शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार 4 लाख रुपयांची मदत, बिहार सरकारचा मोठा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 15:20 IST

nischay sankalp rally 

ठळक मुद्देकोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदतकोरोनासंदर्भात सरकारने अनेक मोठी पावले उचलली - नितीश कुमारकोरोना काळात 15 लाखहून अधिक लोक राज्यात परतले.

पाटणा -बिहारमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणूक जसजशी जवळ येऊ लगली आहे. तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. विरोधक एकमेकांवर निशाना साधण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. आज राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पहिल्या डिजिटल रॅलीतून (निश्चय संकल्प रॅली) बिहारच्या जनतेशी संवाद साधत, विरोधकांवरही हल्ला चढवला. यावेळी नितीश यांनी कोरोना टेस्टपासून ते वीजेच्या प्रश्नापर्यंत आपल्या सरकारने केलेल्या अनेक कामांचा पाढा वाचला. 

बिहारमध्ये आता घरा-घरात वीज पोहोचली आहे. यामुळे कंदील वपरण्याचे दिवस आता संपले आहेत. आज राज्यात रोजच्या रोज दीड लाखहून अधिक लोकांची कोरोना तपासणी होत आहे. एवढेच नाही, तर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधिति व्यक्तीच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णयही सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले. 

कोरोनासंदर्भात सरकारने अनेक मोठी पावले उचलली - मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, आपण कोरोनाला आळा घालण्यासाठी गेल्या मार्च महिन्यापासूनच सुरूवात केली. लॉकडाउन काळात आपण लोकांना जागरूक केले. यानंतर अनलॉकलादेखील सुरूवात झाली आहे. लोकांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी. बिहारमध्ये आता रोजच्या रोज 1 लाख 50 हजारहून अधिक कोरोना टेस्ट होत आहेत. सर्वाधिक तपासण्या  अँटीजन टेस्टच्या सहाय्याने होत आहेत. एवढेच नाही, तर लवकरात लवकर कोरोनाची तपासणी व्हावी यासाठी आता सरकार 10 आरटीपीसीआर मशीनदेखील विकत घेत असल्याचे नितीश यांनी सांगितले. 

'कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत -"बिहार सरकारने कोरोना महामारीसंदर्भात अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. विशेष म्हणजे कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याकाळात 15 लाखहून अधिक लोक राज्यात परतले आहेत. त्यांना 14 दिवसांपर्यंत क्वारंटाइन करण्यात आले होते. याकाळात प्रत्येक व्यक्तीवर जवळपास 5,300 रुपये खर्च करण्यात आला. तसेच केंद्रातील मोदी सरकार आणि आम्ही रेशनच्या बाबतीतही लोकांना मदत केली. आम्ही लोकांची सेवा करतो प्रचार करत नाही," असेही मुख्यमंत्री नितीश म्हणाले.

'बिहारमध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक - बिहारमध्ये कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक, म्हणजेच 88.24 टक्के एवढी आहे. कोरनावरील उपचारांसाठी आता त्रिस्तरीय व्यवस्था करण्यात आली आहे. होम आयसोलेशन शिवाय कोविड केअर सेंटर्स, कोविड हेल्थ सेंटर्स आणि कोविड रुग्णालयांत रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तसेच एखाद्या आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अवलंबून असलेल्याला नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच केंद्रातील मोदी सरकारकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचा विमाही देण्यात आला आहे, असेही नितीश यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVaccine : खूशखबर! स्वदेशी 'कोव्हॅक्सीन'च्या दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाला परवानगी, 7 सप्टेंबरपासून होणार सुरूवात

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

कंगनाविरोधात आंदोलन, शिवसेनेच्याच राज्यात शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारcorona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारElectionनिवडणूक