शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

झारखंडमध्ये गेल्या 19 वर्षांत कुठल्याही राजकीय पक्षाला तोडता आलेली नाहीत ही मिथके

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 16:34 IST

झारखंड राज्याची स्थापना झाल्यापासून गेल्या 19 वर्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये दोन मिथके तोडणे कुठल्याही राजकीय पक्षाला शक्य झालेले नाही. 

रांची -  झारखंड विधानसभा निवडणुकीचा कल आता जवळपास स्पष्ट होत आला आहे. संपूर्ण निकाल अद्याप हाती आला नसला तरी आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाचा पराभव होणार असल्याचे आणि सर्वात मोठी आघाडी ठरलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीचे राज्यात सरकार स्थापन होणार असल्याचे जळपास निश्चित झाले आहे. मात्र राज्याची स्थापना झाल्यापासून गेल्या 19 वर्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये दोन मिथके तोडणे कुठल्याही राजकीय पक्षाला शक्य झालेले नाही. ती मिथके म्हणजे झारखंडमधील विधानसभा निवडणुकीती यावेळीसुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाला  स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नाही. एकीकडे स्बबळावर बहुमतासह सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. तर सत्तेसमिप पोहोचलेल्या झारखंड मुक्ती मोर्चालाही बहुमत मिळालेले नाही. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडी 47 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 24 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरे मिथक म्हणजे झारखंडमध्ये गेल्या 19 वर्षांत झारखंडमध्ये कुठलाही पक्ष सत्ता कायम राखू शकलेला नाही. भाजपा नेते रघुवर दास हे संपूर्ण पाच वर्षे झारखंडचे मुख्यमंत्रिपद सांभाळवणारे पहिले व्यक्ती ठरले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात पक्ष सत्तेत पुनरागमन करेल अशी अपेक्षा भाजपा नेत्यांना होती. मात्र प्रत्यक्षात पक्षाला पराभव पत्करावा लागला. देशात मोदी लाट जोरात असताना 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला झारखंडची सत्ता काबीज करण्यात यश आले होते. मात्र तेव्हाही भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवता आले नव्हते. त्या निवडणुकीत भाजपाला 37 तर सहकारी पक्ष एसलेल्या एजेएसयू ला 5 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर झारखंड विकास मोर्चाच्या 6 आणि एका अपक्ष आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला बहुमताचा आकडा पार करता आला होता.  झारखंडमध्ये विधानसभेची पहिली निवडणूक 2005 मध्ये झाली होती. त्या निवडणुकीत भाजपा 30 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर झारखंड मुक्ती मोर्चाला 17 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि झारखंड मुक्ती मोर्चाला प्रत्येकी 18 जागा तर काँग्रेसला 14 आणि जेव्हीएमला 11 जागा मिळाल्या होत्या.  

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपाJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल