शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून झारखंड सरकार 'पाडले' नाही; महाराष्ट्रात येण्यापूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले लिफाफ्याचे सीक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 11:40 IST

झारखंडचे राज्यपाल रमेश बैस १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात येणार आहेत आणि १८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.

रांची-

झारखंडचे राज्यपाल रमेश बैस १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात येणार आहेत आणि १८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रात येण्याआधी झारखंड सरकारकडून त्यांना निरोप देण्यात आला. बुधवारी मुख्यमंत्री निवास परिसरात सरकारच्यावतीनं राज्यपाल रमेश बैस यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. याआधी रमेश बैस यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन खूप चांगले नेते आहेत, पण सरकारच्या व्हिजनमध्ये कमतरता आहे, असं रमेश बैस म्हणाले. 

राज्यात विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली नाहीत. ते म्हणाले की झारखंडची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे येथील लोक खूप सरळ, साधे आणि छान आहेत. हेमंत सोरेन खूप तरुण वयात मुख्यमंत्री झाले. त्यांनी चांगलं काम करून आपला ठसा उमटवला पाहिजे, असं राज्यपाल म्हणाले. तसंच अधिक चांगल्या दिशेनं काम करण्याची सूचनाही त्यांनी केली. ते म्हणाले की, विधेयकातील त्रुटी आयएएसच्या सक्षमतेवर प्रश्न निर्माण करतात.

बंद लिफाफ्यानंतर सरकारचं वेगानं काममुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रकरणातही राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. ते म्हणाले की, "झारखंड सरकार पाडण्याची किंवा अस्थिर करण्याची माझी कोणतीही भावना किंवा हेतू नव्हता. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. संविधानाच्या कक्षेत राहून सर्व कामं केली. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या पत्रावर निर्णय घेणे हा राज्यपालांचा अधिकार आहे. कोणाचीही तक्रार आल्यास त्याची राज्यपालांच्या अखत्यारीत चौकशी होऊ शकते". इतकंच नव्हे, तर योग्य वेळी आल्यावर निर्णय घेण्याचा विचार केला होता, असंही राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, हेमंत सरकारनं लिफाफा येण्याआधीच्या दोन वर्षात जे काम केलं त्यापेक्षा अधिक काम लिफाफा मिळाल्यानंतर करू लागलं होतं. त्यामुळे अशा स्थितीत राज्याच्या हिताचा निर्णय घेणं महत्वाचं वाटलं. रमेश बैस यांच्या या विधानानं अखेर त्यांनी हेमंत सोरेन सरकार पाडण्याचा विचार केला होता ही माहिती समोर आली आहे. 

राज्यपालांना स्मृतीचिन्ह देवून निरोपराज्यपालांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्यपाल रमेश बैस यांना स्मृतीचिन्ह प्रदान केले. राज्यपाल रमेश बैस संविधान संरक्षक म्हणून सतत मार्गदर्शन करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल झारखंडच्या जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा, असंही हेमंत सोरेन म्हमाले. सत्कार समारंभाला विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो उपस्थित होते. याशिवाय मंत्री जोबा मांझी, आलमगीर आलम, रामेश्वर ओराव, सत्यानंद भोक्ता, बन्ना गुप्ता आणि बादल उपस्थित होते. या सत्कार समारंभाला अनेक वरिष्ठ पोलीस-प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रमाबाई बैस याही उपस्थित होत्या, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला.

टॅग्स :JharkhandझारखंडRamesh Baisरमेश बैस