शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

जेडीएसने बंडखोर आमदारांवर लावला पक्षांतर विरोधी कायदा; बहुमतासाठी 4 मते दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 10:12 IST

मुख्यमंत्री कुमारस्वामी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत.

बंगळुरु : कर्नाटकमध्ये आज अल्पमतात आलेल्या कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यामुळे जेडीएसने त्यांच्या तीन बंडखोर आमदारांवर पक्षांतर विरोधी कायदा लागू केला आहे. या आधारावर या आमदारांना विधानसभेमध्ये मतदानासाठी अपात्र ठरविता येणार आहे. तिकडे जेडीएसने व्हीप जारी केला तरीही बंडखोर आमदारांनी विधानसभेत येण्यास नकार दिला आहे. 

मुख्यमंत्री कुमारस्वामी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. यापूर्वीच एच विश्वनाथ, गोपालैया आणि नारायण गौडा या बंडखोर आमदारांवर कारवाई करत पक्षांतर कायदा लागू केला आहे. एवढेच नाही तर जेडीएस अन्य काही आमदारांवरही कारवाई करण्याच्या विचारात असल्याचे समजते.

बुडत्या कुमारस्वामी सरकारला एका मताचा आधार; बंडखोर आमदाराची तलवार म्यान 

राजीनामा देणाऱ्या काँग्रेसच्या 13 पैकी एक आमदार रामलिंगा रेड्डी यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. यामुळे सत्ताधारी आमदारांची संख्या आता 102 झाली आहे. तर गेल्याचा आठवड्यात काँग्रेसचा आणखी एक बंडखोर आमदार मुंबईहून बंगळूरूला परतला आहे. या आमदाराची भूमिका स्पष्ट झालेली नसली तरीही कुमारस्वामींना 106 चा आकडा गाठावा लागणार आहे. जर अध्यक्षांनी उर्वरित 15 आमदारांचे राजीनामे मंजूर केले तर कुमारस्वामी सरकारसमोरील अडचणींमध्ये वाढच होईल. 

 

शुक्रवारची वाट पाहतेय कुमारस्वामींचे सरकारकुमारस्वामी आज सकाळी 11 वाजता विश्वासदर्शक ठराव मांडू शकतात. यासोबतच विधानसभेचे कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, जेडीएस आणि काँग्रेस या ठरावावर वेळ काढण्याची भूमिका घेण्याची शक्यता आहे. जेडीएस आणि काँग्रेस या ठरावावर आमदारांना त्यांचे मत मांडण्यासाठी सांगू शकतात. सर्व आमदारांनी भाषणबाजी केल्यास या ठरावावरील मतदान उद्यावर जाऊ शकते. यामुळे आणखी एक दिवसाचा वेळ मिळणार असल्याने सत्ताधारी या प्रयत्नात आहेत. तर भाजपा मतप्रदर्शन आणि मतदान आजच्याच दिवशी संपविण्याच्या प्रयत्नात असणार आहे. 

कुमारस्वामी सरकारविरोधात 13 काँग्रेस आणि 3 जेडीएसच्या आमदारांनी राजीनामे देत थेट मुंबई गाठली होती. मात्र, त्यावेळी विधानसभा अध्यक्ष उपस्थित नसल्याने त्यांचे राजीनामे मंजूर झाले नव्हते. यामुळे आपल्याला आमदार राहायचे नाही, राजीनामा मंजूर करावा अशी मागणी या बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आपण विधानसभा अध्यक्षांना केवळ राजीनाम्यांबाबत विचार करावा असे सांगू शकतो, त्यांच्यावर वेळेचे बंधन टाकू शकत नसल्याचे सांगत याचिका निकाली काढली होती. तसेच बंडखोर आमदारांना विधानसभेत हजर राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नसल्याचेही म्हटले होते. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)BJPभाजपा