शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"...म्हणून मुस्लिमांची कामे करणार नाही"; नाश्ता करुन जा म्हणत खासदाराने व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 18:40 IST

जेडीयूचे नवनिर्वाचित खासदार देवेशचंद्र ठाकूर सीतामढी लोकसभा मतदारसंघातील यादव आणि मुस्लिमांवर नाराजी व्यक्त केली.

JDI MP Devesh Chandra Thakur : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात एनडीएचे सरकार स्थापन झालं असून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत. एनडीएमध्ये नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड या पक्षाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.त्यामुळे सत्ता स्थापनेत नितीश कुमार यांच्या पक्षाचे वजन जास्त होतं. मात्र आता नितीश कुमार यांच्या पक्षाच्या खासदाराने केलेल्या एका वक्तव्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मला मतदान केलं नाही म्हणून मी मुस्लिम आणि यादव समाजाची कामे करणार नाही असं जेडीयूच्या खासदाराने म्हटलं आहे. कमी मतांनी विजयी झालेल्या खासदाराने आपली नाराजी काम न करणार असल्याचे सांगून व्यक्त केली आहे.

"जेडीयूचे नवनिर्वाचित खासदार देवेशचंद्र ठाकूर यांनी सीतामढीतील एका कार्यक्रमादरम्यान मुस्लिम आणि यादवांसाठी कोणतेही काम करणार नसल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत या समाजाची मते न मिळाल्यामुळे देवेशचंद्र ठाकूर दुखावले गेले होते. त्यामुळे देवेशचंद्र ठाकूर यांनी व्यासपीठावरुनच ही घोषणा केली.२२ वर्षे राजकारणात सक्रिय असताना यादव आणि मुस्लिम समाजासाठी सर्वाधिक काम केले. मात्र या लोकांनी विनाकारण मला या निवडणुकीत मतदान केले नाही," असे देवेशचंद्र ठाकूर म्हणाले.

"भविष्यात या समाजातील लोक कामासाठी आले तर त्यांना चहा-नाश्ता नक्कीच देईल पण त्यांची कामे करणार नाही. ज्यांना यायचे आहे, यावे, चहा-नाश्ता करून जावे पण मदतीची अपेक्षा करू नका. माझ्याकडे  सर्वात जास्त वैयक्तिक काम कोणत्याही समाजाची झाली असतील तर ती मुस्लिम आणि यादव समाजाची आहेत. आम्ही भाजपशी संबंधित आहोत म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करणार नाही का? तुम्हाला पंतप्रधान मोदींचा चेहरा दिसतो का? हे चुकीचे आहे. पंतप्रधान मोदींनी जात-धर्माचा विचार न करता सर्वांना धान्य दिले आहे," असेही देवेशचंद्र ठाकूर यांनी म्हटलं.

देवेशचंद्र ठाकूर यांनी सीतामढीमधून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. देवेशचंद्र ठाकूर हे बिहार विधान परिषदेचे अध्यक्षही आहेत. यासोबत ठाकूर यांनी कुशवाह समाजावरही भाष्य केलं. "कुशवाह समाज इतका स्वार्थी झाला आहे का? या समाजाचे सरकारमध्ये भाजपचे एक उपमुख्यमंत्री आहेत, जर उपेंद्र कुशवाह विजयी झाले असते तर ते आज केंद्रीय मंत्री झाले असते, सीतामढीतील कुशवाह समाजाचे लोक काम करून घेण्यासाठी येतील का? त्यांची विचारसरणी किती विकृत झाली आहे," असे देवेशचंद्र ठाकूर म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Janta Dal Unitedजनता दल युनायटेडlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपा