शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

कल्याण मतदारसंघ : मनसे उतरल्यास लढत चुरशीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 05:38 IST

पुनर्रचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कल्याण हा नवा मतदारसंघ तयार झाला.

- प्रशांत मानेपुनर्रचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कल्याण हा नवा मतदारसंघ तयार झाला. तेथील पहिल्या निवडणुकीत दिवंगत माजी खासदार प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले. शिवसेनेतील वागणुकीला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरल्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पराभवाची धूळ चारली.सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार हा हा मतदारसंघ त्या पक्षाने मनसेला दिला, तर सध्या शिवसेनेसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक कमालीची चुरशीची होऊ शकते. शिवसेना-भाजपा युती होईल, हे गृहीत धरून भाजपाने तेथे उमेदवार ठरवलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार नाही. राष्ट्रवादीतर्फे आनंद परांजपे लढण्यास तयार दिसत नाहीत. त्या पक्षाकडेही दुसरा उमेदवार नाही. त्यामुळे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले राजू पाटील यांना आघाडीच्या पाठिंब्याचे उमेदवार म्हणून पुढे केले जाऊ शकते.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र मते, त्याला मनसेची जोड आणि भाजपा, शिवसेनेतील नाराजांची मोट बांधत शिवसेनेविरूद्ध लढण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेत डावलले जाणारे ‘आगरी कार्ड’ खेळवण्याचे विरोधकांचे प्रयत्न आहेत. येथील कल्याण पूर्व भागात दीर्घकाळानंतरही नागरी सुविधा मिळत नसल्याने शिवसेनेविषयी नाराजी आहे. २७ गावे वगळण्यावरील शिवसेनेच्या भूमिकेमुळे नाराजीचा फटका कल्याण ग्रामीणमध्ये बसण्याची भीती आहे. डोंबिवलीत संघाची नाराजी हा कळीचा मुद्दा आहे.मुंब्रा-कळव्यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेने ठाणे महापालिकेत जुळवून घेतले. काही आंदोलने मिळून केली. पण तेथे राष्ट्रवादीतील नेतेच परस्परांना आव्हान देऊ लागल्याने व नवे मुस्लीम नेतृत्व उभे राहत असल्याने तेथेही शिवसेनेला पूर्वीसारखी एकहाती मदत न मिळता बरेच प्रयत्न करावे लागतील. उल्हासनगरमध्ये शिवसेनेला साथ न देणाऱ्या सिंधी मतदारांत भाजपाने चांगलेच पाय रोवले आहेत.या साºयाचा विचार करूनच गेली दोन वर्षे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलासाठी सातत्याने फिल्डिंग लावली. पक्षातील वेगवेगळे गट सांभाळून घेतले. भाजपाशीही जुळवून घेतले. मुख्यमंत्र्यांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांचा वापर करत अनेक प्रकल्पांच्या घोषणा केल्या. त्याचा व आजवर केलेल्या कामाचा श्रीकांत शिंदे यांना फायदा होईल, हे नक्की. आता राज ठाकरे यांच्याशी संबंधांचा वापर करीत मनसेच्या लढतीचीतीव्रता कमी करण्यात शिंदे यांना यश आले, तर मात्र वेगळे चित्र दिसूशकते.सध्याची परिस्थितीअंबरनाथमध्ये शिवसेनेतील वेगवेगळे गट अस्वस्थ आहेत. रक्तरंजित संघर्ष आणि व्हिडिओ क्लिपने त्याचे प्रत्यंतर दिले आहे. तशीच खदखद कल्याण ग्रामीण मतदारसंघात आहे.डोंबिवलीत भाजपाच्या नाराजांनी हात आखडता घेतला आणि ब्राह्मण- दाक्षिणात्य, बंगाली मतदारांनी वेगळी भूमिका घेतली, तर तेही उमेदवारांसमोर आव्हान असेल.मराठा समाजाला कुणबी ठरवून आरक्षण दिल्याने मराठा आणि मराठेतर नेते-कार्यकर्ते यांच्यातील सुप्त संघर्ष या निवडणुकीत थेट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा समावेश झाल्यास मागास-मुस्लिमांच्या मतांवर परिणाम होईल. कल्याणमधील आंबेडकर-ओवेसींच्या सभेने त्याची चुणूक दाखवली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणElectionनिवडणूक