावलले जाणारे ‘आगरी कार्ड’ खेळवण्याचे विरोधकांचे प्रयत्न आहेत. येथील कल्याण पूर्व भागात दीर्घकाळानंतरही नागरी सुविधा मिळत नसल्याने शिवसेनेविषयी नाराजी आहे. २७ गावे वगळण्यावरील शिवसेनेच्या भूमिकेमुळे नाराजीचा फटका कल्याण ग्रामीणमध्ये बसण्याची भीती आहे. डोंबिवलीत संघाची नाराजी हा कळीचा मुद्दा आहे.मुंब्रा-कळव्यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेने ठाणे महापालिकेत जुळवून घेतले. काही आंदोलने मिळून केली. पण तेथे राष्ट्रवादीतील नेतेच परस्परांना आव्हान देऊ लागल्याने व नवे मुस्लीम नेतृत्व उभे राहत असल्याने तेथेही शिवसेनेला पूर्वीसारखी एकहाती मदत न मिळता बरेच प्रयत्न करावे लागतील. उल्हासनगरमध्ये शिवसेनेला साथ न देणाऱ्या सिंधी मतदारांत भाजपाने चांगलेच पाय रोवले आहेत.या साºयाचा विचार करूनच गेली दोन वर्षे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलासाठी सातत्याने फिल्डिंग लावली. पक्षातील वेगवेगळे गट सांभाळून घेतले. भाजपाशीही जुळवून घेतले. मुख्यमंत्र्यांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांचा वापर करत अनेक प्रकल्पांच्या घोषणा केल्या. त्याचा व आजवर केलेल्या कामाचा श्रीकांत शिंदे यांना फायदा होईल, हे नक्की. आता राज ठाकरे यांच्याशी संबंधांचा वापर करीत मनसेच्या लढतीचीतीव्रता कमी करण्यात शिंदे यांना यश आले, तर मात्र वेगळे चित्र दिसूशकते.सध्याची परिस्थितीअंबरनाथमध्ये शिवसेनेतील वेगवेगळे गट अस्वस्थ आहेत. रक्तरंजित संघर्ष आणि व्हिडिओ क्लिपने त्याचे प्रत्यंतर दिले आहे. तशीच खदखद कल्याण ग्रामीण मतदारसंघात आहे.डोंबिवलीत भाजपाच्या नाराजांनी हात आखडता घेतला आणि ब्राह्मण- दाक्षिणात्य, बंगाली मतदारांनी वेगळी भूमिका घेतली, तर तेही उमेदवारांसमोर आव्हान असेल.मराठा समाजाला कुणबी ठरवून आरक्षण दिल्याने मराठा आणि मराठेतर नेते-कार्यकर्ते यांच्यातील सुप्त संघर्ष या निवडणुकीत थेट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा समावेश झाल्यास मागास-मुस्लिमांच्या मतांवर परिणाम होईल. कल्याणमधील आंबेडकर-ओवेसींच्या सभेने त्याची चुणूक दाखवली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणElectionनिवडणूक