शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
5
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
6
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
7
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
8
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
9
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
10
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
11
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
12
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
13
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
14
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
15
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
16
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
17
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
18
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
19
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
20
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान

'महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले', खा. जया बच्चन यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 16:49 IST

Jaya Bachchan on Mahakumbh 2025 :संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन राजकारण तापले आहे.

Jaya Bachchan on Mahakumbh 2025 : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत विरोधक सातत्याने टीका करत आहेत. आता समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी या दुर्घटनेबाबत यूपी सरकारवर मोठा आरोप केला आहे. अपघातानंतर भाविकांचे मृतदेह गंगा नदीत फेकल्याचा दावा जया बच्चन यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

संसद भवन संकुलात मीडियाशी बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, 'महाकुंभ चेंगराचेंगरीची घटना सध्या देशातील सर्वात मोठी घटना आहे. त्यांनी मृतांची नेमकी संख्या उघड करून जनतेला स्पष्टीकरण द्यावे. ते खोटे बोलत आहेत. व्यवस्था सामान्य माणसांसाठी नसून व्हीआयपींसाठी होती. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकण्यात आले आणि त्यामुळे पाणी प्रदूषित झाले. हेच पाणी लोकांपर्यंत पोहोचत आहे. सध्या सर्वात जास्त दूषित पाणी फक्त कुंभात आहे, त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही,' अशी टीका जया बच्चन यांनी केली.

चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यूमौनी अमावस्या (28 जानेवारी) रोजी प्रयागराज महाकुंभमध्ये संगमाजवळ चेंगराचेंगरी झाली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत 30 जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतरच विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशचे भाजप सरकार मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

महाकुंभाच्या मुद्द्यावरुन खरगे आणि धनखड यांच्यात वादराज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात पुन्हा एकदा संसदेत जोरदार वादावादी झाली. सोमवारी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सभागृहातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे महाकुंभ चेंगराचेंगरीबाबत आपले म्हणणे मांडत असताना अपघातातील मृत्यूंबाबत दोघांमध्ये वाद सुरू झाला. राज्यसभेत आपल्या भाषणात मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, महाकुंभ दुर्घटनेत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे चुकीचे असेल, तर कृपया मला सांगा...हा माझा अंदाज आहे. 

यावर जगदीप धनखड यांनी खर्गे यांना अडवत म्हणाले, तुम्ही काय बोलताय, याचा विचार केलाय का...1000 चा आकडा सांगत आहात. यातून जगाला काय संदेश जाईल? यावर खरगे म्हणाले, अखेर किती जण मेले…यात सत्य काय आहे? निदान ही माहिती तरी द्या. माझे चुकत असेल, तर मी माफी मागतो...दरम्यान, महाकुंभातील कथित गैरव्यवस्थापनाच्या मुद्द्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करत राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. मागणी फेटाळल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रथम शून्य प्रहरात आणि नंतर प्रश्नोत्तराच्या तासावर सभागृहावर बहिष्कार टाकला.

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चनKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश