शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

झारखंडमध्ये गेल्या 19 वर्षांत कुठल्याही राजकीय पक्षाला तोडता आलेली नाहीत ही मिथके

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 16:34 IST

झारखंड राज्याची स्थापना झाल्यापासून गेल्या 19 वर्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये दोन मिथके तोडणे कुठल्याही राजकीय पक्षाला शक्य झालेले नाही. 

रांची -  झारखंड विधानसभा निवडणुकीचा कल आता जवळपास स्पष्ट होत आला आहे. संपूर्ण निकाल अद्याप हाती आला नसला तरी आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाचा पराभव होणार असल्याचे आणि सर्वात मोठी आघाडी ठरलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीचे राज्यात सरकार स्थापन होणार असल्याचे जळपास निश्चित झाले आहे. मात्र राज्याची स्थापना झाल्यापासून गेल्या 19 वर्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये दोन मिथके तोडणे कुठल्याही राजकीय पक्षाला शक्य झालेले नाही. ती मिथके म्हणजे झारखंडमधील विधानसभा निवडणुकीती यावेळीसुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाला  स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नाही. एकीकडे स्बबळावर बहुमतासह सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. तर सत्तेसमिप पोहोचलेल्या झारखंड मुक्ती मोर्चालाही बहुमत मिळालेले नाही. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडी 47 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 24 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरे मिथक म्हणजे झारखंडमध्ये गेल्या 19 वर्षांत झारखंडमध्ये कुठलाही पक्ष सत्ता कायम राखू शकलेला नाही. भाजपा नेते रघुवर दास हे संपूर्ण पाच वर्षे झारखंडचे मुख्यमंत्रिपद सांभाळवणारे पहिले व्यक्ती ठरले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात पक्ष सत्तेत पुनरागमन करेल अशी अपेक्षा भाजपा नेत्यांना होती. मात्र प्रत्यक्षात पक्षाला पराभव पत्करावा लागला. देशात मोदी लाट जोरात असताना 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला झारखंडची सत्ता काबीज करण्यात यश आले होते. मात्र तेव्हाही भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवता आले नव्हते. त्या निवडणुकीत भाजपाला 37 तर सहकारी पक्ष एसलेल्या एजेएसयू ला 5 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर झारखंड विकास मोर्चाच्या 6 आणि एका अपक्ष आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला बहुमताचा आकडा पार करता आला होता.  झारखंडमध्ये विधानसभेची पहिली निवडणूक 2005 मध्ये झाली होती. त्या निवडणुकीत भाजपा 30 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर झारखंड मुक्ती मोर्चाला 17 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि झारखंड मुक्ती मोर्चाला प्रत्येकी 18 जागा तर काँग्रेसला 14 आणि जेव्हीएमला 11 जागा मिळाल्या होत्या.  

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपाJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल