शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

जेडीएसने बंडखोर आमदारांवर लावला पक्षांतर विरोधी कायदा; बहुमतासाठी 4 मते दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 10:08 AM

मुख्यमंत्री कुमारस्वामी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत.

बंगळुरु : कर्नाटकमध्ये आज अल्पमतात आलेल्या कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यामुळे जेडीएसने त्यांच्या तीन बंडखोर आमदारांवर पक्षांतर विरोधी कायदा लागू केला आहे. या आधारावर या आमदारांना विधानसभेमध्ये मतदानासाठी अपात्र ठरविता येणार आहे. तिकडे जेडीएसने व्हीप जारी केला तरीही बंडखोर आमदारांनी विधानसभेत येण्यास नकार दिला आहे. 

मुख्यमंत्री कुमारस्वामी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. यापूर्वीच एच विश्वनाथ, गोपालैया आणि नारायण गौडा या बंडखोर आमदारांवर कारवाई करत पक्षांतर कायदा लागू केला आहे. एवढेच नाही तर जेडीएस अन्य काही आमदारांवरही कारवाई करण्याच्या विचारात असल्याचे समजते.

बुडत्या कुमारस्वामी सरकारला एका मताचा आधार; बंडखोर आमदाराची तलवार म्यान 

राजीनामा देणाऱ्या काँग्रेसच्या 13 पैकी एक आमदार रामलिंगा रेड्डी यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. यामुळे सत्ताधारी आमदारांची संख्या आता 102 झाली आहे. तर गेल्याचा आठवड्यात काँग्रेसचा आणखी एक बंडखोर आमदार मुंबईहून बंगळूरूला परतला आहे. या आमदाराची भूमिका स्पष्ट झालेली नसली तरीही कुमारस्वामींना 106 चा आकडा गाठावा लागणार आहे. जर अध्यक्षांनी उर्वरित 15 आमदारांचे राजीनामे मंजूर केले तर कुमारस्वामी सरकारसमोरील अडचणींमध्ये वाढच होईल. 

 

शुक्रवारची वाट पाहतेय कुमारस्वामींचे सरकारकुमारस्वामी आज सकाळी 11 वाजता विश्वासदर्शक ठराव मांडू शकतात. यासोबतच विधानसभेचे कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, जेडीएस आणि काँग्रेस या ठरावावर वेळ काढण्याची भूमिका घेण्याची शक्यता आहे. जेडीएस आणि काँग्रेस या ठरावावर आमदारांना त्यांचे मत मांडण्यासाठी सांगू शकतात. सर्व आमदारांनी भाषणबाजी केल्यास या ठरावावरील मतदान उद्यावर जाऊ शकते. यामुळे आणखी एक दिवसाचा वेळ मिळणार असल्याने सत्ताधारी या प्रयत्नात आहेत. तर भाजपा मतप्रदर्शन आणि मतदान आजच्याच दिवशी संपविण्याच्या प्रयत्नात असणार आहे. 

कुमारस्वामी सरकारविरोधात 13 काँग्रेस आणि 3 जेडीएसच्या आमदारांनी राजीनामे देत थेट मुंबई गाठली होती. मात्र, त्यावेळी विधानसभा अध्यक्ष उपस्थित नसल्याने त्यांचे राजीनामे मंजूर झाले नव्हते. यामुळे आपल्याला आमदार राहायचे नाही, राजीनामा मंजूर करावा अशी मागणी या बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आपण विधानसभा अध्यक्षांना केवळ राजीनाम्यांबाबत विचार करावा असे सांगू शकतो, त्यांच्यावर वेळेचे बंधन टाकू शकत नसल्याचे सांगत याचिका निकाली काढली होती. तसेच बंडखोर आमदारांना विधानसभेत हजर राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नसल्याचेही म्हटले होते. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)BJPभाजपा