शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद मेला?, पाकच्या प्रसारमाध्यमांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 06:25 IST

भारतासाठी अत्यंत घातक ठरत असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर मेला असल्याचे वृत्त पाकिस्तानच्या माध्यमांनी दिले आहे.

नवी दिल्ली : भारतासाठी अत्यंत घातक ठरत असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर मेला असल्याचे वृत्त पाकिस्तानच्या माध्यमांनी दिले आहे. पाकिस्तान सरकारने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही, तसेच जैश-ए-मोहम्मदनेही याबाबत कोणतीही माहिती प्रसारित केलेली नाही. मात्र, त्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.पुलवामा येथे केलेल्या भीषण हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांत गंभीर जखमी झालेला मसूद अझहरमरण पावला असल्याचा दावा पाक माध्यमांनी केला.मसूदची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली असून, त्याला दररोज डायलिसिस करून घ्यावे लागते, अशीही चर्चा समाजमाध्यमांत सुरू आहे. बालाकोटमधील हल्ल्यातच मसूद अजहर मारला गेल्याचा दावा टिष्ट्वटरवर अनेकांनी केला आहे. या हल्ल्यानंतर भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव प्रचंड वाढल्याने त्यांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी मसूद अजहरबाबत पाकिस्तानकडून उलटसुलट बातम्या पेरल्या जात आहेत, असे मतही काही जणांनी टिष्ट्वटरवर व्यक्त केले आहे.त्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. किडनीच्या आजारावर उपचार सुरू असताना मसूदचा मृत्यू झाला का? त्याच्यावर कुठे उपचार सुरू होते? बालाकोटवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जखमी होऊन उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला का? मसूदच्या मृत्यूची बातमी पसरवून पाक त्याला लपवू पाहात आहे का? जागतिक पातळीवर इम्रान खान स्वत:ला वाचवू पाहात आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळू शकतील.मसूद हा जैश-ए-मोहम्मद संघटनेचा संस्थापक असून, ही संघटना मुख्यत्वे पाकव्याप्त काश्मीरमधून घातपाती कारवाया घडवत असते. पुलवामातील हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली होती. त्यानंतर, मसूदवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली. पुलवामा हल्ल्यामागे जैश असल्याचे सर्व पुरावे भारताने पाकिस्तानला सुपुर्द केले आहेत. १९९९ साली हरकत-उल-मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे काठमांडूहून अपहरण करून ते अफगाणिस्तानातील कंदाहारला नेले होते. भारतात कैदेत असलेल्या मसूद अजहर व अन्य दोन दहशतवाद्यांची वाजपेयी सरकारने मुक्तता केल्यास विमानातील प्रवाशांची सुटका करण्यात येईल, अशी अट अपहरणकर्त्यांनी घातली होती. त्यानुसार, मसूदला मुक्त करण्यात आल्यानंतर तो पाकिस्तानात गेला होता. आयएसआयच्या मदतीने त्याने पाकिस्तानच्या भूमीचा वापर करून भारतात घातपाती कारवाया सुरू केल्या.>पाकिस्तान मसूदला दहशतवादी ठरवणार?मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसमोर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सने नवा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला विरोध न करण्याची भूमिका पाक सरकार घेणार असल्याचे कळते. परंतु, तो आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत झाल्यानंतर पाक काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. तो खरेच जिवंत असल्यास त्याला नजरकैदेत ठेवणार की अटक करणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे.>नेमके काय झाले?किडनीच्या आजारावर उपचार सुरू असताना मसूदचा मृत्यू झाला का? कुठे उपचार सुरू होते?बालाकोटवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जखमी होऊन उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला का?मसूदच्या मृत्यूची बातमी पसरवून पाक त्याला लपवू पाहात आहे का?

टॅग्स :masood azharमसूद अजहरJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदterroristदहशतवादीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला