शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

रेल्वेनं मनं जिंकली! प्रसुती वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेसाठी ३ किमी उलट दिशेनं चालवली ट्रेन, वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 17:18 IST

माणुसकीपेक्षा मोठा कोणताच धर्म नसतो आणि भारतीय रेल्वेनं (Indian Railway) मानवतेचं उत्तम उदाहरण सादर करत प्रसुती वेदनांनी विव्हळणाऱ्या गर्भवती महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचवले आहेत.

माणुसकीपेक्षा मोठा कोणताच धर्म नसतो आणि भारतीय रेल्वेनं (Indian Railway) मानवतेचं उत्तम उदाहरण सादर करत प्रसुती वेदनांनी विव्हळणाऱ्या गर्भवती महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचवले आहेत. गर्भवती महिलेला मदत करण्यासाठी ट्रेन तीन किलोमीटर उलट दिशेनं चालवली. बाकया टाटानगर ते भुवनेश्वर रेल्वेमार्गावर ही घटना घडली आहे. टाटानगरहून भुवनेश्वरसाठी मंगळवारी रात्री रवाना झालेल्या आनंद विहार-भुवनेश्वर संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये (Sampark Kranti Express) एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी ट्रेन गंतव्य स्थानाच्या विरुद्ध दिशेनं चालवावी लागली. 

ट्रेन जवळपास तीन किलोमीटर विरुद्ध दिशेनं प्रवास करुन टाटानगर रेल्वे स्थानकावर आणण्यात आली आणि रेल्वे स्थानकावरील वैद्यकीय पथकानं गर्भवती महिलेला मदत केली. वैद्यकीय पथकाच्या सहाय्यानं महिलेला खासमहलस्थित एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेची यशस्वीरित्या प्रसूती झाली आणि आई व मूल दोघंही सुखरुप असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिला आहे. संबंधित महिलेचं नाव रानू दास असल्याचं सांगितलं जात आहे. महिलेला वैद्यकीय पथकाकडे सुपूर्द केल्यानंतर रेल्वेनं पुन्हा गंतव्य दिशेकडे प्रवास सुरू केला. दरम्यान, रेल्वेतील प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचं आणि तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल कौतुक केलं. 

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला रेल्वेच्या कोच क्रमांक-५ मधून प्रवास करत होती. त्यांना जलेश्वर रेल्वेस्थानकावर उतरायचं होतं. ट्रेन राशी उशिरा टाटानगर रेल्वेस्थानकातून निघाली. काही वेळानंतर संबंधित महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या आणि याची माहिती मोटरमनला मिळाली. तातडीनं याची माहिती टाटानगर रेल्वे स्थानकात देण्यात आली. ट्रेन टाटानगर स्थानकापासून जवळपास अडीच ते तीन किलोमीटर पुढे निघून गेली होती. टाटानगर रेल्वे स्थानक अधिक्षकांनी ग्रीन सिग्नल देताच तातडीनं ट्रेन उलट दिशेने नेत पुन्हा एकदा टाटा नगर रेल्वेस्थानकावर आणण्यात आली. 

टाटानगरहून तीन किमी पुढे ट्रेन पोहोचली होती आणि पुढचं स्थानक येण्यासाठी कमीत कमी दोन तास लागले असते. त्यामुळे महिला आणि बाळाच्या जीवाला धोका होता. त्यामुळे टाटानगर रेल्वे स्थानक जवळ असल्याचं पुन्हा मागे परतण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ट्रेन पुन्हा टाटानगर रेल्वे स्थानकावर पोहोचेपर्यंत रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांनी जवळच्या रुग्णालयात संपर्क साधून वैद्यकीय पथक तयार ठेवलं. वैद्यकीय पथक वेळेत रेल्वे स्थानकावर पोहोचलं आणि महिलेला वेळीच उपचार मिळाले. रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांचं आणि त्यांनी दाखवलेल्या तत्परतेचं प्रवाशांकडून तोंड भरुन कौतुक केलं गेलं. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेJharkhandझारखंड