शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

“भ्रष्टाचाराचे आरोप, १० वर्षांत ७४० आमदार-खासदार भाजपात, बहुतांश काँग्रेसचे”: JMM

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 16:06 IST

JMM News: काँग्रेसमुक्त भारत असा नारा देणारी भाजपा आता काँग्रेसयुक्त झाली आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

JMM News: गेल्या काही दिवसांपासून देशभर भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर राजस्थानमधील काँग्रेसला मोठा झटका बसला असून, महेंद्रजीत सिंह मालवीय यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आगामी काळात ही संख्या वाढू शकते, असा कयास बांधला जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेल्या १० वर्षांत भाजपामध्ये गेलेल्या आमदार आणि खासदारांची संख्या ७४० असून, यातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. तसेच बहुतांश नेते काँग्रेसचे होते, असे झारखंड मुक्ती मोर्चाने म्हटले आहे. 

एका पत्रकार परिषदेत बोलताना झारखंड मुक्ती मोर्चाचे महासचिव सुप्रियो भट्टाचार्य यांनी भाजपावर सडकून टीका केली आणि काही गंभीर आरोपही केले. भाजपावाले म्हणतात की, त्यांच्यासाठी आदिवासींचा सन्मान याला सर्वोच्च प्राधान्य आहे. पण, त्यांना आदिवासी मुख्यमंत्री नको. आदिवासी मुख्यमंत्री असेल तर त्याला तुरुंगात पाठवले जाईल, असे धोरण भाजपाने राबवले आहे, असा आरोप सुप्रियो भट्टाचार्य यांनी केला. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केली. ते सध्या तुरुंगात आहेत. याचा संदर्भ देत भट्टाचार्य यांनी टीकास्त्र सोडले.

काँग्रेसमुक्त भारत असा नारा देणारी भाजपा आता काँग्रेसयुक्त झाली आहे

भाजपाने यापूर्वी अनेकता काँग्रेसमुक्त भारत असा नारा दिला होता. मात्र, आता त्या पक्षाची अवस्था ही काँग्रेसयुक्त भाजपा झाली आहे. गेल्या १० वर्षांत ७४० खासदार, आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यातील बहुतांश सदस्य हे काँग्रेसचे होते. विशेष म्हणजे या सगळ्यांवर भाजपाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले. आता तेच लोक त्यांचे आवडते झाले आहेत, या शब्दांत सुप्रियो भट्टाचार्य यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, २०१४ ते २०२४ या काळात देशामध्ये अनेक अजब गोष्टी घडल्याचे दिसून आले. अगदी काय खावे, परिधान करावे, अभ्यास करावा, अगदी काय ऐकावे यासंदर्भातही सूचना, आदेश देण्यात आले आहेत. सत्ताधाऱ्यांच्यामते विरोधात असणारे सगळे भ्रष्ट आहेत. भाजपामध्ये असणारे सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत. जे सरकारच्या धोरणांना विरोध करतात, ते राष्ट्रविरोधी आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे, अशी घणाघाती टीका भट्टाचार्य यांनी केली. 

टॅग्स :JharkhandझारखंडJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाBJPभाजपा