शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

झारखंडमधील जामतारा स्थानकाजवळ भीषण अपघात; रेल्वेने १२ प्रवाशांना चिरडले, दोन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 22:59 IST

जामतारा आणि विद्यासागर स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. आगीच्या भीतीने प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले आणि दुसऱ्या ट्रेनने त्यांना उडवले.

Jharkhand Railway accident near Jhamtara: झारखंड मधील जामतारा येथून मोठी बातमी समोर आली आहे. जामतारा आणि विद्यासागर स्थानकांदरम्यान अंदाजे १२ लोकांना ट्रेनने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे आणि आतापर्यंत २ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अंधारामुळे किती जणांना जीव गमवावा लागला याचा नेमका अंदाज अद्याप समोर आलेला नाही. अंधारामुळे बचावकार्यालाही विलंब होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरू-यशवंतपूर एक्स्प्रेस डाऊन मार्गावरून जात होती. दरम्यान, लाईनच्या बाजूला टाकलेल्या गिट्टीची धूळ उडत होती, मात्र धूळ पाहून गाडीला आग लागल्याचा व त्यातून धूर निघत असल्याचा संशय चालकाला आला. त्यामुळे रेल्वे थांबताच प्रवासीही उतरले. या दरम्यान, अप मार्गावर जाणाऱ्या ईएमयू ट्रेनची धडक बसून काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान मोदींनीही रेल्वेअपघातावर शोक व्यक्त केला आहे. झारखंडमधील जामतारा येथे झालेल्या अपघाताचे वृत्त ऐकून दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल माझ्या सहवेदना. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडूनही शोक व्यक्त

अपघातावर रेल्वे प्रशासन काय म्हणाले?

याबाबत रेल्वेचे म्हणणे आले आहे. रेल्वेकडून आग लागल्याची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. अलार्म चेन खेचल्यामुळे ट्रेन क्रमांक 12254 थांबल्याचे सांगण्यात आले. तेवढ्यात दोन लोक रुळावर आले आणि त्यांना मेमू ट्रेनने चिरडले. रेल्वेच्या म्हणण्यानुसार आगीची कोणतीही घटना घडली नाही. ठार झालेले हे ट्रेनचे प्रवासी नव्हते, असे रेल्वेचे म्हणणे आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

याप्रकरणी जामतारा उपायुक्तांचे म्हणणे आले आहे. ते म्हणाले, 'जामतारा येथील कालाझरिया रेल्वे स्थानकावर एक ट्रेन प्रवाशांच्या अंगावर धावली. काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. किती लोकांचा जीव गेला हे नंतर निश्चित होईल. वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

टॅग्स :Jharkhandझारखंडrailwayरेल्वेAccidentअपघात