शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

JDU : नितीश कुमारांच्या पक्षात फेरबदल, पण त्यागींनी का दिला पदाचा राजीनामा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 11:28 IST

KC Tyagi News : नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल संयुक्त पक्षाचे एक प्रमुख नेते असलेल्या के.सी. त्यागी यांनी अचानक राष्ट्रीय प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाने राजीव रंजन यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. 

KC Tyagi Resigned : जेडीयू अर्थात जनता दल संयुक्त पक्षाचे ज्येष्ठ नेते के.सी. त्यागी यांनी अचानक राष्ट्रीय प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यागींनी राजीनामा दिल्यानंतर राजीव रंजन यांची राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे महासचिव आफाक अहमद खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली. पण, या घडामोडीनंतर के.सी. त्यागी यांच्या राजीनाम्याची वेगळीच कारणे चर्चेत आली आहेत. 

त्यागी यांनी राजीनामा दिल्यानंतर जदयूकडून राजीव रंजन यांची नियुक्ती करण्यात आली. त्यागींनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले असले, तरी वेगळीही कारणे या मागे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

त्यागींची विधाने, पक्षात वाद 

जदयूचा प्रमुख चेहरा असलेले के.सी. त्यागींनी गेल्या काही काळात अशी विधाने केली, जी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधी वा वेगळी होती. पक्ष नेतृत्वाशी वा पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा न करताच त्यागींकडून विधाने करण्यात आली. त्यामुळे जदयूमध्ये मतभेद तयार होऊन सु्प्त संघर्ष सुरू झाला होता. ही परिस्थिती हळूहळू गंभीर बनत गेली. 

एनडीए-जदयूतील मतभेदाचे बनले कारण   

त्यागी यांनी केलेल्या विधानामुळे केवळ जदयूमध्येच मतभेद तयार झाले नाही, तर त्याचा परिणाम एनडीएवरही होऊ लागला होता, अशी चर्चा आहे. परकीय धोरणाच्या मुद्द्यावर त्यागींनी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या सूरात सूर मिसळला होता. इस्रायलला शस्त्र पूरवठा थांबवण्याच्या एका संयुक्त निवेदनावर त्यांनी स्वाक्षरीही केली होती. यामुळे जदयूमध्ये नाराजीचा सूर उमटला आणि अंतर्गत कलह वाढू लागला होता. 

त्यागी यांनी वैयक्तिक मतेही पक्षाची मते म्हणून मांडल्याचे आणि त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला, तसेच पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यागी यांच्याकडून मांडल्या जाणाऱ्या भूमिकांमुळे पक्षाची सातत्याने अडचण होऊ लागली होती, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय झाल्याचे समजते. 

राजीव रंजन बनले जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ते

त्यागी यांनी राजीनामा दिल्यानंतर राजीव रंजन यांना राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राजकीय अभ्यासकांच्या मते त्यागी यांना हटवून जदयूमधील अंतर्गत मतभेदाची स्थिती कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, जेणेकरून पक्ष एकजूट राहावा. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारPoliticsराजकारणNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपा