शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

झारखंड निवडणूक 2019: बिशुनपूरमध्ये मतदान सुरू असताना नक्षली हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 12:19 IST

Jharkhand Election 2019: झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे.

ठळक मुद्देझारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मतदानादरम्यान बिशुनपूर येथे नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे.नक्षलवाद्यांनी एक पूल उद्ध्वस्त केला आहे.

रांची - झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या टप्प्यात चत्रा, बिशुनपूर, लातेहार, गुमला, लोहरदगा, पनकी, माणिका, विश्रामपूर, हुसेनाबाद, डाल्टनगंज, छतरपूर, भवनाथपूर, गढवा या जागांसाठी मतदान होणार आहे. या जागांवर एकूण 189 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. शनिवारी (30 नोव्हेंबर) मतदान सुरू असताना नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. मतदानादरम्यान बिशुनपूर येथे नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिशुनपूरमध्ये नक्षलवाद्यांनी एक पूल उद्ध्वस्त केला आहे. मात्र, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलीस उपायुक्त शशी रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवादी हल्ल्यामुळे मतदानावर परिणाम झालेला नाही. मतदान अजूनही सुरू आहे. झारखंड पाच टप्प्यात मतदान होणार आहे, पहिला टप्पा 30 नोव्हेंबरला आणि शेवटचा टप्पा 20 डिसेंबरला असणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान होईल. 

पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त भाग असल्याने मतदानाची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. येथे 37,83,055 मतदार नक्षलग्रस्त 6 जिल्ह्यातील 13 विधानसभा जागांवर 189 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. भवनाथपूर मतदारसंघातून जास्तीत जास्त 28 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. लातेहार आणि माणिका येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी येथे नक्षलवादी हल्ला झाला होता. शनिवारी या ठिकाणी शांततेत मतदान होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

81 सदस्यांच्या झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने 65 जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले असले, तरी या पक्षाला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागत आहे. भाजपाला सत्ता टिकवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत द्यायची असून, आता एकाच वेळी अनेकांशी दोन हात करावे लागणार आहेत. अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेशी (एजेएसयू) पक्षाचे मतभेद झालेले असून, ते दूर करण्यात अद्याप यश मिळालेले नाही. त्यातच एनडीएचे सहकारी पक्ष जदयू आणि लोजपा हे स्वबळावर लढत आहेत. महागठबंधनचे आव्हान वेगळेच आहे. लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वबळावर 50 जागा लढवण्याची घोषणा नुकतीच केल्याने भाजपला झटका बसला आहे. या निवडणुकीत युती करण्यासाठी आम्ही विचारले असता भाजपकडून काहीच उत्तर आले नव्हते. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. जदयूने सर्वप्रथम स्वबळावर लढण्याची घोषणा करून भाजपाची कोंडी केली.

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस