शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

“भ्रष्टाचाराचे आरोप, १० वर्षांत ७४० आमदार-खासदार भाजपात, बहुतांश काँग्रेसचे”: JMM

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 16:06 IST

JMM News: काँग्रेसमुक्त भारत असा नारा देणारी भाजपा आता काँग्रेसयुक्त झाली आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

JMM News: गेल्या काही दिवसांपासून देशभर भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर राजस्थानमधील काँग्रेसला मोठा झटका बसला असून, महेंद्रजीत सिंह मालवीय यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आगामी काळात ही संख्या वाढू शकते, असा कयास बांधला जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेल्या १० वर्षांत भाजपामध्ये गेलेल्या आमदार आणि खासदारांची संख्या ७४० असून, यातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. तसेच बहुतांश नेते काँग्रेसचे होते, असे झारखंड मुक्ती मोर्चाने म्हटले आहे. 

एका पत्रकार परिषदेत बोलताना झारखंड मुक्ती मोर्चाचे महासचिव सुप्रियो भट्टाचार्य यांनी भाजपावर सडकून टीका केली आणि काही गंभीर आरोपही केले. भाजपावाले म्हणतात की, त्यांच्यासाठी आदिवासींचा सन्मान याला सर्वोच्च प्राधान्य आहे. पण, त्यांना आदिवासी मुख्यमंत्री नको. आदिवासी मुख्यमंत्री असेल तर त्याला तुरुंगात पाठवले जाईल, असे धोरण भाजपाने राबवले आहे, असा आरोप सुप्रियो भट्टाचार्य यांनी केला. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केली. ते सध्या तुरुंगात आहेत. याचा संदर्भ देत भट्टाचार्य यांनी टीकास्त्र सोडले.

काँग्रेसमुक्त भारत असा नारा देणारी भाजपा आता काँग्रेसयुक्त झाली आहे

भाजपाने यापूर्वी अनेकता काँग्रेसमुक्त भारत असा नारा दिला होता. मात्र, आता त्या पक्षाची अवस्था ही काँग्रेसयुक्त भाजपा झाली आहे. गेल्या १० वर्षांत ७४० खासदार, आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यातील बहुतांश सदस्य हे काँग्रेसचे होते. विशेष म्हणजे या सगळ्यांवर भाजपाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले. आता तेच लोक त्यांचे आवडते झाले आहेत, या शब्दांत सुप्रियो भट्टाचार्य यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, २०१४ ते २०२४ या काळात देशामध्ये अनेक अजब गोष्टी घडल्याचे दिसून आले. अगदी काय खावे, परिधान करावे, अभ्यास करावा, अगदी काय ऐकावे यासंदर्भातही सूचना, आदेश देण्यात आले आहेत. सत्ताधाऱ्यांच्यामते विरोधात असणारे सगळे भ्रष्ट आहेत. भाजपामध्ये असणारे सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत. जे सरकारच्या धोरणांना विरोध करतात, ते राष्ट्रविरोधी आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे, अशी घणाघाती टीका भट्टाचार्य यांनी केली. 

टॅग्स :JharkhandझारखंडJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाBJPभाजपा