शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Jharkhand Political Crisis: घोडेबाजार;‘काही तरी शिजतेय’, झारखंडचे आमदार छत्तीसगडला, रिसॉर्टमध्ये वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 08:46 IST

Jharkhand Political Crisis: झारखंड सरकारने घोडेबाजाराच्या शक्यतेमुळे आपल्या आमदारांना रायपूरमध्ये पाठवले आहे, असे छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बुधवारी म्हटले आहे.

रायपूर : झारखंड सरकारने घोडेबाजाराच्या शक्यतेमुळे आपल्या आमदारांना रायपूरमध्ये पाठवले आहे, असे छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बुधवारी म्हटले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकारचे ३२ आमदार मंगळवारी रायपूरमध्ये दाखल झाले असून, येथे एका रिसॉर्टमध्ये वास्तव्यास आहेत.

बघेल यांनी हिमाचल प्रदेशकडे रवाना होण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले की, निवडणूक आयोगाने पत्र दिले आहे व त्याला एक आठवडा उलटला आहे. तरीही राजभवनाने याबाबत काहीही निवेदन दिलेले नाही. त्यावरून आत काही तरी शिजत आहे, असा याचा अर्थ काढला जात आहे. अशा स्थितीत झामुमो व काँग्रेसने आपले आमदार सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते छत्तीसगढमध्ये आले आहेत. ३२ आमदारांना रायपूरमध्ये हलविण्यात आले आहे, त्यात काँग्रेसच्या १७ आमदारांचा समावेश आहे. 

तेव्हा का मौन बाळगले?मंगळवारी झारखंडचे आमदार रायपूरमध्ये दाखल झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यावर बघेल म्हणाले की, जेव्हा मध्यप्रदेश, राजस्थानच्या आमदारांना तसेच महाराष्ट्राच्या आमदारांना नेण्यात आले होते, तेव्हा त्यांनी का मौन बाळगले होते. त्यावेळी त्यांनी बोलायला पाहिजे होते. हे तर आमच्या पक्षाचे लोक आहेत. यात त्यांना त्रास होण्याचे काहीही कारण नाही.

टॅग्स :JharkhandझारखंडChhattisgarhछत्तीसगडPoliticsराजकारण