शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

...म्हणून झारखंड सरकार 'पाडले' नाही; महाराष्ट्रात येण्यापूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले लिफाफ्याचे सीक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 11:40 IST

झारखंडचे राज्यपाल रमेश बैस १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात येणार आहेत आणि १८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.

रांची-

झारखंडचे राज्यपाल रमेश बैस १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात येणार आहेत आणि १८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रात येण्याआधी झारखंड सरकारकडून त्यांना निरोप देण्यात आला. बुधवारी मुख्यमंत्री निवास परिसरात सरकारच्यावतीनं राज्यपाल रमेश बैस यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. याआधी रमेश बैस यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन खूप चांगले नेते आहेत, पण सरकारच्या व्हिजनमध्ये कमतरता आहे, असं रमेश बैस म्हणाले. 

राज्यात विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली नाहीत. ते म्हणाले की झारखंडची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे येथील लोक खूप सरळ, साधे आणि छान आहेत. हेमंत सोरेन खूप तरुण वयात मुख्यमंत्री झाले. त्यांनी चांगलं काम करून आपला ठसा उमटवला पाहिजे, असं राज्यपाल म्हणाले. तसंच अधिक चांगल्या दिशेनं काम करण्याची सूचनाही त्यांनी केली. ते म्हणाले की, विधेयकातील त्रुटी आयएएसच्या सक्षमतेवर प्रश्न निर्माण करतात.

बंद लिफाफ्यानंतर सरकारचं वेगानं काममुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रकरणातही राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. ते म्हणाले की, "झारखंड सरकार पाडण्याची किंवा अस्थिर करण्याची माझी कोणतीही भावना किंवा हेतू नव्हता. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. संविधानाच्या कक्षेत राहून सर्व कामं केली. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या पत्रावर निर्णय घेणे हा राज्यपालांचा अधिकार आहे. कोणाचीही तक्रार आल्यास त्याची राज्यपालांच्या अखत्यारीत चौकशी होऊ शकते". इतकंच नव्हे, तर योग्य वेळी आल्यावर निर्णय घेण्याचा विचार केला होता, असंही राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, हेमंत सरकारनं लिफाफा येण्याआधीच्या दोन वर्षात जे काम केलं त्यापेक्षा अधिक काम लिफाफा मिळाल्यानंतर करू लागलं होतं. त्यामुळे अशा स्थितीत राज्याच्या हिताचा निर्णय घेणं महत्वाचं वाटलं. रमेश बैस यांच्या या विधानानं अखेर त्यांनी हेमंत सोरेन सरकार पाडण्याचा विचार केला होता ही माहिती समोर आली आहे. 

राज्यपालांना स्मृतीचिन्ह देवून निरोपराज्यपालांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्यपाल रमेश बैस यांना स्मृतीचिन्ह प्रदान केले. राज्यपाल रमेश बैस संविधान संरक्षक म्हणून सतत मार्गदर्शन करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल झारखंडच्या जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा, असंही हेमंत सोरेन म्हमाले. सत्कार समारंभाला विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो उपस्थित होते. याशिवाय मंत्री जोबा मांझी, आलमगीर आलम, रामेश्वर ओराव, सत्यानंद भोक्ता, बन्ना गुप्ता आणि बादल उपस्थित होते. या सत्कार समारंभाला अनेक वरिष्ठ पोलीस-प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रमाबाई बैस याही उपस्थित होत्या, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला.

टॅग्स :JharkhandझारखंडRamesh Baisरमेश बैस