शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

इंडिया आघाडीपेक्षा JDUचा वेगळा सूर; म्हणाले, “श्रीराम सर्वांचे, निमंत्रण मिळाले तर जाणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 11:34 IST

Ayodhya Ram Mandir News: राम मंदिर सोहळ्याला जावे की नाही, याबाबत इंडिया आघाडीत संभ्रम असताना नितीश कुमारांच्या पक्षाने वेगळी भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे ७ ते ८ हजार मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, राम मंदिरावरून तसेच निमंत्रणे देण्यावरून विरोधक केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. राम मंदिराच्या सोहळ्याला जायचे की नाही, यावरून विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये संभ्रम आहे. यातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जयदू पक्षातील मंत्र्यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली असून, निमंत्रण दिल्यास राम मंदिर सोहळ्याला जाणार असल्याचे म्हटले आहे.

जदयू नेते केसी त्यागी यांनी यावर भाष्य करताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राम मंदिर बांधले जात आहे. हे मंदिर कोणत्याही राजकीय पक्षाने बांधलेले नाही. निमंत्रित केले या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पक्षाकडून प्रतिनिधी पाठवायला हरकत नाही. प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. अयोध्या मंदिराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाल्यास आम्ही निश्चितपणे कोणाला तरी उपस्थित राहण्यासाठी पाठवू, असे केसी त्यागी यांनी म्हटले आहे.

जर निमंत्रण मिळाले नाही तर...

सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही आम्ही न्यायालयाचा आदेश मान्य करू, असे सांगितले होते. आता हे प्रकरण निकाली निघाल्यानंतर मंदिर बांधले गेल्याने आम्ही त्याचा आदर करतो. २२ जानेवारीला अयोध्येला कोण जाणार याने काही फरक पडत नाही. जर निमंत्रण नसेल तर आम्ही आमच्या वेळेनुसार तिथे जाऊ, असे केसी त्यागी यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, असे आम्ही सातत्याने सांगत आलो आहोत. अयोध्या मंदिराच्या मुद्द्याचे राजकारण करण्याचे जे प्रयत्न केले जात आहेत त्याचे आश्चर्य वाटते. आता वेळ आली आहे की, भाजपाने मंदिर आणि धर्म यांचा वापर निवडणुकीची हत्यार म्हणून करणे थांबवावे. नितीश कुमार सरकारची धोरणे धर्मनिरपेक्षता प्रतिबिंबित करतात, असे जेडीयू नेते आणि बिहार राज्य धार्मिक बोर्डाचे सदस्य नीरज कुमार यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरNitish Kumarनितीश कुमार