शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Supreme Court Crisis : न्यायाधीशांमधील वाद अजूनही मिटलेला नाही- अॅटर्नी जनरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 12:00 IST

सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीश आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यातील वाद मिटलेला नाही, त्यांच्यात मतभेद कायम आहेत,' असा खुलासा अॅटर्नी जनरल वेणुगोपाळ यांनी केला आहे.

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीश आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यातील वाद मिटलेला नाही, त्यांच्यात मतभेद कायम आहेत,' असा खुलासा अॅटर्नी जनरल के.के वेणुगोपाळ यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वेणुगोपाल यांनी हा दावा केला आहे. सोमवारी चारही न्यायाधीश कामावर परतल्यानंतर अॅटर्नी जनरल के.के वेणुगोपाळ आणि बार काऊंन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन मनन मिश्रा यांनी न्यायाधीश आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यातील वाद मिटल्याचा दावा केला होता. पण दावा केल्यानंतर 24 तासातच अॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी यूटर्न घेतला आहे. 

अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ यांना एका वृत्तवाहिनीने विचारलं असता त्यांनीही, सर्व न्यायालये सुरळीत सुरू असल्याचा उल्लेख करत ‘जे झाले होते ते चहाच्या कपातील वादळ होतं व आता ते शमलं आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. पण चार न्यायाधीश आणि सरन्यायाधीश यांच्यातील वाद मिटलेला नाही याचे संकेत सोमवारी मिळाले होते. महत्त्वाच्या खटल्यांवरील सुनावणीसाठी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना करण्याची घोषणा केली होती. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या पीठात पत्रकार परिषद घेणाऱ्या त्या चार न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला नाही. न्यायाधीश चेलमेश्वर, रंजन गोगोई, एम.बी.लोकूर आणि कुरियन जोसेफ या चौघांपैकी कुणाचंही नाव पाच न्यायाधीशांच्या घटनापीठातील सदस्यांमध्ये नाही.

घटनापीठासमोर अनेक महत्त्वाचे मुद्दे सुनावणीसाठी जाणार आहेत. आधार कार्डाशी संबंधित प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा, न्या. ए. के. सिक्री. न्या. ए. एम. खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. अशोक भूषण यांच्या घटनापीठासमोर सुरू होती. आता याच सर्व न्यायाधीशांचे घटनापीठ आणखी सात खटल्यांची सुनावणी घेणार आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ला (समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवलेले) दिलेलं आव्हान, सबरीमाला देवळात महिलांना प्रवेशबंदी, परधर्मियाशी विवाह केल्यामुळे अग्यारीतील प्रवेशाला बंदी केल्याविरोधात पारशी महिलेने दिलेले आव्हान, भारतीय दंड विधानातील व्यभिचारासंदर्भातील तरतुदीला दिलेलं आव्हान (ज्या तरतुदीत महिलेला शिक्षा होऊ शकत नाही, असं म्हटलं आहे) आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या आरोपनिश्चितीच्या टप्प्यावरच लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याबाबतची याचिका, करविषयक आणि ग्राहकहिताची याचिका अशा सात खटल्यांची सुनावणी सरन्यायाधीशांच्या घटनापीठासमोर होणार आहे. या सातही महत्त्वाच्या खटल्यांच्या सुनावणीत न्या. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ या नाराज न्यायाधीशांना समाविष्ट केलेलं नाही.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय