शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

जितेंद्रच्या प्रामाणिकतेचं होतंय कौतुक, पठ्ठ्यानं 50 लाखांची शेतजमीन परत केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 15:45 IST

जितेंद्र यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपली कहानी सांगितली,

शेतजमीन आणि संपत्तीसाठी सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याच्या घटना आपण नेहमीच पेपरात वाचतो. तर, बहिण-भावाच्या नात्यातही जमिनीच्या वादावरुन तंटा होतो. सध्याच्या काळात संपत्तीसाठी जवळच्या नात्यांमध्येही कटुता निर्माण झाली आहे. मात्र, मध्य प्रदेशमच्या बैतुल जिल्ह्यातील एका युवकाने प्रामाणिकपणाचे आदर्श घालून दिला आहे. जितेंद्र उर्फ जगदीश भारती असे या युवकाचे नाव असून तो पीडब्लूडी विभागात कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. 

जितेंद्र यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपली कहानी सांगितली, वयाच्या चौथ्या वर्षीच जितेंद्र यांच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न गजपूर गावातील गंगा यादव हिच्याशी ठरवलं होतं. त्यावेळी, गंगाच्या कुटुंबीयांनी 10 एकर शेतजमिन जितेंद्रच्या नावे केली होती. मात्र, काही कारणास्तव या दोघांचा विवाह होऊ शकला नाही. मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाचा तगादा लावला, तेव्हा जितेंद्र आपले शिक्षण पूर्ण करत होते. त्यामुळे जितेंद्र यांनी लग्नास नकार दिला. 

जितेंद्रने लग्नास नकार दिल्यानंतर गंगाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या कुटुंबातील मुलाशी लावून दिलं. तर, इकडे कालांतराने जितेंद्रचेही दुसऱ्या मुलीशी लग्न झाले. विशेष म्हणजे या घटनेत तब्बल 45 वर्षांनी जितेंद्र यांनी गंगाच्या भावाकडे संपूर्ण 10 एकर जमीन परत केली. रजिस्टार नोंदणी कार्यालयात सोमवारी दोन्ही कुटुंबातील सदस्य हजर होते. लहानपणी जितेंद्रच्या नावे करण्यात आलेल्या या 10 एकर जमिनीची किंमत बाजारभावाप्रमाणे आज जवळपास 50 लाख रुपये एवढी आहे. मात्र, एक रुपयाचीही अपेक्षा न ठेवता जितेंद्रने 10 एकर जमिनी गंगाच्या कुटुंबीयांना परत दिली. जितेंद्रच्या या प्रामाणिपणाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीRajasthanराजस्थानmarriageलग्न