शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Supreme Court Crisis : न्यायाधीशांमधील वाद अजूनही मिटलेला नाही- अॅटर्नी जनरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 12:00 IST

सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीश आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यातील वाद मिटलेला नाही, त्यांच्यात मतभेद कायम आहेत,' असा खुलासा अॅटर्नी जनरल वेणुगोपाळ यांनी केला आहे.

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीश आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यातील वाद मिटलेला नाही, त्यांच्यात मतभेद कायम आहेत,' असा खुलासा अॅटर्नी जनरल के.के वेणुगोपाळ यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वेणुगोपाल यांनी हा दावा केला आहे. सोमवारी चारही न्यायाधीश कामावर परतल्यानंतर अॅटर्नी जनरल के.के वेणुगोपाळ आणि बार काऊंन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन मनन मिश्रा यांनी न्यायाधीश आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यातील वाद मिटल्याचा दावा केला होता. पण दावा केल्यानंतर 24 तासातच अॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी यूटर्न घेतला आहे. 

अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ यांना एका वृत्तवाहिनीने विचारलं असता त्यांनीही, सर्व न्यायालये सुरळीत सुरू असल्याचा उल्लेख करत ‘जे झाले होते ते चहाच्या कपातील वादळ होतं व आता ते शमलं आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. पण चार न्यायाधीश आणि सरन्यायाधीश यांच्यातील वाद मिटलेला नाही याचे संकेत सोमवारी मिळाले होते. महत्त्वाच्या खटल्यांवरील सुनावणीसाठी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना करण्याची घोषणा केली होती. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या पीठात पत्रकार परिषद घेणाऱ्या त्या चार न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला नाही. न्यायाधीश चेलमेश्वर, रंजन गोगोई, एम.बी.लोकूर आणि कुरियन जोसेफ या चौघांपैकी कुणाचंही नाव पाच न्यायाधीशांच्या घटनापीठातील सदस्यांमध्ये नाही.

घटनापीठासमोर अनेक महत्त्वाचे मुद्दे सुनावणीसाठी जाणार आहेत. आधार कार्डाशी संबंधित प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा, न्या. ए. के. सिक्री. न्या. ए. एम. खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. अशोक भूषण यांच्या घटनापीठासमोर सुरू होती. आता याच सर्व न्यायाधीशांचे घटनापीठ आणखी सात खटल्यांची सुनावणी घेणार आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ला (समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवलेले) दिलेलं आव्हान, सबरीमाला देवळात महिलांना प्रवेशबंदी, परधर्मियाशी विवाह केल्यामुळे अग्यारीतील प्रवेशाला बंदी केल्याविरोधात पारशी महिलेने दिलेले आव्हान, भारतीय दंड विधानातील व्यभिचारासंदर्भातील तरतुदीला दिलेलं आव्हान (ज्या तरतुदीत महिलेला शिक्षा होऊ शकत नाही, असं म्हटलं आहे) आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या आरोपनिश्चितीच्या टप्प्यावरच लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याबाबतची याचिका, करविषयक आणि ग्राहकहिताची याचिका अशा सात खटल्यांची सुनावणी सरन्यायाधीशांच्या घटनापीठासमोर होणार आहे. या सातही महत्त्वाच्या खटल्यांच्या सुनावणीत न्या. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ या नाराज न्यायाधीशांना समाविष्ट केलेलं नाही.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय