शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

Jharkhand Political Crisis: घोडेबाजार;‘काही तरी शिजतेय’, झारखंडचे आमदार छत्तीसगडला, रिसॉर्टमध्ये वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 08:46 IST

Jharkhand Political Crisis: झारखंड सरकारने घोडेबाजाराच्या शक्यतेमुळे आपल्या आमदारांना रायपूरमध्ये पाठवले आहे, असे छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बुधवारी म्हटले आहे.

रायपूर : झारखंड सरकारने घोडेबाजाराच्या शक्यतेमुळे आपल्या आमदारांना रायपूरमध्ये पाठवले आहे, असे छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बुधवारी म्हटले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकारचे ३२ आमदार मंगळवारी रायपूरमध्ये दाखल झाले असून, येथे एका रिसॉर्टमध्ये वास्तव्यास आहेत.

बघेल यांनी हिमाचल प्रदेशकडे रवाना होण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले की, निवडणूक आयोगाने पत्र दिले आहे व त्याला एक आठवडा उलटला आहे. तरीही राजभवनाने याबाबत काहीही निवेदन दिलेले नाही. त्यावरून आत काही तरी शिजत आहे, असा याचा अर्थ काढला जात आहे. अशा स्थितीत झामुमो व काँग्रेसने आपले आमदार सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते छत्तीसगढमध्ये आले आहेत. ३२ आमदारांना रायपूरमध्ये हलविण्यात आले आहे, त्यात काँग्रेसच्या १७ आमदारांचा समावेश आहे. 

तेव्हा का मौन बाळगले?मंगळवारी झारखंडचे आमदार रायपूरमध्ये दाखल झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यावर बघेल म्हणाले की, जेव्हा मध्यप्रदेश, राजस्थानच्या आमदारांना तसेच महाराष्ट्राच्या आमदारांना नेण्यात आले होते, तेव्हा त्यांनी का मौन बाळगले होते. त्यावेळी त्यांनी बोलायला पाहिजे होते. हे तर आमच्या पक्षाचे लोक आहेत. यात त्यांना त्रास होण्याचे काहीही कारण नाही.

टॅग्स :JharkhandझारखंडChhattisgarhछत्तीसगडPoliticsराजकारण