शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

'महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले', खा. जया बच्चन यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 16:49 IST

Jaya Bachchan on Mahakumbh 2025 :संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन राजकारण तापले आहे.

Jaya Bachchan on Mahakumbh 2025 : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत विरोधक सातत्याने टीका करत आहेत. आता समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी या दुर्घटनेबाबत यूपी सरकारवर मोठा आरोप केला आहे. अपघातानंतर भाविकांचे मृतदेह गंगा नदीत फेकल्याचा दावा जया बच्चन यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

संसद भवन संकुलात मीडियाशी बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, 'महाकुंभ चेंगराचेंगरीची घटना सध्या देशातील सर्वात मोठी घटना आहे. त्यांनी मृतांची नेमकी संख्या उघड करून जनतेला स्पष्टीकरण द्यावे. ते खोटे बोलत आहेत. व्यवस्था सामान्य माणसांसाठी नसून व्हीआयपींसाठी होती. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकण्यात आले आणि त्यामुळे पाणी प्रदूषित झाले. हेच पाणी लोकांपर्यंत पोहोचत आहे. सध्या सर्वात जास्त दूषित पाणी फक्त कुंभात आहे, त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही,' अशी टीका जया बच्चन यांनी केली.

चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यूमौनी अमावस्या (28 जानेवारी) रोजी प्रयागराज महाकुंभमध्ये संगमाजवळ चेंगराचेंगरी झाली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत 30 जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतरच विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशचे भाजप सरकार मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

महाकुंभाच्या मुद्द्यावरुन खरगे आणि धनखड यांच्यात वादराज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात पुन्हा एकदा संसदेत जोरदार वादावादी झाली. सोमवारी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सभागृहातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे महाकुंभ चेंगराचेंगरीबाबत आपले म्हणणे मांडत असताना अपघातातील मृत्यूंबाबत दोघांमध्ये वाद सुरू झाला. राज्यसभेत आपल्या भाषणात मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, महाकुंभ दुर्घटनेत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे चुकीचे असेल, तर कृपया मला सांगा...हा माझा अंदाज आहे. 

यावर जगदीप धनखड यांनी खर्गे यांना अडवत म्हणाले, तुम्ही काय बोलताय, याचा विचार केलाय का...1000 चा आकडा सांगत आहात. यातून जगाला काय संदेश जाईल? यावर खरगे म्हणाले, अखेर किती जण मेले…यात सत्य काय आहे? निदान ही माहिती तरी द्या. माझे चुकत असेल, तर मी माफी मागतो...दरम्यान, महाकुंभातील कथित गैरव्यवस्थापनाच्या मुद्द्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करत राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. मागणी फेटाळल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रथम शून्य प्रहरात आणि नंतर प्रश्नोत्तराच्या तासावर सभागृहावर बहिष्कार टाकला.

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चनKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश