शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

जितेंद्रच्या प्रामाणिकतेचं होतंय कौतुक, पठ्ठ्यानं 50 लाखांची शेतजमीन परत केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 15:45 IST

जितेंद्र यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपली कहानी सांगितली,

शेतजमीन आणि संपत्तीसाठी सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याच्या घटना आपण नेहमीच पेपरात वाचतो. तर, बहिण-भावाच्या नात्यातही जमिनीच्या वादावरुन तंटा होतो. सध्याच्या काळात संपत्तीसाठी जवळच्या नात्यांमध्येही कटुता निर्माण झाली आहे. मात्र, मध्य प्रदेशमच्या बैतुल जिल्ह्यातील एका युवकाने प्रामाणिकपणाचे आदर्श घालून दिला आहे. जितेंद्र उर्फ जगदीश भारती असे या युवकाचे नाव असून तो पीडब्लूडी विभागात कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. 

जितेंद्र यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपली कहानी सांगितली, वयाच्या चौथ्या वर्षीच जितेंद्र यांच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न गजपूर गावातील गंगा यादव हिच्याशी ठरवलं होतं. त्यावेळी, गंगाच्या कुटुंबीयांनी 10 एकर शेतजमिन जितेंद्रच्या नावे केली होती. मात्र, काही कारणास्तव या दोघांचा विवाह होऊ शकला नाही. मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाचा तगादा लावला, तेव्हा जितेंद्र आपले शिक्षण पूर्ण करत होते. त्यामुळे जितेंद्र यांनी लग्नास नकार दिला. 

जितेंद्रने लग्नास नकार दिल्यानंतर गंगाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या कुटुंबातील मुलाशी लावून दिलं. तर, इकडे कालांतराने जितेंद्रचेही दुसऱ्या मुलीशी लग्न झाले. विशेष म्हणजे या घटनेत तब्बल 45 वर्षांनी जितेंद्र यांनी गंगाच्या भावाकडे संपूर्ण 10 एकर जमीन परत केली. रजिस्टार नोंदणी कार्यालयात सोमवारी दोन्ही कुटुंबातील सदस्य हजर होते. लहानपणी जितेंद्रच्या नावे करण्यात आलेल्या या 10 एकर जमिनीची किंमत बाजारभावाप्रमाणे आज जवळपास 50 लाख रुपये एवढी आहे. मात्र, एक रुपयाचीही अपेक्षा न ठेवता जितेंद्रने 10 एकर जमिनी गंगाच्या कुटुंबीयांना परत दिली. जितेंद्रच्या या प्रामाणिपणाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीRajasthanराजस्थानmarriageलग्न